शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अचलपूर मुख्याधिकारी कक्षाला आरोग्य सभापतींनी लावले कुलूप

By admin | Updated: February 4, 2016 00:14 IST

नगरपालिका विकासकामांसाठी असलेल्या सव्वादोन कोटी रुपयांचा निधी तंत्रनिकेतन विद्यालयाच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमबाह्यरित्या वाटप केल्याच्या निषेधार्थ ...

सव्वादोन कोटींचे प्रकरण : शिक्षकांना दिला नियमबाह्य विकासनिधीनरेंद्र जावरे परतवाडानगरपालिका विकासकामांसाठी असलेल्या सव्वादोन कोटी रुपयांचा निधी तंत्रनिकेतन विद्यालयाच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमबाह्यरित्या वाटप केल्याच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी १ वाजता स्वच्छता व आरोग्य सभापती राजू लोहिया यांनी कुलूप ठोकल्याने पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. अचलपूर नगर पालिकेंतर्गत तंत्रनिकेतन महाविद्यालय चालविण्यात येते. येथे शिक्षक व शिक्षकेतर असे एकूण ५१ कर्मचारी कार्यरत आहेत. या तंत्रनिकेतनवर शासनातर्फे कुठल्याच प्रकारचा निधी दिला जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या शुल्कावर तंत्रनिकेतनच्या कर्मचारी शिक्षकांचे वेतन व सादिल खर्च चालविता जातो. मात्र, या ५१ कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी ते सप्टेंबर २०१५ या सात महिन्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. नियमबाह्य दिले वेतन नगरपालिकेला शासनाचा १२ वा १३ वा वित्तआयोग, रमाई आवास योजना एसजेवाय, नागरी दलित वस्ती आणि वेगवेगळ्या कोट्यवधी रुपयांचा निधी येथे विविध बॅँकांमध्ये या निधीवर मिळणारे व्याज दोन कोटी रुपये शिल्लक होते. ही व्याजी रक्कम केवळ नागरी विकासकामांवर खर्च करण्याचा शासनाचा नियम आहे. हा निधी तंत्रनिकेतन कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करु नये, तसे पत्र सुद्धा राज्य शासनाने १९ जानेवारी २०१६ रोजी अचलपूर नगर पालिकेला एका अर्जाच्या उत्तरादाखल पाठविले असताना नियमबाह्यरीत्या वेतन कापूस देण्यात आल्याचा आरोप स्वच्छता व आरोग्य सभापती राजेंद्र लोहिया यांनी केला. आणि कुलूप ठोकले या प्रकाराबद्दल मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांना आपण बुधवारी सकाळी ७ वाजता दूरध्वनीवर माहिती देऊन सकाळी ११ वाजता त्यांच्या कक्षात भेटण्याची व या प्रकरणाची माहिती देण्याची विनंती केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी होकार दिला. मात्र, दुपारी १ वाजेपर्यंत ते आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोग्य सभापती राजेंद्र लोहिया यांनी कुलूप ठोकल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. मुख्याधिकारी राहतात बेपत्ता अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय जावळीकर २६ जानेवारीनंतर थेट २ फेब्रुवारी रोजी कार्यालयात आले. ते सतत गैरहजर राहात असल्याने नगरपालिकेच्या भोंगळ कारोभारावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा समन्स देऊन त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसल्याने त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध नगरसेवकांमध्ये संताप व्यक्त असल्याचा आरोप राजेंद्र लोहिया यांनी केला आहे.