शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रहाटगाव मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:26 IST

अमरावती : शहराचे पूर्वेकडील प्रवेशदार समजले जाणाऱ्या रहाटगाव येथील मुख्य रस्त्याची दीड वर्षापासून डागडुजीअभावी अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. ...

अमरावती : शहराचे पूर्वेकडील प्रवेशदार समजले जाणाऱ्या रहाटगाव येथील मुख्य रस्त्याची दीड वर्षापासून डागडुजीअभावी अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. नागपूर महामार्गापासून गावातील जुन्या वस्तीपर्यंत मुख्य रस्त्याला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. त्यातच पावसाचे पाणी साचून हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

चाळण झालेल्या रस्त्यातून मार्गक्रमण करताना नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. कामावर जाणारे स्त्रिया तसेच वरिष्ठ नागरिक दुचाकी चालवताना घसरून पडल्यामुळे जखमी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. महामार्गापासून शहराला शेगावमार्गे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने रहदारी खूप वाढलेली आहे. त्यातच खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात व प्रदूषण वाढीस लागले आहे. एकीकडे शहरातील सर्व भागात सिमेंटची दोन - दोन फूट उंच रस्ते झाले. मात्र, रहाटगाव येथील रस्त्याचे साधे डांबरीकरणही होत नसल्यामुळे हा भाग अत्यंत भकास अवस्थेत आहे. शासनाने या रस्त्याचे पक्के बांधकाम त्वरित करून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.