शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

सोयाबीनचे क्विंटलऐवजी किलोत उत्पादन

By admin | Updated: October 30, 2014 22:45 IST

पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही.

चांदूरबाजार : पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही. आले ते उत्पादन क्विंटलऐवजी किलोत आहे. त्यामुळे गणोजा, सोनोरी परिसरातील सोयाबीन उत्पादकांनी पीक काढणीचा खर्च तरी वाचेल म्हणून उभे पीकच वखरुन टाकले आहे.तालुक्यात २१ हजारांवर हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक होते. त्यात ६० टक्के शेतामधील सोयाबीनचे उत्पादन झाले तर ४० टक्के शेतातील सोयाबीन अज्ञात रोगामुळे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. यावर कळस म्हणजे अत्यल्प प्रमाणात उत्पादन झालेले सोयाबीन कुठे विकायचे, अशी स्थिती आल्याने ते बाजारातून हरपले आहे. कापूस खरेदीचा मुहूर्त नसल्याने शेतकरी पूरता आर्थिक अडचणीत सापडला आहे. यात सुरुवातीला अस्मानी संकटाने समस्या निर्माण केली तर त्यानंतर तीन महिन्यापासून सरकारच अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांचा नेमका वाली कोण? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.एकीकडे खरीप हंगाम हातचा गेला तर दुसरीकडे रबी हंगामाचे नियोजन आर्थिक अडचणींमुळे कोलमडले आहे. चारही बाजंूनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, दिवाळीच्या मोसमात राज्यात एकाच दिवशी तब्बल सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव विसरून चालणार नाही. सोयाबीनचे उत्पादन नाही. उत्पादन खर्चाचाही भुर्दंड शेतकऱ्यांवर बसला असताना रोखीचे पीक म्हणून आता शेतकऱ्यांचे भवितव्य कापसावर अवलंबून आहे. कापसाच्या हमी भावातही शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसत आहे. शासनाने यंदा कापसाचा हमीभाव जाहीर करताना क्विंटलमागे ५० रूपयाची वाढ करून शेतकऱ्याविषयीचा कळकळा दाखवून दिला आहे. उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली. खते, तणनाशके, किटकनाशके, मजुरीत प्रचंड वाढ झाली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च एकरी १२ हजार रूपये आहे, बागायती कपाशी एकरी ३५ हजार तर कोरडवाहू १८ ते २० हजारापर्यंत उत्पादन खर्च येतो. सोयाबीन उच्च प्रतिचा ३ हजार तर कपाशी उच्च प्रतीची ३ हजार ८०० रूपये, कपाशीवरही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही ठिकाणी कापसाची झाडे उपटून हरभरा पेरण्यात आला. इतकी दयनीय अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. नेते मंडळी दोन महिन्यापासून निवडणुकीत व्यस्त होती तर शेतकरी पिकांचे भविष्य शोधत होता. निवडणुकीत आश्वासनाचा पूर वाहत असला तरी शेतकरी मात्र पावसाच्या एका थेंबासाठी तडफडत होता. आता तर रबी पिकासाठी जमिनीत ओलावा नाही, ही नवीन समस्या आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)