शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पायाभरणीसाठी ‘लाखाची’ मदत

By admin | Updated: April 10, 2016 00:05 IST

निम्नपेढी प्रकल्पग्रस्त अळणगाव व कुंड (खुर्द) येथील कुटुंबांना पुनर्वसनस्थळी घराच्या पायाभरणीसाठी प्रती कुटुंब एक लाख रुपये मिळणार आहेत.

प्रकल्पग्रस्तांना दिलासा : ९०० कुटुंबांना लाभअमरावती : निम्नपेढी प्रकल्पग्रस्त अळणगाव व कुंड (खुर्द) येथील कुटुंबांना पुनर्वसनस्थळी घराच्या पायाभरणीसाठी प्रती कुटुंब एक लाख रुपये मिळणार आहेत. उभय गावांचे पुनर्वसन कठोरा शिवारात होणार आहे; तथापि या भागात काळी माती असल्याने ‘जोता’ बांधण्यासाठीच लक्षावधीचा खर्च येणार आहे. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मूळ घराचा मोबदला मिळाल्यानंतर उभय गावांचे पुनर्वसन गावठानात स्थलांतर होणार आहे. उभय गावांतील कुटुंबांसाठी येथे भूखंड पाडण्यात आले आहेत. तथापि, घराचे बांधकाम करण्यापूर्वी पायाभरणीचा खर्च अधिक असल्याने हा खर्च शासनाने द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. यासाठी स्थानिक आमदार सुनील देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश येऊन आता पेढी प्रकल्पबाधित प्रत्येक कुटुंबाला घराच्या पायाभरणीसाठी १ लाख रुपये मिळतील. यासाठी अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सु. गो. राठी यांनी प्रयत्न केले. या मदतीमुळे प्रकल्पग्रस्तांचे घरबांधणीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या अनुषंगाने शनिवारी आ. देशमुख यांनी पुनर्वसन स्थळ गाठून मुलभूत सुविधांची पाहणी केली तथा अधिकाऱ्यांना योग्य ते दिशानिर्देश दिले. अळणगावचे सतीश मेटांगे व अन्य ग्रामस्थांनी यावेळी देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी प्रकल्प बांधकाम विभागाचे सु. गो. राठी, नगरसेवक प्रदीप दंदे, माजी महापौर विलास काशीकर आणि उभय गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. अळणगाव आणि कुंड खुर्द येथील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कठोरा ते रेवसा या मार्गावरील शेतात आहे. याठिकाणी प्रचंड बाभूळबन झाले होते. शनिवारच्या कार्यक्रमापूर्वी अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने पुनर्वसन स्थळावरील बाभूळबन जेसीबीने काढून टाकले. याठिकाणी आता जायचा मार्ग प्रशस्त बनला आहे. याशिवाय पुनर्वसित ग्रामस्थांना घरे बांधण्यासाठी पाण्याची सोय असल्याने व आज प्रथमच या ठिकाणी सामूहिक भोजन झाल्याने ग्रामस्थांनी जल्लोष केला. पुनर्वसन विभागाने अळणगाव येथील ग्रामस्थांना फक्त भूखंडाचे वाटप केले आहे. मात्र प्रत्यक्षात आपला भूखंड कुठे आहे? याबाबत सारेच अनभिज्ञ आहेत. (प्रतिनिधी)प्र्रकल्पग्रस्तांनो, आता पटकन या!अळणगाव आणि कुंड खुर्द येथील पुनर्वसित कुटुंबांना कठोरा पुनर्वसन स्थळी घरे बांधण्यापूर्वी पायाभरणीसाठी प्रतिकुटुंब एक लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी आ. सुनील देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. त्यानिमित्ताने कठोरा पुनर्वसनस्थळी देशमुखा यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनो, आता त्वरित पुनर्वसनस्थळी घरे बांधायला सुरुवात करा, गावाच्या मोहातून बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले. याखेरीज पुनर्वसनातील अन्य मूलभूत सुविधा विनाविलंब करण्याच्या सूचना उपस्थित अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाला दिल्यात. हे महाराष्ट्रातील आदर्श पुनर्वसन होईल, असे काम करून दाखवा, अशी साद देशमुखांनी घातली.