शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

इर्विन रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:39 IST

दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देगरजूंची रक्तासाठी धावाधाव : शिबिर आयोजनाची नितांत आवश्यकता

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.इर्विन रुग्णालयातील रक्तपेढीतून जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो तसेच जिल्ह्यातील आठ ब्लड स्टोअरेजमध्येही रक्तपुरवठा केला जातो. यासाठी जिल्ह्यातील विविध भागातील महाविद्यालये, सामाजिक संघटनांद्वारे आयोजित रक्तदान शिबिरांमार्फत रक्त संकलन केले जातात.सध्या दिवाळीच्या सुट्या आल्याने सामाजिक संघटना इतर कामात व्यस्त, तर विद्यार्थ्यांना सुट्या असल्याने ते बाहेरगावी गेल्यामुळे शिबिरे झालेली नाहीत. त्यामुळे इर्विन रक्तपेढीत रक्त संकलन प्रक्रिया थांबल्यामुळे विविध ग्रुपच्या रक्ताची आवश्यकता भासत आहे. परिणामी सिकलसेल, हिमोफिलिया, थॅलेसिमियाचे रुग्णांना रक्तपुरवठा करणे कठीण जात आहे तसेच रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांची इतरत्र धावाधाव सुरू आहे.दिवाळी भेट म्हणून रक्तदान करण्याची संकल्पना राबविल्यास ती अमरावतीकरांसाठी सुंदर उपक्रम ठरू शकतो. याबाबत विद्यार्थी, युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. हल्ली रक्तदान शिबिरे घेण्याची नितांत गरज असल्याचे इर्विन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर म्हणाले.आठ ब्लड स्टोअरेजमध्ये रक्तपुरवठाजिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचाराकरिता येणाºया रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास ते जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत तसेच दुर्गम भागात वेळीच रक्तपुरवठा व्हावा, या उद्देशाने इर्विनच्या रक्तपेढीमार्फत जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, चुरणी, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अचलपूर व डफरीन रुग्णालयात रक्तपुरवठा केला जातो.एबी, बी पॉझिटिव्ह रक्त मिळणे दुरापास्तसध्या रक्तपेढीत प्रत्येक ग्रुपमध्ये सात ते आठ बॅग रक्त जमा असून, एबी आणि बी पॉझिटिव्ही रक्त उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ग्रुपच्या रुग्णांना रक्त मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहे.दिवाळीची भेट देण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे, त्याचप्रमाणे रुग्णांच्या वाढच्या गरजेनुसार नागरिकांनी रक्तदान शिबिर घेऊन जीवनज्योती योजनेप्रमाणे गरजू रुग्णांना दिवाळी भेट द्यायला हवी.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक