शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

धक्कादायक! २९३ सातबारावरील भूदानधारकांची नोंद गायब; भूदान यज्ञ मंडळाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 13:51 IST

भूदान यज्ञ मंडळद्वारे दहा वर्षांपासून अधिनियम भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अंकेक्षण केले असता, भूदानच्या अधिकार अभिलेखात महसूल विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे.

ठळक मुद्देअधिकार अभिलेखात केव्हा होणार दुरुस्ती?

गजानन मोहोड

अमरावती : आचार्य विनोबा भावे यांना भूदान चळवळीदरम्यान दान मिळालेल्या व भूमिहीन मजुरांना पट्टेवाटप केलेल्या जमिनीच्या तब्बल २९३ सात-बारावरील भूदानधारकांची नोंदच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. याशिवाय २७० सात-बारावर ‘भूदान अहस्तांतरणीय’ अशी नोंद गायब झालेली झालेली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमुळे या नोंदी गायब झाल्याचा आरोप भूदान यज्ञ मंडळाने केला आहे.

भूदान जमीनसंदर्भात अधिकार अभिलेख्यातील भूदान यज्ञ अधिनियम १९५३ नुसार नसल्याचे वास्तव आहे. भूदानवाटपाच्या अटी-शर्तीमध्ये जमीन पडीत ठेवली जाणार नाही व ती हस्तांतरित केली जाणार नाही, या दोन प्रमुख अटी आहेत. अटींचा भंग झाल्याची माहिती सर्वप्रथम तलाठ्यांना होत असताना शर्तभंगाची सूचना तहसीलदार व भूदान यज्ञ मंडळांना देणे त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. मात्र, कर्तव्यात कसूर होत आसल्याने जमिनीचे हस्तांतरण होत आहे. अशी शर्तभंगाची ३५ प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती मंडळाचे सचिव नरेंद्र बैस यांनी ‘लोकमत’ला दिली.

मंडळाद्वारा जिल्हाधिकारी यांच्याशी भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत एक निश्चित कालमर्यादेत अधिकार अभिलेख्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, आदेशच जारी न केल्याने प्रकारात वाढ होत असल्याचे दिसून येते. भूदान यज्ञ मंडळद्वारे दहा वर्षांपासून अधिनियम भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अंकेक्षण केले असता, भूदानच्या अधिकार अभिलेखात महसूल विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे.

५५ सात-बारावर भोगवटदार वर्ग २ ऐवजी १

‘भूदान अहस्तांतरणीय’च्या ५५ सात-बारावरील भोगवटदार वर्ग २ गायब होऊन तेथे वर्ग १ अशी नोंद झालेली आहेत. यामध्ये वरूड तालुक्यात १३, चांदूर बाजार तालुक्यात १२, मोर्शी, अचलपूर, भातकुली व धारणी तालुक्यात प्रत्येकी दोन, अमरावती व दर्यापूर तालुक्यात प्रत्येकी तीन तसेच अंजनगाव व चांदूर रेल्वे तालुक्यात प्रत्येकी पाच प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

मंडळाद्वारा पट्टेवाटप

मंडळाद्वारा पट्टेवाटप केलेल्या २९३ सात-बारावरील भूदानधारकांच्या नोंदीच गायब करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मोर्शी तालुक्यात ६३, अचलपूर ५०, अमरावती ३७, वरूड ३६, चांदूर बाजार ३१, दर्यापूर २४, चांदूर रेल्वे १५, नांदगाव खंडेश्वर १२, भातकुली ११, अंजनगाव ८, धामणगाव ५, तिवसा ४ व धारणी तालुक्यात २ प्रकरणे आहेत.

३४ प्रकरणात शर्तभंग

भूदान जमिनीच्या ३४ प्रकरणात शर्तभंग झालेला आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यात सर्वाधिक २१ प्रकरणे आहेत. अधिकार बाह्य ३७ फेरफार नोंदविण्यात आलेले आहेत. याशिवाय अवांच्छित नोंद असलेली २४० प्रकरणे आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणे जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५८, पोटकलम २ अन्वये पुनर्विलोकित होणे महत्त्वाचे आहे.

भूदान जमिनीचे शर्तभंग, सात-बाऱ्यावरील नोंद गायब, भोगवटदार वर्ग बदल, अधिकारबाह्य फेरफार आदी प्रकरणे भूदान अधिनियम १९५३च्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्याद्वारा अधिकार अभिलेखात दुरुस्तीसाठी दिशानिर्देश देण्याची गरज आहे.

- नरेंद्र बैस, सदस्य, संयुक्त सचिव (भूदान अंकेशन), भूदान यज्ञ मंडळ

टॅग्स :Governmentसरकार