शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

उद्ध्वस्त खरिपाची पैसेवारी ५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:31 IST

यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकातील काहीही हाती लागलेले नसताना जिल्ह्यातील १९६३ गावांपैकी १७६५ गावांची पैसेवारी प्रशासनाने ५८ पैसे काढली आहे.

ठळक मुद्देउफराटा न्याय : सुधारितमध्येही १७८५ गावांना डावलले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकातील काहीही हाती लागलेले नसताना जिल्ह्यातील १९६३ गावांपैकी १७६५ गावांची पैसेवारी प्रशासनाने ५८ पैसे काढली आहे.सोंगणीचा खर्चही निघणे कठीण असल्याने हजारो हेक्टरमधील सोयाबीनच्या उभ्या पिकात शेतकºयांनी नांगर फिरविला. मूग, उडीद केव्हाच बाद झाले. बीटीचे बोंड अळींनी पोखरले. संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झाला. केवळ तूर तेवढी बचावली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी सुधारित ५८ पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यातील १७८५ गावांना उफराटा न्याय देण्यात आल्याने शेतकºयांमध्ये चीड व्यक्त केली जात आहे. सुधारित पैसेवारीदेखील वास्तवाला धरून नाही, असा आरोप शेतकºयांचा आरोप आहे.जिल्ह्यात पावसाची ३३ टक्के तूट आहे. अल्प पावसामुळे ६० दिवसांच्या अवधीचे मूग-उडीद बाद झाले. सोयाबीनला शेंगाच नसल्यामुळे उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली. बचावलेल्या सोयाबीनमधून उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. कपाशीवर लाल्या व गुलाबी बोंड अळी आहे. अशा स्थितीत उर्वरित १७८५ गावांमध्ये ‘आलबेल’ दाखविण्याचा परिणाम पीक विम्याच्या दाव्यांवर होणार आहे.नजरअंदाजने पीक विमाही होणार बाधितजिल्ह्यात अपुºया पावसामुळे खरिपाचा हंगाम बाधित झाला असतानाही महसूल विभागाद्वारा सर्वेक्षण करण्यात आलेले नाही, उलट नजरअंदाज पैसेवारी ६६ पैसे जाहीर करण्यात आली. आता पीक विम्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस हा निकष असला तरी जिल्ह्याची नजरअंदाज ६६ व सुधारित ५८ पैसेवारीमुळे विमा कंपन्यांचे फावते. याचा थेट फटका शेतकºयांना बसणार आहे.१७८ गावांना न्याय, पैसेवारी ५० पैशांच्या आतसुधारित पैसेवारीत जिल्ह्यातील १९६३ गावांची पैसेवारी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये १७८ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. या गावांना न्याय मिळाला. यामध्ये सर्वाधिक १२४ गावे अंजनगावसुर्जी तालुक्यातील आहेत. दर्यापूर तालुक्यात ४५, भातकुली ७ व चिखलदरा तालुक्यातील दोन गावांचा यामध्ये समावेश आहे. याच गावांतील पिकांसारखी स्थिती असणाºया दीड हजारांवर गावांना मात्र सुधारित पैसेवारी डावलण्यात आले आहे.