शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बच्चू कडूंचा झेडपीत ठिय्या

By admin | Updated: September 4, 2016 00:16 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत सन २००७-०८ पासून शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही.

आंतरजिल्हा बदल्याचा मुद्दा : आश्वासनानंतर माघारअमरावती : जिल्हा परिषदेअंतर्गत सन २००७-०८ पासून शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार शिक्षक संघटनेने मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.सन २०१०-११ मध्ये २९३ रिक्त पदांचा बनावट अहवाल दाखवून सरळ सेवा भरतीने शिक्षकांची नियमबाह्य २४८ पदे भरणे ही बाब भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी असल्याचे स्पष्ट करीत आ. कडू यांनी आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया व झालेली शिक्षक पदांची नियमबाह्य भरतीची कायदेशीर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, रखडलेली बदलीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, राज्यपाल यांची अधिसूचना ५ मार्च २०१५ च्या पेसा कायद्यान्वये आदिवासी क्षेत्रातील शिक्षक संवर्गाची मंजूर १ हजार ४०० पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या (एस.टी) उमेदवारांमधून भरावयाची आहेत. त्यामुळे ही पदे भरण्यास बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे पदभरती होईपर्यंत आंतरजिल्हा बदलीने ही पदे तात्पुरत्या स्वरूपात या शिक्षकांना सामावून आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, रिक्त पदांवर आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना बुलडाणा जि.प.ने केलेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी सीईओंच्या दालनात ठिय्या दिला. दरम्यान प्रहार आंदोलन मागे घेण्यात आले. याशिवाय शिक्षण विभागाने चक्क कोमात गेलेल्या शिक्षकांची व एका अपंग शिक्षकांची मेळघाटात नियमबाह्य बदली केल्याचाही नमुना सीईओंच्या निदर्शनास आणून दिला. पालघटरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यापही वस्तीशाळा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी महेश ठाकरे, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, चंदू खेडकर, वडस्कर, स्मिता पानझाडे, अविनाश मेश्राम, दिलीप धोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जीर्ण वर्गखोल्यांच्या बांधकामास प्राधान्य द्या!शिक्षण विभागामार्फत जीर्ण वर्ग खोल्याचे बांधकाम करण्यासाठी कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे भातकुली तालुक्यातील आष्टी शाळेतील वर्गखोल्या धोकादायक आहेत. मात्र अशा ठिकाणी प्राधान्य न देता. सदस्य व पदाधिकारी यांच्या मर्जीनुसारच खोल्यांचे बांधकाम केले आहे. हा प्रकार चुकीचा असून यापुढे अत्यावश्यक असलेल्या शाळांत खोल्या बांधण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे आणि ज्याही वर्गखोल्यांचे बांधकाम सध्या सुरू आहेत, तेथे विशेष पथक स्थापन करून खरच वर्गखोली बांधकामाची गरज होती काय, याची पडताळणी करावी, अशी विचारणा आ.कडू यांनी केली.शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे. एकीकडे राज्यात भाजप सरकारला सभागृहात शिक्षणाच्या मुद्यावर धारेवर धरणाऱ्या कॉग्रेसची सत्ता झेडपीत आहे. याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष आहे.- बच्चू कडू, आमदार, अचलपूरआंतरजिल्हा बदल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार योग्य कारवाईच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी दर महिन्याला बैठक घेतली जाईल.- किरण कुलकर्णी, सीईओ झेडपी