शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

अचलपूर तालुक्यातील खरिपाची पिके धोक्यात

By admin | Updated: September 8, 2015 00:13 IST

जवळपास २५ दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस, वातावरणात निर्माण झालेली उष्णता त्यामुळे पिके कोमजत आहेत.

पावसाची प्रतीक्षा : शेतकरी चिंतेत, उत्पन्नात घटीची शक्यतासुनील देशपांडे अचलपूरजवळपास २५ दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस, वातावरणात निर्माण झालेली उष्णता त्यामुळे पिके कोमजत आहेत. दुसरीकडे संत्राबागांवर पडत असलेला कोळशीचा विळखा, कपाशीवर घोंगावणाऱ्या पांढऱ्या माशीचे संकट, झाडावरच पिवळे पडत असलेले घड आदी संकटांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे. जवळपास २५ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसामुळे सद्यस्थितीत पिके धोक्यात आली आहेत. याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून पेरलेली ही पिके शेतात डौलाने उभी असताना २५ दिवसांपासून अचलपूर तालुक्यात पावसाने दांडी मारली आहे. आज येईल उद्या येईल या आशेवर शेतकरी दिवस कंठत आहे. पावसाची विश्रांती अजूनही संपत नाही. सद्यस्थितीत पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. सोयाबीन शेंगावर आले आणि पऱ्हाटी फुलावर येत आहे. पाऊस आल्यास सोयाबीनच्या शेंगांची भराई चांगली होईल आणि पऱ्हाटीच्या फुलांची म्हणजेच पुढे त्यालाच येणाऱ्या बोंडांचीही संख्या वाढेल. पर्यायाने कापसाचे उत्पादन चांगले होईल. पिकांना पाणी नसल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. काहींची पिके हातातून जाण्याचे चित्र आहेत. शेतकऱ्यावर वरूणराजा कोपला असताना वेगवेगळ्या पिकांवर रोगांचे संकट यायला लागल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीचे दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.