शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त खरिपाची पैसेवारी ५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:31 IST

यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकातील काहीही हाती लागलेले नसताना जिल्ह्यातील १९६३ गावांपैकी १७६५ गावांची पैसेवारी प्रशासनाने ५८ पैसे काढली आहे.

ठळक मुद्देउफराटा न्याय : सुधारितमध्येही १७८५ गावांना डावलले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकातील काहीही हाती लागलेले नसताना जिल्ह्यातील १९६३ गावांपैकी १७६५ गावांची पैसेवारी प्रशासनाने ५८ पैसे काढली आहे.सोंगणीचा खर्चही निघणे कठीण असल्याने हजारो हेक्टरमधील सोयाबीनच्या उभ्या पिकात शेतकºयांनी नांगर फिरविला. मूग, उडीद केव्हाच बाद झाले. बीटीचे बोंड अळींनी पोखरले. संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झाला. केवळ तूर तेवढी बचावली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी सुधारित ५८ पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यातील १७८५ गावांना उफराटा न्याय देण्यात आल्याने शेतकºयांमध्ये चीड व्यक्त केली जात आहे. सुधारित पैसेवारीदेखील वास्तवाला धरून नाही, असा आरोप शेतकºयांचा आरोप आहे.जिल्ह्यात पावसाची ३३ टक्के तूट आहे. अल्प पावसामुळे ६० दिवसांच्या अवधीचे मूग-उडीद बाद झाले. सोयाबीनला शेंगाच नसल्यामुळे उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली. बचावलेल्या सोयाबीनमधून उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. कपाशीवर लाल्या व गुलाबी बोंड अळी आहे. अशा स्थितीत उर्वरित १७८५ गावांमध्ये ‘आलबेल’ दाखविण्याचा परिणाम पीक विम्याच्या दाव्यांवर होणार आहे.नजरअंदाजने पीक विमाही होणार बाधितजिल्ह्यात अपुºया पावसामुळे खरिपाचा हंगाम बाधित झाला असतानाही महसूल विभागाद्वारा सर्वेक्षण करण्यात आलेले नाही, उलट नजरअंदाज पैसेवारी ६६ पैसे जाहीर करण्यात आली. आता पीक विम्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस हा निकष असला तरी जिल्ह्याची नजरअंदाज ६६ व सुधारित ५८ पैसेवारीमुळे विमा कंपन्यांचे फावते. याचा थेट फटका शेतकºयांना बसणार आहे.१७८ गावांना न्याय, पैसेवारी ५० पैशांच्या आतसुधारित पैसेवारीत जिल्ह्यातील १९६३ गावांची पैसेवारी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये १७८ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. या गावांना न्याय मिळाला. यामध्ये सर्वाधिक १२४ गावे अंजनगावसुर्जी तालुक्यातील आहेत. दर्यापूर तालुक्यात ४५, भातकुली ७ व चिखलदरा तालुक्यातील दोन गावांचा यामध्ये समावेश आहे. याच गावांतील पिकांसारखी स्थिती असणाºया दीड हजारांवर गावांना मात्र सुधारित पैसेवारी डावलण्यात आले आहे.