शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

खरिपाची पैसेवारी ४६ पैसे

By admin | Updated: November 15, 2014 22:36 IST

जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप वर्षाकरिता पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार १५ नोव्हेंबरला निश्चित केली. ही पैसेवारी ४६ पैसे म्हणजे पन्नास पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील

जिल्हा दुष्काळाच्या छायेत : शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळण्याचा मार्ग मोकळागजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यात २०१४-१५ या खरीप वर्षाकरिता पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार १५ नोव्हेंबरला निश्चित केली. ही पैसेवारी ४६ पैसे म्हणजे पन्नास पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून सोयी-सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.१४ तहसीलदारांकडून आलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ३० सप्टेंबरला नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली. ती ६० पैशांच्या आसपास होती. त्यानंतर सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. सुधारित पैसेवारी निश्चितलागवडीयोग्य असणाऱ्या १,९८१ गावातील नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक होती. वास्तविक यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस, निकृष्ट बियाणे, पावसात खंड, दुबार पेरणी यामुळे मूग व उडीद बाद झाले. सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपाचे पीक हातून गेले, रबीसाठी जमिनीत आर्द्रता नाही, शेतकरी आर्थिक संकटात असताना नजर अंदाज आकडेवारी ५० टक्क्यांवर आल्याने शेतकरी संभ्रमात होता. मात्र प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे, खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीचे अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील १४ तहसीलदारांकडून प्राप्त अहवालाच्या आधारे खरीप पिकाची सुधारित पैसेवारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा व धारणी या १४ ही तालुक्यांमधील लागवडीयोग्य ११८१ गावांमधील खरीप पिकांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत म्हणजे ४६ पैसे निश्चित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत, सवलती मिळण्याचा मार्ग खुला आहे.अशी आहे नजरअंदाज पैसेवारीपिकांची प्रत्यक्ष नजरेने पाहणी करुन प्रथम नजरअंदाज पैसेवारी काढण्यात येते. यासाठी सर्व प्रकाराच्या जमिनीवरील पिकांच्या पाहणीसाठी प्रत्येक गावात प्रमुख पिकांचे १२ भूखंड निवडले जातात. या पैसेवारीनंतर कोणत्याही कारणाने पिकाच्या उत्पादन स्थितीत बदल झाल्यास सुधारित पैसेवारी काढण्यात येते. यावर्षी ही पैसेवारी ४६ पैसे आहे. शेतकऱ्यांना मिळणार मदत, सवलतपैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदत व सवलतींचा लाभ दिला जातो. त्या अनुशंगाने जिल्ह्यातील खरिप पिकाची सुधारीत पैसेवारी ४६ पैसे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत व सवलतीचा मार्ग मोकळा झाला आहे.