शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

धक्कादायक! २९३ सातबारावरील भूदानधारकांची नोंद गायब; भूदान यज्ञ मंडळाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 13:51 IST

भूदान यज्ञ मंडळद्वारे दहा वर्षांपासून अधिनियम भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अंकेक्षण केले असता, भूदानच्या अधिकार अभिलेखात महसूल विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे.

ठळक मुद्देअधिकार अभिलेखात केव्हा होणार दुरुस्ती?

गजानन मोहोड

अमरावती : आचार्य विनोबा भावे यांना भूदान चळवळीदरम्यान दान मिळालेल्या व भूमिहीन मजुरांना पट्टेवाटप केलेल्या जमिनीच्या तब्बल २९३ सात-बारावरील भूदानधारकांची नोंदच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. याशिवाय २७० सात-बारावर ‘भूदान अहस्तांतरणीय’ अशी नोंद गायब झालेली झालेली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमुळे या नोंदी गायब झाल्याचा आरोप भूदान यज्ञ मंडळाने केला आहे.

भूदान जमीनसंदर्भात अधिकार अभिलेख्यातील भूदान यज्ञ अधिनियम १९५३ नुसार नसल्याचे वास्तव आहे. भूदानवाटपाच्या अटी-शर्तीमध्ये जमीन पडीत ठेवली जाणार नाही व ती हस्तांतरित केली जाणार नाही, या दोन प्रमुख अटी आहेत. अटींचा भंग झाल्याची माहिती सर्वप्रथम तलाठ्यांना होत असताना शर्तभंगाची सूचना तहसीलदार व भूदान यज्ञ मंडळांना देणे त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. मात्र, कर्तव्यात कसूर होत आसल्याने जमिनीचे हस्तांतरण होत आहे. अशी शर्तभंगाची ३५ प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती मंडळाचे सचिव नरेंद्र बैस यांनी ‘लोकमत’ला दिली.

मंडळाद्वारा जिल्हाधिकारी यांच्याशी भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत एक निश्चित कालमर्यादेत अधिकार अभिलेख्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, आदेशच जारी न केल्याने प्रकारात वाढ होत असल्याचे दिसून येते. भूदान यज्ञ मंडळद्वारे दहा वर्षांपासून अधिनियम भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अंकेक्षण केले असता, भूदानच्या अधिकार अभिलेखात महसूल विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे.

५५ सात-बारावर भोगवटदार वर्ग २ ऐवजी १

‘भूदान अहस्तांतरणीय’च्या ५५ सात-बारावरील भोगवटदार वर्ग २ गायब होऊन तेथे वर्ग १ अशी नोंद झालेली आहेत. यामध्ये वरूड तालुक्यात १३, चांदूर बाजार तालुक्यात १२, मोर्शी, अचलपूर, भातकुली व धारणी तालुक्यात प्रत्येकी दोन, अमरावती व दर्यापूर तालुक्यात प्रत्येकी तीन तसेच अंजनगाव व चांदूर रेल्वे तालुक्यात प्रत्येकी पाच प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

मंडळाद्वारा पट्टेवाटप

मंडळाद्वारा पट्टेवाटप केलेल्या २९३ सात-बारावरील भूदानधारकांच्या नोंदीच गायब करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मोर्शी तालुक्यात ६३, अचलपूर ५०, अमरावती ३७, वरूड ३६, चांदूर बाजार ३१, दर्यापूर २४, चांदूर रेल्वे १५, नांदगाव खंडेश्वर १२, भातकुली ११, अंजनगाव ८, धामणगाव ५, तिवसा ४ व धारणी तालुक्यात २ प्रकरणे आहेत.

३४ प्रकरणात शर्तभंग

भूदान जमिनीच्या ३४ प्रकरणात शर्तभंग झालेला आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यात सर्वाधिक २१ प्रकरणे आहेत. अधिकार बाह्य ३७ फेरफार नोंदविण्यात आलेले आहेत. याशिवाय अवांच्छित नोंद असलेली २४० प्रकरणे आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणे जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५८, पोटकलम २ अन्वये पुनर्विलोकित होणे महत्त्वाचे आहे.

भूदान जमिनीचे शर्तभंग, सात-बाऱ्यावरील नोंद गायब, भोगवटदार वर्ग बदल, अधिकारबाह्य फेरफार आदी प्रकरणे भूदान अधिनियम १९५३च्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्याद्वारा अधिकार अभिलेखात दुरुस्तीसाठी दिशानिर्देश देण्याची गरज आहे.

- नरेंद्र बैस, सदस्य, संयुक्त सचिव (भूदान अंकेशन), भूदान यज्ञ मंडळ

टॅग्स :Governmentसरकार