शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोयता, चाकूचे ३२ वार युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

चित्रा चौकातील अवी मेडिकलसमोर घडली. जुन्या वादातून धारदार शस्त्राचे ३२ वार करण्यात आले. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचित्रा चौकातील थरारक घटना : सहा अटकेत, एक ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोयता व चाकूने शरीरावर सपासप वार करून युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना प्रजासत्ताक दिनी रात्री ८.२० वाजताच्या सुमारास चित्रा चौकातील अवी मेडिकलसमोर घडली. जुन्या वादातून धारदार शस्त्राचे ३२ वार करण्यात आले. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.मनीष कन्हैयालाल गुप्ता (३२, रा. विलासनगर) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये विशाल विजयसिंह परिहार (२०), सुरेश जयसिंह चांदणे (२०), आदेश प्रमोद सावंत (२०), पवन मोरेश्वर सोळंके (२४, सर्व रा. विलासनगर), किरण कमलेश शेवणे (२३), भारत ऊर्फ मख्खी अर्जुन घुगे (२०) यांचा समावेश आहे. एका अल्पवयीनाला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्व आरोपींविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी कलम ३०७, ३०२, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. याप्रकरणी मृताचा भाऊ शीतल कन्हैयालाल गुप्ता (४०, रा. विलासनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.पोलीस सूत्रांनुसार, किरण शेवणेचा भाऊ शरद शेवणे व मृत मनीष यांच्यात वर्षभरापूर्वी भांडण झाले होते. मनीषने शरदवर चाकूने वार केल्याने त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक करून तडीपार करण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी मनीषचे भारत घुगे याच्याशीही पानटपरीवर भांडण झाले होते. अल्पवयीन आरोपीलाही त्याने मारहाण केली होती. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी रविवारी सातही आरोपींनी मनीषला चित्रा चौकात गाठले व त्याच्या शरीरावर कोयता-चाकूने ३२ वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनीषला नातेवाईक, नागरिक व पोलिसांच्या मदतीने प्रथम इर्विन रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला राजापेठ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान रात्री १२.४५ वाजता त्याचा मृत्यू झाला.शहर कोतवाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, उपनिरीक्षक गजानन राजमलु, राजेंद्र चाटे, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र उमक, डीबी पथकाचे अब्दुल कलाम, नायक पोलीस कॉन्स्टेबल नीलेश जुनघरे, जुनेद खान, इम्रान खान, आशिष विघे, गजानन ढेवले, विनोद मालवे, अमोल यादव, सागर ठाकरे, मनीष सावरकर यांच्या पथकाने पंचनामा केला व आरोपींचा माग घेतला.जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली. एक अल्पवयीन ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.- शिवाजी बचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली ठाणे

टॅग्स :Murderखून