शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा फटका !

By admin | Updated: August 26, 2016 00:18 IST

बाजारपेठेत तुरीच्या भावाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना नुकसान झेलावे लागत आहे.

व्यापारीही गारद : चुकीच्या शासन धोरणाचा परिपाकचांदूरबाजार : बाजारपेठेत तुरीच्या भावाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना नुकसान झेलावे लागत आहे. १५ जुलैपर्यंत ८ हजार ते ९ हजारांपर्यंत भाव असलेल्या तुरीला घसरणीचा जोर चढला आहे. दीड महिन्यात तुरीचे दर ९ हजारांवरून साडेपाच ते सहा हजार रुपयापर्यंत खाली घसरला आहे. परिणामी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.मागील वर्षी जुलै-आॅगस्ट २०१५ यादरम्यान बाजारपेठेत तुरीचे दर १२ ते १३ हजारपर्यंत पोहोचले होते. याचा विचार करून याहीवर्षी त्यादरम्यान हेच भाव मिळतील, ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्री रोखून धरली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला माल भाव वाढेल या अपेक्षेने ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्री रोखून धरली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल भाव वाढेल या अपेक्षेने वेअर हाऊसमध्ये ठेवून त्यावर बँकांच्या कर्जाचीही उचल केली आहे. ऐन हंगामात तुरीला भाव मिळून आपला खरीप हंगाम चांगल्या तऱ्हेने उभा करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी केली होती. मात्र त्यांची अपेक्षाभंग झाली आहे. उलट या तुरीवर उचलेले बँकेचे कर्जही आजचे भाव पाहता फेडता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतमालाचा ट्रेडींग करणाऱ्या व्यापारांनाही तुरीच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होईल, असे अपेक्षित नव्हते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुरीच्या दराचा अंदाज घेता व्यापाऱ्यांनी नफा मिळविण्याचा दृष्टीने बाजारपेठेत विक्रीस आलेला तुरीचा माल नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने जून २०१६ पर्यंत खरेदी करून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. अनेक व्यापाऱ्यांकडे ५०० ते २ हजार क्विंटलपर्यंत तुरीची साठवून ठेवलेली आहे. प्रतिक्विंटल झालेले तीन हजार रुपयाचे नुकसान पाहता व्यापाऱ्यांनाही कोट्यवधींचा फटका बसला आहे. तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही बाजारपेठेत तुरडाळीचे दर मात्र १२० रुपयांच्या आसपास आहेत. आजचे तुरीचे दर पाहता बाजारात तूरडाळीचा दर ८५ ते ९० रुपयेच असायला पाहिजे होता. त्यामुळे हजारो कोटींची लाखो टन तूरडाळ आयात करूनही सरकारकडून सामान्य नागरिकांना डाळीचे भाव स्थिर ठेवण्यात यश आलेले नाही. शासनाचा या चुकीच्या आयात धोरणात शेतकऱ्यांचे व व्यापारींचे मरण होत आहे. शासकीय बगळ्यांमुळे दालमिल व्यापारीही तूर खरेदी करताना साठवणुकीचा विचार न करता आवश्यक तेवढाच माल खरेदी करीत आहे. परिणामी बाजारपेठेत तूर खरेदीची चढाओढ इतिहासजमा झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)