शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

मेळघाटातील कोल्हापुरी बंधारे आटले

By admin | Updated: May 7, 2016 00:44 IST

मेळघाटातील कोल्हापुरी बंधाऱ्यात यावर्षी थेंबभरही पाणी शिल्लक न राहिल्याने भीषण जलसंकट निर्माण झाले आहे.

जलसंकट : वन्य प्राण्यांची पाण्यासाठी गावाकडे धावश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील कोल्हापुरी बंधाऱ्यात यावर्षी थेंबभरही पाणी शिल्लक न राहिल्याने भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. तसेच नदी-नाले पूर्णपणे आटल्याने वन्यप्राणी पूर्वीच पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत असतानाचे अनेक उदाहरण आहेत. अशातच सर्व बंधारे आटल्याने पाळीव प्राण्यांनाही पाण्याची भीषण जाणवण्याची चिन्ह आहे. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तालुक्यात उतावली, कढाव, हरिसाल, धूळघाट, कळमखार, रोहणीखेडा, गडगा मालूर येथे कोल्हापुरी बंधारे निर्माण केले. हे बंधारे सदोष असल्याने दरवर्षी पाणी वाहून जात आहे. पूर्वीच कोट्यवधी खर्च करून आता दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रूपये कोल्हापुरी बंधाऱ्यावर उधळण्यात येत आहेत. मात्र दुखणे डोक्याला व निदान पोटाचा अशा प्रकार लघुसिंचन विभाग करीत आहे. केवळ थातूरमातूर कामे करून लाखो रूपयांची देयके अधिकारी व कंत्राटदारांच्या घशात जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकारीसुद्धा अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुसरीकडे गडगा, सिपना, सावरा, खंडू या नद्यांसह लहान-मोठे नाले व नद्या कोरडे पडले आहेत. सिंचनासाठी पाण्याचा सर्रास वापर केल्याने आता थेंबभर पाणीही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे गावातील गुरेढोरे पाण्यासाठी इतरत्र भटकत असल्याचे चित्र आहे. परिणामी येत्या १५ दिवसांत गुरेढोरे मरण्याचा प्रकार समोर आल्यास नवल वाटायचे कारण नाही. गावाजवळील नदी-नाल्यांची अशी अवस्था असताना व्याघ्र व प्रादेशिक जंगलातील नदी-नाले तर जानेवारी महिन्यातच कोरडे पडले आहे. त्यामुळे जंगलातील अस्वल, रानडुक्कर, बिबट, गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे अनेकांवर हल्ला झाल्याचे प्रकार समोर आले आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले असून कृत्रिम पाणवठ्यातसुद्धा पाण्याचा थेंब नाही.