शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

यंदा सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये खरीप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:08 IST

यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी कृषी विभागाद्वारा सुरू झाली आहे. प्रस्तावित नियोजनानुसार जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये यंदा पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे नियोजन : सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी कृषी विभागाद्वारा सुरू झाली आहे. प्रस्तावित नियोजनानुसार जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये यंदा पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक दोन लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर दोन लाख १० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. याविषयीचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल कृषी संचालकांना पाठविण्यात आला.गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात पेरणीक्षेत्रात १० ते १५ टक्कयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाद्वारा नियोजन सुरू असले तरी यंदाचा पावसाळा कसा राहील, याविषयीचे कोणतेही अधिकृत भाष्य हवामान विभागाद्वारा करण्यात आलेले नाही. किबंहुना गतवर्षीच्या खरिपात हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला व या विभागावर नामुष्की ओढावली असल्याचे वास्तव आहे.प्रस्तावित पेरणी क्षेत्राच्या नियोजनानुसार यंदा सर्वाधिक दोन लाख ९५ हजार हेक्टर सोयाबीनचे पेरणीक्षेत्र राहणार आहे. तूर एक लाख तीस हजार हेक्टर, संकरीत ज्वार २८ हजार हेक्टर, बाजरा १०० हेक्टर, मका ८ हजार हेक्टर, मूग ३३ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, भुईमूग तीन हजार हेक्टर, सुर्यफूल १०० हेक्टर, तीळ २५० हेक्टर, संकरीत कपाशी एक लाख ८५ हजार हेक्टर, सुधारीत कपाशी पाच हजार हेक्टर, धान व इतर पिके १० हजार ६०० हेक्टरमध्ये राहणार आहे.यंदाच्या हंगामासाठी सार्वजनिकमधून ७१ हजार ४९० क्विंटल बियाण्यांची आवशक्यता आहे. यामध्ये ज्वार १,१५० क्विंटल, मका ५०, तूर तीन हजार, मूग ६००, उडीद एक हजार ६००, सोयाबीन ६५ हजार, संकरीत कपाशी १०, सुधारीत कपाशी १० व इतर पिकांसाठी ३० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. खासगीमधून एक लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. यामध्ये सर्वाधिक एक लाख ३२ हजार ७५० क्विंटल सोयाबीन, ६ हजार २४० क्विंटल तूर, दोन हजार ३४० क्विंटल उडीद, एक हजार ३८६ क्विंटल मूग व ६०० क्विंटल भुईमूग बियाण्यांची गरज आहे.असे लागणार बियाणेयंदाच्या खरिपासाठी एकुण एक लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये २,८०० क्विंटल ज्वार, बाजरा चार, मका ८३२, तूर ६,२४०, मूग १,३८६, उडीद २,३४०, भुईमूग ६००,सुर्यफूल १०, तीळ १.५, सोयाबीन १,३२,६५०, संकरीत कपाशी ४,१६२, सुधारीत कपाशी ६०० व इतर पिकांचे २६७ किंटल बियाणे लागणार आहे.महाबीजकडे ६६,३९० क्विंटलची मागणीयंदाच्या हंगामासाठी ६६ हजार ३९० क्विंटलची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली. यामध्ये संकरीत ज्वार १,१५० क्विंटल, मका ५०, तूर ३,०००, मूग ६००, उडीद १,५००, सोयाबीन ६०,०००, संकरीत कपाशी १० सुधारीत कपाशी १० व इतर बियाण्यांच्या ३० क्विंटलची मागणी करण्यात आलेली आहे. याव्यतिरीक्त उडीदाची १०० क्विंटल व सोयाबीनचे ५,००० क्विंटल बियाण्यांची मागणी ‘एनएससी’ कडे करण्यात आली.