शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार हेक्टरवरील सोयाबीनवर खोडमाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

धामणगाव तालुक्यातील शेतकरी दरवर्षी विविध संकटांना सामोरे जात आहे. कधी अल्प पाऊस तर कधी अधिक पाऊस पडतो मागील वर्षी दिवाळीपर्यंत पाऊस असल्याने सोयाबीनचा दाणा घरी आला नाही. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दिवाळीही अंधारात गेली होती. यंदा कामनापूर घुसळी, तळेगाव दशासर, काशीखेड पिंपळखुटा, अंजनसिंगी या भागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देपिके सडली : वाढ खुंटली, सर्वेक्षण, मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तीन वर्षात कमी-अधिक पडणारा पाऊस, त्यात उत्पन्नात होत असलेली तुट अशातच यंदा तालुक्यातील २५ हजार हेक्टरवरील सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे पिवळसर पडली. तर झाडांची वाढही खुंटली असल्याने शेतक ऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले आहे.धामणगाव तालुक्यातील शेतकरी दरवर्षी विविध संकटांना सामोरे जात आहे. कधी अल्प पाऊस तर कधी अधिक पाऊस पडतो मागील वर्षी दिवाळीपर्यंत पाऊस असल्याने सोयाबीनचा दाणा घरी आला नाही. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दिवाळीही अंधारात गेली होती. यंदा कामनापूर घुसळी, तळेगाव दशासर, काशीखेड पिंपळखुटा, अंजनसिंगी या भागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील सर्वच गावातील शेतकºयांनी आपल्या भागात खोड माशीचा प्रादुर्भाव झाला असल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला नोंदविल्या आहे. पिपळखुटा येथील भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता बचत गटाचे शेतकरी आपल्या शेतातील सोयाबीनवर आलेल्या या खोडमाशीने करपलेली झाडे घेऊनच तालुका कचेरीवर धडकले. तहसीलदार भगवान कांबळे यांना भेटून आपली कैफियत मांडली आहे. आमदार प्रताप अडसड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान होत असलेल्या सोयाबीनची पाहणी केली आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या वैज्ञानिक पथक दोन दिवसांपासून तालुक्यातील गावाचा दौरा करीत आहे .यंदा आपल्या घरात पीक येईल उत्पन्न होईल. अशी आशा असताना खोडमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांनी पाहिलेले स्वप्न पुन्हा धुळीस मिळण्याची वेळ आली आहे.शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सांगितलेल्या उपाय योजना राबवाव्यात. सोयाबिन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.-अजय तळेगावकर, तालुका कृषी अधिकारीआमच्या भागातील शंभर टक्के सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकाची वाढ खुंटली. सोयाबीनला शेंगा नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाची भेट घेऊन कैफियत मांडली. त्वरित भरपाई मिळणे गरजेचे आहे.-गजानन राऊत,शेतकरी, पिंपळखुटा

टॅग्स :agricultureशेती