शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘राजा’ दुष्काळदाहात होरपळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:17 IST

लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे.

ठळक मुद्देनेते प्रचारात मश्गूल : आठ तालुक्यांतील वेदना जाहीरनाम्यात बेदखल

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याच्या वेदनेला स्थान मिळालेले नाही. निवडणुकीच्या गदारोळात खेडेगावांतील मतदारराजाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे भान या नेत्यांना नसल्याची शोकांतिका आहे.प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. या स्थितीत दुष्काळदाहात होरपळणाऱ्या मतदारराजाची अवस्था मात्र बिकट झालेली आहे. शेतातील विहिरींचे दिवसागणिक खोल जाणारे पाणी त्याच्या डोळ्यांच्या धारांनीही भरून आलेलं नाही. जिवापाड जगविलेल्या संत्राबागेचं पान न पान गळायला लागलं, तसतसा बळीराजा आतून तुटला आहे. तसे पाहता जिल्ह्याच्या गावगावांत हीच स्थिती आहे. यंदाच्या खरिपात कमी पावसाने नगदी पिके गारद झाली. धारणी वगळता उर्वरित १३ तालुक्यांची पैसेवारी ही ५० च्या आत आहे. शासनाने मात्र कागदोपत्री छळ चालवित केवळ चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार व मोर्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून ‘एनडीआरएफ’च्या सवलती दिल्यात. उर्वरित दर्यापूर, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरूड व अमरावती तालुक्यात पैसेवारीच्या आधारावर दुष्काळस्थिती जाहीर केली. मात्र, कुठल्याच प्रकारचा निधी दिलेला नाही. आता तर निवडणुकांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही याचा विसर पडलेला आहे.जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्के कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याचे नगदी पीक सोयाबीनसह ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडीददेखील उद्ध्वस्त झालेत. उत्पादनखर्चाच्या तुलनेत ५० टक्केही शेतमाल उत्पादन झालेले नाही. पावसाच्या दीर्घ दडीने कपाशी पिकाची वाढ खुंटली व गुलाबी बोंडअळीच्या तडाख्यात कापसाची वाट लागली.जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाने १३ तालुक्यांची पैसेवारी कमी लावून पाच तालुक्यांतच दुष्काळ जाहीर केला,तर उर्वरीत आठ तालुक्यांची सवलतीवरच बोळवण केली. ज्या तालुक्यांना मदत जाहीर केली, ती चार टप्प्यात देण्यात आली. त्यातही अर्ध्याअधिक शेतकºयांना आजही मदतनिधी मिळाला नाही, हे जिल्ह्याचे वास्तव आहे.७३१ दुष्काळी गावांची सवलतींवरच बोळवणजिल्ह्यातील कमी पैसेवारीच्या आठ तालुक्यांत शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. या तालुक्यातील ७३१ गावे दुष्काळाची भीषण स्थिती अनुभवत आहेत. यात अमरावती तालुक्यातील १०५, भातकुली ६९, चांदूर रेल्वे ७४, धामणगाव रेल्वे ८३, नांदगाव खंडेश्वर १६१, चांदूर बाजार ८४ व दर्यापूर तालुक्यातील ८६ गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना शासनाने दुष्काळी मदतनिधी न देता केवळ आठ प्रकारच्या सवलतींवरच बोळवण केलेली आहे.१५ मंडळात दुष्काळ; मदतनिधी नाहीयंदा ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या निकषावर जिल्ह्यातील १५ गावांना दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार दुष्काळ जाहीर केला; मात्र मदतनिधी दिलेला नाही. केवळ जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, कृषिकर्जाच्या वसुलीस स्थगिती, शाळा- महाविद्यालयांची शुल्कमाफी, रोहयोच्या कामाच्या निकषात सुधारणा आदी सवलती जाहीर केल्यात. मात्र, यातील अनेक सवलतींचा लाभ शेतकरी व त्यांच्या पाल्यांना मिळालेला नाही, हे जिल्ह्याचे दुदैव आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019