शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

जळगांव आर्वीतच होणार कृषीसमृद्धी केंद्र

By admin | Updated: August 18, 2016 00:02 IST

राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून....

पालकमंत्र्यांनी केली जागेची पाहणी : -आता शासकीय भूखंडावरच साकारणार बिझनेस हब धामणगावरेल्वे : राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून आता १४४ हेक्टरच्या शासकीय भूखंडातच हा हब साकारला जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले.मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हायवे धामणगाव तालुक्यातील १५ गावांमधून जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी दुपारी तालुक्यातील दोन ठिकाणांची पाहणी केली. यवतमाळ-धामणगाव मार्गावरील सावळा फाटा येथे उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. जागेची पाहणी केल्यानंतर जळगांव आर्वी येथील औद्योगिक क्षेत्राची सुद्धा पालकमंत्र्यांनी पाहणी केली. मालधक्क्याचा दळणवळणासाठी वापरअमरावती : परिसरातील १४४ हेक्टरमध्ये शासकीय बिझनेस हब साकारला जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाकरिता जमिनीची कमतरता भासल्यास तिवसा मार्गावरील ६८ एकर प्रकल्पामुळे जळगांव औद्योगिक परिक्षेत्राचे रूप पालटणार असून परिसरातील शेकडो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. धामणगाव-जळगांव आर्वी हा रस्ता सुद्धा ६ पदरी करून त्यामार्गे धामणगाव रेल्वे येथील मालधक्क्याचा उपयोग दळणवळणासाठी केला जाणार आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकल्पात आता शासनाने आधी शासकीय जमिनचा वापर करुन हब साकारण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. जळगाव आर्वी येथील औद्योगिक परिक्षेत्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा नियोजन अधिकारी काळे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे, राजगडकर, प्रवीण देसली, दिनेश विधाते, मंगेश कवाडे,श्रीकांत घुगे, जळगांव आर्वी येथील धीरज मुडे आदी उपस्थित होते.दत्तापूर पांदण रस्ता महामार्गाला जोडणारजळगाव आर्वी ते दत्तापूर या पांदण रस्त्याचा विकास करण्यात येणार असून त्या रस्त्याला महामार्गाशी जोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दिली. या कॉरीडोर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.