शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

लालपरीने धरली पुन्हा मध्यप्रदेशची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST

अमरावती : महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असली तरी अनेक महिन्यांपासून एसटीची सेवा येथे बंद ...

अमरावती : महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असली तरी अनेक महिन्यांपासून एसटीची सेवा येथे बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मध्य प्रदेशसाठी बससेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांची सोय झाली असून, एसटीच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.

दीड वर्षापूर्वी कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेली एसटीची चाके थांबली होती. खासगी बसेससोबत स्पर्धा असणार एसटीची आर्थिक परिस्थिती आधीच फारशी चांगली नव्हती. त्यात कोरोनाचे विघ्न आले. प्रवासी वाहतूक बंद झाल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न बंद झाले. त्या काळात एसटीने मालवाहतुकीवर भर दिला होता. अशातच कर्मचाऱ्यांचे पगार करणे महामंडळाला कठीण झाले होते. मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रवाशांसाठी एसटी बसेस सुरू केल्यात. अमरावती येथून मध्यप्रदेशातील भ़ोपाळ, खंडवा बऱ्हाणपूर, मुलाताई, पांढुर्णा, छिंदवाडा, बैतुल, इंदौर यासोबतच आंध प्रदेशमधील हैदराबाद आदी ठिकाणी बसेस जात असतात. मात्र, कोरोनामुळे मध्यप्रदेशने मात्र महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातली होती. त्यामुळे एसटीच्या बसेस मध्य प्रदेशच्या सीमेवर जात होत्या. आता ३ सप्टेंबरला मध्य प्रदेश सरकारने आपल्या सीमा खुल्या केल्यामुळे महाराष्ट्रातील तसेच खासगी बसेस तेथे जाऊ लागल्या आहेत.

बॉक्स

अमरावतीतून दररोज १४ फेऱ्या

अमरावती येथून परिवहन महामंडळाच्या दररोज १४ फेऱ्या मध्य प्रदेशात होत आहेत. अमरावतीहून मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर, इंदौर, पांढुर्णा, मुलताई, छिंदवाडा आदी ठिकाणी दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी नुकत्याच राज्य परिवहन महामंडळाने मध्य प्रदेशात जाणाऱ्या एसटी बसेसच्या १४ फेऱ्या सुरू केल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.