शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाचे ३७ हजार हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर; रबीची होणार क्षेत्रवाढ

By admin | Updated: August 25, 2015 00:22 IST

खरीप हंगामाचा कालावधी संपला आहे. साधारपणे १५ आॅगस्टला कृषी विभाग अंतिम अहवाल जाहीर करतो.

अमरावती : खरीप हंगामाचा कालावधी संपला आहे. साधारपणे १५ आॅगस्टला कृषी विभाग अंतिम अहवाल जाहीर करतो. यंदा मात्र कृषी विभागाने नियोजन केलेल्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत अद्यापही ३७ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. हे क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राची सुरुवात होते. ही जिल्ह्यात खरीप हंगामाची सुरुवात असते. मान्सून सक्रिय असल्यास जून अखेरीस फार तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाचा हंगाम संपतो. खरीप हंगामासाठी सर्वसाधारण अशी स्थिती असते. मात्र मागील तीन वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरिपाच्या हंगामावर परिणाम होत आहे. दरवर्षीच्या खरीप पेरणीला जुलैअखेर ते आॅगस्ट महिना उजाडत आहे. यंदा २० आॅगस्टपर्यंत ९५ टक्केच क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही ३७ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात ७२ टक्केच पेरणी झालेली आहे. या तालुक्यात ५७ हजार ९७० सरासरी खरिपाचे क्षेत्र असताना ४१ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. अद्यापही १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर आहे. चिखलदरा तालुक्यात ३० हजार ५२० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत २३ हजार ४३० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही ७ हजार ९० हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. त्यामुळे हे क्षेत्र नापेर राहणार आहे व हे नापेर क्षेत्र रबीमध्ये रुपांतरित होणार आहे. (प्रतिनिधी)यंदा अचलपूर, चिखलदरा तालुका माघारलानांदगावने केली खरिपाची सरासरी पारनांदगाव खंडेश्वर तालुक्यात कृषी विभागाने ५८ हजार ४५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले होते. मात्र सद्यस्थितीत ६४ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, याची टक्केवारी ११० एवढी आहे. दर्यापूर तालुक्यात १०८ टक्के पेरणी झालेली आहे. अन्य १२ तालुक्यांची पेरणी सरासरीच्या आत आहेत. अपेक्षित सरासरी इतका पाऊ सजिल्ह्यात १ जून ते २३ आॅगस्टदरम्यान पावसाची ५८५.५ मि.मी. टक्केवारी अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ५९०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या आठवड्यात पाऊस निरंक आहे. अजून ४ ते ५ दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही. २७ आॅगस्टनंतर पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.