शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील कोल्हापुरी बंधारे आटले

By admin | Updated: May 7, 2016 00:44 IST

मेळघाटातील कोल्हापुरी बंधाऱ्यात यावर्षी थेंबभरही पाणी शिल्लक न राहिल्याने भीषण जलसंकट निर्माण झाले आहे.

जलसंकट : वन्य प्राण्यांची पाण्यासाठी गावाकडे धावश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील कोल्हापुरी बंधाऱ्यात यावर्षी थेंबभरही पाणी शिल्लक न राहिल्याने भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. तसेच नदी-नाले पूर्णपणे आटल्याने वन्यप्राणी पूर्वीच पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत असतानाचे अनेक उदाहरण आहेत. अशातच सर्व बंधारे आटल्याने पाळीव प्राण्यांनाही पाण्याची भीषण जाणवण्याची चिन्ह आहे. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तालुक्यात उतावली, कढाव, हरिसाल, धूळघाट, कळमखार, रोहणीखेडा, गडगा मालूर येथे कोल्हापुरी बंधारे निर्माण केले. हे बंधारे सदोष असल्याने दरवर्षी पाणी वाहून जात आहे. पूर्वीच कोट्यवधी खर्च करून आता दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रूपये कोल्हापुरी बंधाऱ्यावर उधळण्यात येत आहेत. मात्र दुखणे डोक्याला व निदान पोटाचा अशा प्रकार लघुसिंचन विभाग करीत आहे. केवळ थातूरमातूर कामे करून लाखो रूपयांची देयके अधिकारी व कंत्राटदारांच्या घशात जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकारीसुद्धा अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुसरीकडे गडगा, सिपना, सावरा, खंडू या नद्यांसह लहान-मोठे नाले व नद्या कोरडे पडले आहेत. सिंचनासाठी पाण्याचा सर्रास वापर केल्याने आता थेंबभर पाणीही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे गावातील गुरेढोरे पाण्यासाठी इतरत्र भटकत असल्याचे चित्र आहे. परिणामी येत्या १५ दिवसांत गुरेढोरे मरण्याचा प्रकार समोर आल्यास नवल वाटायचे कारण नाही. गावाजवळील नदी-नाल्यांची अशी अवस्था असताना व्याघ्र व प्रादेशिक जंगलातील नदी-नाले तर जानेवारी महिन्यातच कोरडे पडले आहे. त्यामुळे जंगलातील अस्वल, रानडुक्कर, बिबट, गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे अनेकांवर हल्ला झाल्याचे प्रकार समोर आले आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले असून कृत्रिम पाणवठ्यातसुद्धा पाण्याचा थेंब नाही.