शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा फटका !

By admin | Updated: August 26, 2016 00:18 IST

बाजारपेठेत तुरीच्या भावाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना नुकसान झेलावे लागत आहे.

व्यापारीही गारद : चुकीच्या शासन धोरणाचा परिपाकचांदूरबाजार : बाजारपेठेत तुरीच्या भावाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना नुकसान झेलावे लागत आहे. १५ जुलैपर्यंत ८ हजार ते ९ हजारांपर्यंत भाव असलेल्या तुरीला घसरणीचा जोर चढला आहे. दीड महिन्यात तुरीचे दर ९ हजारांवरून साडेपाच ते सहा हजार रुपयापर्यंत खाली घसरला आहे. परिणामी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.मागील वर्षी जुलै-आॅगस्ट २०१५ यादरम्यान बाजारपेठेत तुरीचे दर १२ ते १३ हजारपर्यंत पोहोचले होते. याचा विचार करून याहीवर्षी त्यादरम्यान हेच भाव मिळतील, ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्री रोखून धरली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला माल भाव वाढेल या अपेक्षेने ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्री रोखून धरली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल भाव वाढेल या अपेक्षेने वेअर हाऊसमध्ये ठेवून त्यावर बँकांच्या कर्जाचीही उचल केली आहे. ऐन हंगामात तुरीला भाव मिळून आपला खरीप हंगाम चांगल्या तऱ्हेने उभा करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी केली होती. मात्र त्यांची अपेक्षाभंग झाली आहे. उलट या तुरीवर उचलेले बँकेचे कर्जही आजचे भाव पाहता फेडता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतमालाचा ट्रेडींग करणाऱ्या व्यापारांनाही तुरीच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होईल, असे अपेक्षित नव्हते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुरीच्या दराचा अंदाज घेता व्यापाऱ्यांनी नफा मिळविण्याचा दृष्टीने बाजारपेठेत विक्रीस आलेला तुरीचा माल नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने जून २०१६ पर्यंत खरेदी करून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. अनेक व्यापाऱ्यांकडे ५०० ते २ हजार क्विंटलपर्यंत तुरीची साठवून ठेवलेली आहे. प्रतिक्विंटल झालेले तीन हजार रुपयाचे नुकसान पाहता व्यापाऱ्यांनाही कोट्यवधींचा फटका बसला आहे. तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही बाजारपेठेत तुरडाळीचे दर मात्र १२० रुपयांच्या आसपास आहेत. आजचे तुरीचे दर पाहता बाजारात तूरडाळीचा दर ८५ ते ९० रुपयेच असायला पाहिजे होता. त्यामुळे हजारो कोटींची लाखो टन तूरडाळ आयात करूनही सरकारकडून सामान्य नागरिकांना डाळीचे भाव स्थिर ठेवण्यात यश आलेले नाही. शासनाचा या चुकीच्या आयात धोरणात शेतकऱ्यांचे व व्यापारींचे मरण होत आहे. शासकीय बगळ्यांमुळे दालमिल व्यापारीही तूर खरेदी करताना साठवणुकीचा विचार न करता आवश्यक तेवढाच माल खरेदी करीत आहे. परिणामी बाजारपेठेत तूर खरेदीची चढाओढ इतिहासजमा झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)