शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

रेल्वेची जमीन शेती व्यवसायाच्या वापरात

By admin | Updated: May 7, 2017 00:12 IST

तालुक्यातील शिराळा परिसरातील शेतजमीन सन १९९४ मध्ये शासनाने रेल्वे लाईनकरिता अधिग्रहित केली होती.

शेतकऱ्यांचा आक्षेप : अन्थया शेतजमीन परत करालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तालुक्यातील शिराळा परिसरातील शेतजमीन सन १९९४ मध्ये शासनाने रेल्वे लाईनकरिता अधिग्रहित केली होती. मात्र या सुपीक जमिनीचा वापर ज्या कामासाठी व्हायला पाहिजे तो होत नसल्याने ही सर्व जमीन शेतीव्यवसायासाठी रेल्वेमधील काही कर्मचारी वापर करीत आहेत. त्यामुळे अधिग्रहित केलेली ही सर्व शेतजमीन शेतकऱ्यांना शासनाने परत द्यावी, अशी मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे केली.शिराळा परिसरातील सुपीक जमीन सन १९९४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रेल्वे लाईनच्या कामाकरिता अधिग्रहित करण्याचे आदेश दिले होते. शासन निर्माधीन व सार्वजनिक प्रकल्प असल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलाही विरोध न करता जमीन दिली. मात्र आजच्या स्थितीत ही सर्व शेतजमीन रेल्वे विभागातील काही गॅगमन पदावरील कर्मचारी या जमिनीचा वापर शेतीसाठी करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परिणामी केंद्र शासनाच्या सन २००३ च्या निर्णयानुसार दिलेल्या जमिनीचा उद्देश बदलल्यास शेती मूळ शेतकऱ्यांना परत द्यावी, असा नियम आहे. यानुसार सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेली प्रकाश साबळे, प्रशात ढोरे, संजय बडे आदी उपस्थित होते.