शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाचे नियोजन आता गावपातळीवर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:13 IST

अमरावती : खरीप हंगामाचे नियोजन अनेक वर्षांपासून जिल्हा व राज्यस्तरावर केले जात आहे. त्यात गावच्या गरजांचा प्रभावीपणे समावेश होत ...

अमरावती : खरीप हंगामाचे नियोजन अनेक वर्षांपासून जिल्हा व राज्यस्तरावर केले जात आहे. त्यात गावच्या गरजांचा प्रभावीपणे समावेश होत नसल्याचे लक्षात आल्याने शासनाने ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रगतिशील शेतकरी यांचा समावेश असलेली ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती खरीप हंगाम २०२१ चा ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करणार असून त्यासाठी कृषी विभागाने गावोगावी कोरोनाचे नियम पाळून बैठकी सुरू केल्या आहेत. कृषिमंत्री यांच्या सूचनेनुसार ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. समितीत शेतीविषयक बाबींवर चर्चा होऊन गावातील जमीन पर्जन्यमान सिंचन सुविधा उपलब्ध साधनसामग्री दळणवळण माती परीक्षण आधारित जमिनप्रकार या बाबींचा विचार करून आराखडा करण्यात येणार आहे. गावातील पीकक्षेत्र, उत्पादकता काय आहे व पुढील नियोजन गावचा जमीन सुपीकता निर्देशांक फलक पाहून खताच्या संतुलित वापरास प्रोत्साहन देणे किमान १० टक्के रासायनिक खतांची बचत होऊन उत्पादन खर्च कमी करणे पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन हंगामात पीक रचना व पीक पद्धतीत बदल करणे, विकेल ते पिकेल अभियानाचा उद्देश विचारात घेऊन मागणी असलेल्या नवीन पिकांची लागवड क्षेत्र वाढविणे, मूल्य साखळीचे नियोजन करणे, कृषिमाल प्रक्रिया उद्योग उभारणी या बाबींवर लक्ष केंद्रित करून प्रचार प्रसिद्धी व अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

कोट

वरिष्ठस्तरावरून मिळालेल्या सूचनेप्रमाणे खरीप हंगामाचे नियोजन गावस्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून बैठकी घेतल्या जात आहे. यात ठरलेल्या नियोजनानुसार ३० एप्रिलपर्यंत याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.

- विजय चव्हाळे,

कृषी अधीक्षक अधिकारी