शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

इर्विन रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:39 IST

दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देगरजूंची रक्तासाठी धावाधाव : शिबिर आयोजनाची नितांत आवश्यकता

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.इर्विन रुग्णालयातील रक्तपेढीतून जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो तसेच जिल्ह्यातील आठ ब्लड स्टोअरेजमध्येही रक्तपुरवठा केला जातो. यासाठी जिल्ह्यातील विविध भागातील महाविद्यालये, सामाजिक संघटनांद्वारे आयोजित रक्तदान शिबिरांमार्फत रक्त संकलन केले जातात.सध्या दिवाळीच्या सुट्या आल्याने सामाजिक संघटना इतर कामात व्यस्त, तर विद्यार्थ्यांना सुट्या असल्याने ते बाहेरगावी गेल्यामुळे शिबिरे झालेली नाहीत. त्यामुळे इर्विन रक्तपेढीत रक्त संकलन प्रक्रिया थांबल्यामुळे विविध ग्रुपच्या रक्ताची आवश्यकता भासत आहे. परिणामी सिकलसेल, हिमोफिलिया, थॅलेसिमियाचे रुग्णांना रक्तपुरवठा करणे कठीण जात आहे तसेच रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांची इतरत्र धावाधाव सुरू आहे.दिवाळी भेट म्हणून रक्तदान करण्याची संकल्पना राबविल्यास ती अमरावतीकरांसाठी सुंदर उपक्रम ठरू शकतो. याबाबत विद्यार्थी, युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. हल्ली रक्तदान शिबिरे घेण्याची नितांत गरज असल्याचे इर्विन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर म्हणाले.आठ ब्लड स्टोअरेजमध्ये रक्तपुरवठाजिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचाराकरिता येणाºया रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास ते जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत तसेच दुर्गम भागात वेळीच रक्तपुरवठा व्हावा, या उद्देशाने इर्विनच्या रक्तपेढीमार्फत जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, चुरणी, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अचलपूर व डफरीन रुग्णालयात रक्तपुरवठा केला जातो.एबी, बी पॉझिटिव्ह रक्त मिळणे दुरापास्तसध्या रक्तपेढीत प्रत्येक ग्रुपमध्ये सात ते आठ बॅग रक्त जमा असून, एबी आणि बी पॉझिटिव्ही रक्त उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ग्रुपच्या रुग्णांना रक्त मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहे.दिवाळीची भेट देण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे, त्याचप्रमाणे रुग्णांच्या वाढच्या गरजेनुसार नागरिकांनी रक्तदान शिबिर घेऊन जीवनज्योती योजनेप्रमाणे गरजू रुग्णांना दिवाळी भेट द्यायला हवी.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक