शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

यंदा सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये खरीप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:08 IST

यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी कृषी विभागाद्वारा सुरू झाली आहे. प्रस्तावित नियोजनानुसार जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये यंदा पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे नियोजन : सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी कृषी विभागाद्वारा सुरू झाली आहे. प्रस्तावित नियोजनानुसार जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये यंदा पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक दोन लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर दोन लाख १० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. याविषयीचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल कृषी संचालकांना पाठविण्यात आला.गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात पेरणीक्षेत्रात १० ते १५ टक्कयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाद्वारा नियोजन सुरू असले तरी यंदाचा पावसाळा कसा राहील, याविषयीचे कोणतेही अधिकृत भाष्य हवामान विभागाद्वारा करण्यात आलेले नाही. किबंहुना गतवर्षीच्या खरिपात हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला व या विभागावर नामुष्की ओढावली असल्याचे वास्तव आहे.प्रस्तावित पेरणी क्षेत्राच्या नियोजनानुसार यंदा सर्वाधिक दोन लाख ९५ हजार हेक्टर सोयाबीनचे पेरणीक्षेत्र राहणार आहे. तूर एक लाख तीस हजार हेक्टर, संकरीत ज्वार २८ हजार हेक्टर, बाजरा १०० हेक्टर, मका ८ हजार हेक्टर, मूग ३३ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, भुईमूग तीन हजार हेक्टर, सुर्यफूल १०० हेक्टर, तीळ २५० हेक्टर, संकरीत कपाशी एक लाख ८५ हजार हेक्टर, सुधारीत कपाशी पाच हजार हेक्टर, धान व इतर पिके १० हजार ६०० हेक्टरमध्ये राहणार आहे.यंदाच्या हंगामासाठी सार्वजनिकमधून ७१ हजार ४९० क्विंटल बियाण्यांची आवशक्यता आहे. यामध्ये ज्वार १,१५० क्विंटल, मका ५०, तूर तीन हजार, मूग ६००, उडीद एक हजार ६००, सोयाबीन ६५ हजार, संकरीत कपाशी १०, सुधारीत कपाशी १० व इतर पिकांसाठी ३० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. खासगीमधून एक लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. यामध्ये सर्वाधिक एक लाख ३२ हजार ७५० क्विंटल सोयाबीन, ६ हजार २४० क्विंटल तूर, दोन हजार ३४० क्विंटल उडीद, एक हजार ३८६ क्विंटल मूग व ६०० क्विंटल भुईमूग बियाण्यांची गरज आहे.असे लागणार बियाणेयंदाच्या खरिपासाठी एकुण एक लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये २,८०० क्विंटल ज्वार, बाजरा चार, मका ८३२, तूर ६,२४०, मूग १,३८६, उडीद २,३४०, भुईमूग ६००,सुर्यफूल १०, तीळ १.५, सोयाबीन १,३२,६५०, संकरीत कपाशी ४,१६२, सुधारीत कपाशी ६०० व इतर पिकांचे २६७ किंटल बियाणे लागणार आहे.महाबीजकडे ६६,३९० क्विंटलची मागणीयंदाच्या हंगामासाठी ६६ हजार ३९० क्विंटलची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली. यामध्ये संकरीत ज्वार १,१५० क्विंटल, मका ५०, तूर ३,०००, मूग ६००, उडीद १,५००, सोयाबीन ६०,०००, संकरीत कपाशी १० सुधारीत कपाशी १० व इतर बियाण्यांच्या ३० क्विंटलची मागणी करण्यात आलेली आहे. याव्यतिरीक्त उडीदाची १०० क्विंटल व सोयाबीनचे ५,००० क्विंटल बियाण्यांची मागणी ‘एनएससी’ कडे करण्यात आली.