शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा फटका !

By admin | Updated: August 26, 2016 00:18 IST

बाजारपेठेत तुरीच्या भावाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना नुकसान झेलावे लागत आहे.

व्यापारीही गारद : चुकीच्या शासन धोरणाचा परिपाकचांदूरबाजार : बाजारपेठेत तुरीच्या भावाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना नुकसान झेलावे लागत आहे. १५ जुलैपर्यंत ८ हजार ते ९ हजारांपर्यंत भाव असलेल्या तुरीला घसरणीचा जोर चढला आहे. दीड महिन्यात तुरीचे दर ९ हजारांवरून साडेपाच ते सहा हजार रुपयापर्यंत खाली घसरला आहे. परिणामी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.मागील वर्षी जुलै-आॅगस्ट २०१५ यादरम्यान बाजारपेठेत तुरीचे दर १२ ते १३ हजारपर्यंत पोहोचले होते. याचा विचार करून याहीवर्षी त्यादरम्यान हेच भाव मिळतील, ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्री रोखून धरली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला माल भाव वाढेल या अपेक्षेने ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्री रोखून धरली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल भाव वाढेल या अपेक्षेने वेअर हाऊसमध्ये ठेवून त्यावर बँकांच्या कर्जाचीही उचल केली आहे. ऐन हंगामात तुरीला भाव मिळून आपला खरीप हंगाम चांगल्या तऱ्हेने उभा करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी केली होती. मात्र त्यांची अपेक्षाभंग झाली आहे. उलट या तुरीवर उचलेले बँकेचे कर्जही आजचे भाव पाहता फेडता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतमालाचा ट्रेडींग करणाऱ्या व्यापारांनाही तुरीच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होईल, असे अपेक्षित नव्हते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुरीच्या दराचा अंदाज घेता व्यापाऱ्यांनी नफा मिळविण्याचा दृष्टीने बाजारपेठेत विक्रीस आलेला तुरीचा माल नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने जून २०१६ पर्यंत खरेदी करून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. अनेक व्यापाऱ्यांकडे ५०० ते २ हजार क्विंटलपर्यंत तुरीची साठवून ठेवलेली आहे. प्रतिक्विंटल झालेले तीन हजार रुपयाचे नुकसान पाहता व्यापाऱ्यांनाही कोट्यवधींचा फटका बसला आहे. तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही बाजारपेठेत तुरडाळीचे दर मात्र १२० रुपयांच्या आसपास आहेत. आजचे तुरीचे दर पाहता बाजारात तूरडाळीचा दर ८५ ते ९० रुपयेच असायला पाहिजे होता. त्यामुळे हजारो कोटींची लाखो टन तूरडाळ आयात करूनही सरकारकडून सामान्य नागरिकांना डाळीचे भाव स्थिर ठेवण्यात यश आलेले नाही. शासनाचा या चुकीच्या आयात धोरणात शेतकऱ्यांचे व व्यापारींचे मरण होत आहे. शासकीय बगळ्यांमुळे दालमिल व्यापारीही तूर खरेदी करताना साठवणुकीचा विचार न करता आवश्यक तेवढाच माल खरेदी करीत आहे. परिणामी बाजारपेठेत तूर खरेदीची चढाओढ इतिहासजमा झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)