शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

आर्द्रतेचा अभाव, तूर वांझोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:26 IST

यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे, अशा भागात पिकांची वाढ खुंटून तुरीला शेंगा पकडल्या नाहीत, असा अहवाल कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञासह कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यात भेटी दरम्यान दिला.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठ पथकाचा अहवाल : सरासरीपेक्षा कमी पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे, अशा भागात पिकांची वाढ खुंटून तुरीला शेंगा पकडल्या नाहीत, असा अहवाल कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञासह कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यात भेटी दरम्यान दिला.जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीसह काही तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले. या ठिकाणी तूर जागीच वाळत असून, शेंगादेखील धरल्या नाहीत, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्यात. या भागात क्षेत्रभेटी देण्यासाठी कृषी विद्यापीठाला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील प्रादेशिक अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ व विस्तार कृषी विद्याव्यक्ता हेमंत डिके, वनस्पतिरोग शास्त्रज्ञ धीरज वसुले यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाºयांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव, चिंचोली व सातेगाव आदी ठिकाणी भेटी दिल्यात.सर्व शेतकºयांनी जुलैच्या तिसºया आठवड्यात मारोती या वाणाची पेरणी केलेली आहे. सद्यस्थितीत या पिकाची वाढ खुंटलेली आहे. या ठिकाणी सरासरीच्या केवळ ४० टक्केच पाऊस झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. कमी पावसामुळे तुरीच्या फुलोराचे रूपांतर शेंगांमध्ये झालेले नाही जमीनीत पुरेशी आर्द्रता नसल्यामुळेच. शेंगा धरल्या नसल्याचा निष्कर्ष या पथकाने काढला. या स्थितीमुळे खरिपातील अंतिम पिकातही तोटा आल्याने शेतकºयांची स्थिती शोचनीय झाली आहे.पाच तालुक्यांतील तूर दवाळबाधितजिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात कमी पावासाने तूर वांझोटी राहिली, तर अमरावती, भातकुली, चांदूरबाजार, मोर्शी व अचलपूर तालुक्यात अतिथंडीमुळे शेंगा भरलेली तूर जागच्या जागी सुकायला लागली आहे. तुरीवर दवाळ गेल्यामुळे अशी स्थिती ओढावली असल्याचे कृषी विभागाने सांगितले. या बाधित तूर पिकांचे शासनाने सर्वेक्षण करून नैसर्गिक आपत्तीची मदत शासनाने द्यावी, अशी मागणी आहे.