शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कौंडण्यपूरचा अस्थीघाट घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:47 IST

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील अस्थिविसर्जन घाटाला अस्वच्छतेने घेरले आहे. दूरवरून लोक येथे अस्थिकलश घेऊन, दशक्रिया करण्यासाठी येतात. गणपती व दुर्गादेवी विसर्जनसुद्धा याच ठिकाणी करण्यात येते. मात्र, अलीकडे हा परिसर इतका बकाल आणि अस्वच्छ झाला आहे की, येथील घाटाकडे पाय वळत नाहीत.

ठळक मुद्देमोक्ष मिळणार कसा? : शुल्क वसुली कशाची? सुविधांची वानवा

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील अस्थिविसर्जन घाटाला अस्वच्छतेने घेरले आहे. दूरवरून लोक येथे अस्थिकलश घेऊन, दशक्रिया करण्यासाठी येतात. गणपती व दुर्गादेवी विसर्जनसुद्धा याच ठिकाणी करण्यात येते. मात्र, अलीकडे हा परिसर इतका बकाल आणि अस्वच्छ झाला आहे की, येथील घाटाकडे पाय वळत नाहीत.केरकचरा व निर्माल्य नदीकाठालगत साचले आहे. त्यामुळे श्रद्धेने येणाऱ्या नागरिकांना घाण व दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नदीघाटावर पूजाविधी करण्यासाठी शुल्क आकारले जाते. जर शुल्क घेत असाल, तर किमानपक्षी आवश्यक सुविधा व स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी शुल्क जमा करणाऱ्यांची नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अगदी घाटाशेजारी मलबा साचला असल्याने धार्मिक विधी करण्यास लोक धजावत नाहीत.वर्धा नदी अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आलेली नाही किंवा गाळही काढण्यात आलेला नाही. येथील स्वच्छता व इतर कारभाराची जबाबदारी कुणाची, हे समजायला मार्ग नाही. स्थानिक ग्रामपंचायतीचे या घाटाकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. अस्थिघाटावर सुरक्षा कठडे नसल्याने लोक थेट खोल पाण्यात जातात. नदीचा उपसा झाला नसल्याने अनेक जण त्यात जाऊन फसले आणि काहींचा मृत्यू झाल्याची बाब स्थानिक सांगतात. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत .नागरिकांचा भ्रमनिरासघाटावर पूजाविधीसाठी शासकीय निधीमधून मोठे सभागृह बांधण्यात आले. मात्र, त्या सभागृहात पंखे, वीज, टेबल व अन्य सुविधा नाहीत. नागरिकांना बसण्यासाठी झाडे किंवा हॉटेल शोधावे लागते. नदीपात्रात उतरल्यानंतर अनुचित प्रसंग उद्भवल्यास साधी प्राथमिक व्यवस्थाही उपलब्ध नाही. त्यामुळे या घाटावर विधी करण्यासाठी आकारलेले शुल्क कशासाठी, हा प्रश्न निर्माण होतो.सदर अस्थिघाटाच्या देखभालीसाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. घाटाची देखरेख व स्वच्छतेची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. मात्र, कंत्राटदार अधिक रक्कम घेत असेल, तर कारवाई करण्यात येईल. अस्वच्छतेबाबत त्यास जाब विचारू.- रुचिता चव्हाणसरपंच, कौंडण्यपूर ग्रा.पं.