शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

महाआघाडीतील समन्वय अभावाचा मराठा आरक्षणाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

(फोटो) अमरावती : मराठा आरक्षणाबाबत महाआघाडी सरकारमध्ये समन्वयचा अभाव आहे. सर्वोच्च न्यायालयात योग्य युक्तिवाद झाला नाही. याशिवाय कागदपत्रेही पुरविली ...

(फोटो)

अमरावती : मराठा आरक्षणाबाबत महाआघाडी सरकारमध्ये समन्वयचा अभाव आहे. सर्वोच्च न्यायालयात योग्य युक्तिवाद झाला नाही. याशिवाय कागदपत्रेही पुरविली नसल्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.

विदर्भात कुणबी समाजाचे मराठा समाजाला पाठबळ आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले जात असल्याने मराठा संघटनांशी सध्या संवाद सुरू आहे. याविषयी शनिवारी दोन बैठकी झाल्याचे पाटील म्हणाले. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत महाआघाडी सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक आणायला पाहिजे. त्यानंतर राज्यपाल महोदयांकडून या विधेयकाला मंजुरी घ्यावी व भोसले आयोगाच्या शिफारशींसह केंद्र शासनाकडे पाठवावे. राज्य सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास केंद्र शासनाकडून सहकार्य मिळेल, असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला.

पत्रपरिषदेला भाजपचे आमदार प्रताप अडसड, महापौर चेतन गावंडे, माजी आमदार अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, प्रदेश सदस्य आसावरी देशमुख, नगरसेविका सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते.