शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

‘राजा’ दुष्काळदाहात होरपळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:17 IST

लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे.

ठळक मुद्देनेते प्रचारात मश्गूल : आठ तालुक्यांतील वेदना जाहीरनाम्यात बेदखल

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याच्या वेदनेला स्थान मिळालेले नाही. निवडणुकीच्या गदारोळात खेडेगावांतील मतदारराजाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे भान या नेत्यांना नसल्याची शोकांतिका आहे.प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. या स्थितीत दुष्काळदाहात होरपळणाऱ्या मतदारराजाची अवस्था मात्र बिकट झालेली आहे. शेतातील विहिरींचे दिवसागणिक खोल जाणारे पाणी त्याच्या डोळ्यांच्या धारांनीही भरून आलेलं नाही. जिवापाड जगविलेल्या संत्राबागेचं पान न पान गळायला लागलं, तसतसा बळीराजा आतून तुटला आहे. तसे पाहता जिल्ह्याच्या गावगावांत हीच स्थिती आहे. यंदाच्या खरिपात कमी पावसाने नगदी पिके गारद झाली. धारणी वगळता उर्वरित १३ तालुक्यांची पैसेवारी ही ५० च्या आत आहे. शासनाने मात्र कागदोपत्री छळ चालवित केवळ चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार व मोर्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून ‘एनडीआरएफ’च्या सवलती दिल्यात. उर्वरित दर्यापूर, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरूड व अमरावती तालुक्यात पैसेवारीच्या आधारावर दुष्काळस्थिती जाहीर केली. मात्र, कुठल्याच प्रकारचा निधी दिलेला नाही. आता तर निवडणुकांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही याचा विसर पडलेला आहे.जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्के कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याचे नगदी पीक सोयाबीनसह ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडीददेखील उद्ध्वस्त झालेत. उत्पादनखर्चाच्या तुलनेत ५० टक्केही शेतमाल उत्पादन झालेले नाही. पावसाच्या दीर्घ दडीने कपाशी पिकाची वाढ खुंटली व गुलाबी बोंडअळीच्या तडाख्यात कापसाची वाट लागली.जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाने १३ तालुक्यांची पैसेवारी कमी लावून पाच तालुक्यांतच दुष्काळ जाहीर केला,तर उर्वरीत आठ तालुक्यांची सवलतीवरच बोळवण केली. ज्या तालुक्यांना मदत जाहीर केली, ती चार टप्प्यात देण्यात आली. त्यातही अर्ध्याअधिक शेतकºयांना आजही मदतनिधी मिळाला नाही, हे जिल्ह्याचे वास्तव आहे.७३१ दुष्काळी गावांची सवलतींवरच बोळवणजिल्ह्यातील कमी पैसेवारीच्या आठ तालुक्यांत शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. या तालुक्यातील ७३१ गावे दुष्काळाची भीषण स्थिती अनुभवत आहेत. यात अमरावती तालुक्यातील १०५, भातकुली ६९, चांदूर रेल्वे ७४, धामणगाव रेल्वे ८३, नांदगाव खंडेश्वर १६१, चांदूर बाजार ८४ व दर्यापूर तालुक्यातील ८६ गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना शासनाने दुष्काळी मदतनिधी न देता केवळ आठ प्रकारच्या सवलतींवरच बोळवण केलेली आहे.१५ मंडळात दुष्काळ; मदतनिधी नाहीयंदा ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या निकषावर जिल्ह्यातील १५ गावांना दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार दुष्काळ जाहीर केला; मात्र मदतनिधी दिलेला नाही. केवळ जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, कृषिकर्जाच्या वसुलीस स्थगिती, शाळा- महाविद्यालयांची शुल्कमाफी, रोहयोच्या कामाच्या निकषात सुधारणा आदी सवलती जाहीर केल्यात. मात्र, यातील अनेक सवलतींचा लाभ शेतकरी व त्यांच्या पाल्यांना मिळालेला नाही, हे जिल्ह्याचे दुदैव आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019