शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

खरिपाचे ३७ हजार हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर; रबीची होणार क्षेत्रवाढ

By admin | Updated: August 25, 2015 00:22 IST

खरीप हंगामाचा कालावधी संपला आहे. साधारपणे १५ आॅगस्टला कृषी विभाग अंतिम अहवाल जाहीर करतो.

अमरावती : खरीप हंगामाचा कालावधी संपला आहे. साधारपणे १५ आॅगस्टला कृषी विभाग अंतिम अहवाल जाहीर करतो. यंदा मात्र कृषी विभागाने नियोजन केलेल्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत अद्यापही ३७ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. हे क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राची सुरुवात होते. ही जिल्ह्यात खरीप हंगामाची सुरुवात असते. मान्सून सक्रिय असल्यास जून अखेरीस फार तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाचा हंगाम संपतो. खरीप हंगामासाठी सर्वसाधारण अशी स्थिती असते. मात्र मागील तीन वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरिपाच्या हंगामावर परिणाम होत आहे. दरवर्षीच्या खरीप पेरणीला जुलैअखेर ते आॅगस्ट महिना उजाडत आहे. यंदा २० आॅगस्टपर्यंत ९५ टक्केच क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही ३७ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात ७२ टक्केच पेरणी झालेली आहे. या तालुक्यात ५७ हजार ९७० सरासरी खरिपाचे क्षेत्र असताना ४१ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. अद्यापही १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर आहे. चिखलदरा तालुक्यात ३० हजार ५२० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत २३ हजार ४३० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही ७ हजार ९० हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. त्यामुळे हे क्षेत्र नापेर राहणार आहे व हे नापेर क्षेत्र रबीमध्ये रुपांतरित होणार आहे. (प्रतिनिधी)यंदा अचलपूर, चिखलदरा तालुका माघारलानांदगावने केली खरिपाची सरासरी पारनांदगाव खंडेश्वर तालुक्यात कृषी विभागाने ५८ हजार ४५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले होते. मात्र सद्यस्थितीत ६४ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, याची टक्केवारी ११० एवढी आहे. दर्यापूर तालुक्यात १०८ टक्के पेरणी झालेली आहे. अन्य १२ तालुक्यांची पेरणी सरासरीच्या आत आहेत. अपेक्षित सरासरी इतका पाऊ सजिल्ह्यात १ जून ते २३ आॅगस्टदरम्यान पावसाची ५८५.५ मि.मी. टक्केवारी अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ५९०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या आठवड्यात पाऊस निरंक आहे. अजून ४ ते ५ दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही. २७ आॅगस्टनंतर पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.