शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पावसामुळे खरीप पेरणी ८८ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यात पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस येत असल्याने खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आलेला आहे. आतापर्यंत प्रस्तावित ६,९८,७९६ हेक्टर ...

अमरावती : जिल्ह्यात पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस येत असल्याने खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आलेला आहे. आतापर्यंत प्रस्तावित ६,९८,७९६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६,१३,६८० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ८७.८२ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक २,३८,३५२ हेक्टर सोयाबीन व २,१०,६९२ हेक्टर कपाशीचे पेरणी क्षेत्र आहे.

जूनच्या ३० तारखेपासून ९ जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या होत्या, तर खरिपाची अर्धेअधिक पेरणी रखडली होती. यात किमान २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट असताना ९ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट टळले. याशिवाय पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांनादेखील गती आलेली आहे.

कृषी विभागाच्या बुधवारच्या अहवालानुसार धारणी तालुक्यात ३६,८८० हेक्टर, चिखलदरा १७,२७७, अमरावती ४८,३८२, भातकुली ३,८९४, नांदगाव खं. ६१,१७३, चांदूर रेल्वे ३९,१५७, तिवसा ३७,६९०, मोर्शी ५५,४४८, वरुड ४६,६४७, दर्यापूर ५८,९९१, अंजनगाव सुर्जी ४०,१४६, अचलपूर ३६,९८०, चांदूरबाजार ३६,९५१ व धामणगाव रेल्वे ५४,०२९ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. आतापर्यंत ५,३४० हेक्टर धान, १०,९६९ हेक्टर ज्वारी, १०,६६९ मका, १,१२,३४३ तूर्, १३,३८५ मूग, ४,६३३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. २० जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने यंदाच्या पेरण्या आटोपणार असल्याचे चित्र आहे.

बॉक्स

सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र

सद्यस्थितीत धारणी तालुक्यात ९,७४८ हेक्टर, चिखलदरा ६,१६६, अमरावती २६,९४५, भातकुली २५,४३५, नांदगाव ५४,६८१, चांदूर रेल्वे २३,६६१, तिवसा १६,०२५, मोर्शी १३,६०२, वरुड १,६३०, दर्यापूर १०,९५९, अंजनगाव सुर्जी १४,१६८, अचलपूर ८,०४७, चांदूरबाजार ११,७५२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २४,५३१ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे.

बॉक्स

कपाशीचीही क्षेत्रवाढ

आतापर्यंत धारणी तालुक्यात ८,५३९ हेक्टर, चिखलदरा १,८०५, अमरावती १३,६४०, भातकुली १०,२१५, नांदगाव ६,०४६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १५,७७०, मोर्शी २५,५९२, वरुड २५,९४४, दर्यापूर २५,७९९, अंजनगाव सुर्जी १४,९५२, अचलपूर १७,८७१, चांदूरबाजार १५,१४६ व धामणगाव रेल्वे २१,०८७ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झालेली आहे.