शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

खरिपाचे ३७ हजार हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर; रबीची होणार क्षेत्रवाढ

By admin | Updated: August 25, 2015 00:22 IST

खरीप हंगामाचा कालावधी संपला आहे. साधारपणे १५ आॅगस्टला कृषी विभाग अंतिम अहवाल जाहीर करतो.

अमरावती : खरीप हंगामाचा कालावधी संपला आहे. साधारपणे १५ आॅगस्टला कृषी विभाग अंतिम अहवाल जाहीर करतो. यंदा मात्र कृषी विभागाने नियोजन केलेल्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत अद्यापही ३७ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. हे क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राची सुरुवात होते. ही जिल्ह्यात खरीप हंगामाची सुरुवात असते. मान्सून सक्रिय असल्यास जून अखेरीस फार तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाचा हंगाम संपतो. खरीप हंगामासाठी सर्वसाधारण अशी स्थिती असते. मात्र मागील तीन वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरिपाच्या हंगामावर परिणाम होत आहे. दरवर्षीच्या खरीप पेरणीला जुलैअखेर ते आॅगस्ट महिना उजाडत आहे. यंदा २० आॅगस्टपर्यंत ९५ टक्केच क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही ३७ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात ७२ टक्केच पेरणी झालेली आहे. या तालुक्यात ५७ हजार ९७० सरासरी खरिपाचे क्षेत्र असताना ४१ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. अद्यापही १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर आहे. चिखलदरा तालुक्यात ३० हजार ५२० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत २३ हजार ४३० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही ७ हजार ९० हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. त्यामुळे हे क्षेत्र नापेर राहणार आहे व हे नापेर क्षेत्र रबीमध्ये रुपांतरित होणार आहे. (प्रतिनिधी)यंदा अचलपूर, चिखलदरा तालुका माघारलानांदगावने केली खरिपाची सरासरी पारनांदगाव खंडेश्वर तालुक्यात कृषी विभागाने ५८ हजार ४५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले होते. मात्र सद्यस्थितीत ६४ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, याची टक्केवारी ११० एवढी आहे. दर्यापूर तालुक्यात १०८ टक्के पेरणी झालेली आहे. अन्य १२ तालुक्यांची पेरणी सरासरीच्या आत आहेत. अपेक्षित सरासरी इतका पाऊ सजिल्ह्यात १ जून ते २३ आॅगस्टदरम्यान पावसाची ५८५.५ मि.मी. टक्केवारी अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ५९०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या आठवड्यात पाऊस निरंक आहे. अजून ४ ते ५ दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही. २७ आॅगस्टनंतर पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.