शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

खरिपाची पैसेवारी ४६ पैसे

By admin | Updated: November 15, 2014 22:36 IST

जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप वर्षाकरिता पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार १५ नोव्हेंबरला निश्चित केली. ही पैसेवारी ४६ पैसे म्हणजे पन्नास पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील

जिल्हा दुष्काळाच्या छायेत : शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळण्याचा मार्ग मोकळागजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यात २०१४-१५ या खरीप वर्षाकरिता पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार १५ नोव्हेंबरला निश्चित केली. ही पैसेवारी ४६ पैसे म्हणजे पन्नास पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून सोयी-सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.१४ तहसीलदारांकडून आलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ३० सप्टेंबरला नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली. ती ६० पैशांच्या आसपास होती. त्यानंतर सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. सुधारित पैसेवारी निश्चितलागवडीयोग्य असणाऱ्या १,९८१ गावातील नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक होती. वास्तविक यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस, निकृष्ट बियाणे, पावसात खंड, दुबार पेरणी यामुळे मूग व उडीद बाद झाले. सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपाचे पीक हातून गेले, रबीसाठी जमिनीत आर्द्रता नाही, शेतकरी आर्थिक संकटात असताना नजर अंदाज आकडेवारी ५० टक्क्यांवर आल्याने शेतकरी संभ्रमात होता. मात्र प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे, खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीचे अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील १४ तहसीलदारांकडून प्राप्त अहवालाच्या आधारे खरीप पिकाची सुधारित पैसेवारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा व धारणी या १४ ही तालुक्यांमधील लागवडीयोग्य ११८१ गावांमधील खरीप पिकांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत म्हणजे ४६ पैसे निश्चित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत, सवलती मिळण्याचा मार्ग खुला आहे.अशी आहे नजरअंदाज पैसेवारीपिकांची प्रत्यक्ष नजरेने पाहणी करुन प्रथम नजरअंदाज पैसेवारी काढण्यात येते. यासाठी सर्व प्रकाराच्या जमिनीवरील पिकांच्या पाहणीसाठी प्रत्येक गावात प्रमुख पिकांचे १२ भूखंड निवडले जातात. या पैसेवारीनंतर कोणत्याही कारणाने पिकाच्या उत्पादन स्थितीत बदल झाल्यास सुधारित पैसेवारी काढण्यात येते. यावर्षी ही पैसेवारी ४६ पैसे आहे. शेतकऱ्यांना मिळणार मदत, सवलतपैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदत व सवलतींचा लाभ दिला जातो. त्या अनुशंगाने जिल्ह्यातील खरिप पिकाची सुधारीत पैसेवारी ४६ पैसे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत व सवलतीचा मार्ग मोकळा झाला आहे.