शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

तालुक्यात ४६ हजार१२७ हेक्टरसाठी खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

पान २ ची बॉटम चांदूरबाजार: साधारणतः मृग नक्षत्रापासून शेतीचा खरिप हंगाम सुरू होतो. अंदाजे १५ दिवसांवर खरिप हंगामा ...

पान २ ची बॉटम

चांदूरबाजार: साधारणतः मृग नक्षत्रापासून शेतीचा खरिप हंगाम सुरू होतो. अंदाजे १५ दिवसांवर खरिप हंगामा येऊन ठेपला आहे. मान्सूनचा पाऊस येण्याच्या कालावधीवर शेतीचा हा हंगाम मागे पुढे होऊ शकतो.तरीही २०२१-२०२२ च्या खरिप हंगामाचे नियोजन मे महिन्यातच तालुका कृषी कार्यालयाने केले आहे.

तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०५.५० हेक्टर इतके आहे. तालुक्यातील १७२ गावात विखुरलेल्या या क्षेत्रापैकी ५८ हजार ८८० हेक्टर इतके क्षेत्र पेरणी योग्य आहे. पेरणी योग्य क्षेत्रापैकी ४६ हजार १२७ हेक्टर क्षेत्र खरिपाच्या पेरणी खाली येत असून, उर्वरित अंदाजे १४ हजार हेक्टर इतके क्षेत्र सहा वर्षावरील संत्रा फळपिका खालील आहे.

अशी आहे शेतकरी संख्या

१७ हजार ३८२ अल्पभूधारक

१२ हजार ८६० अत्यल्प भूधारक

१३ हजार ३४३ शेतकरी पाच एकारा पेक्षा जास्त क्षेत्र असलेले

एकूण शेतकरी संख्या ४३ हजार ५८५

बॉक्स

असे आहे यंदाचे नियोजन

२०२१-२०२२च्या खरिप पीका अंतर्गत येणार्या ४६ हजार १२७ हेक्टर क्षेत्रा वरील, पीक निहाय नियोजन तालुका कृषी विभागाने केले आहे.या पीक नियोजनाच्या अंदाजा नुसार तालुक्यात, कापूस २२हजार हेक्टर,सोयाबीन १३ हजार ९८० हेक्टर, तूर ९ हजार ५००हेक्टर, संकरीत ज्वारी ४२२ हेक्टर, उडीद १७५ हेक्टर,मूग ५० हेक्टर या प्रमाणे पीक निहाय खरिपात पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरिपाच्या प्रत्यक्ष पेरणी नंतर खरिपाच्या नियोजित क्षेत्रातघट किंवा वाढ होऊ शकते.

बॉक्स

सन २०२१-२२च्या खरिप हंगामाचे नियोजनात मागिल वर्षी पेक्षा,यावर्षी कोणत्याही पीकाचा पेरा फारसा वाढण्याच्या अंदाज नियोजनात व्यक्त करण्यात आला नाही.तरीही शेतकऱ्यांना बियाणे प्राप्त झाल्यास,सोयाबीनच्या पेरण्यात मागिल वर्षी पेक्षा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण सध्या बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या भावाचा परिणाम सोयाबीनचा पेरा वाढण्यावर होऊ शकतो. कपाशीचा पेरा मागिल वर्षी एवढाच होण्याची शक्यता आहे.मात्र सोयाबीन बियाण्याचे दर वाजवी पेक्षा जास्त वाढवल्यास, शेतकरी शेवटच्या क्षणी कपासाला पसंती देऊ शकतात. मागिल वर्षी कपाशीची प्रत्यक्ष पेरणी १८हजार८४८ हेक्टर क्षेत्रावर झाली होती.तर सोयाबीनची प्रत्यक्ष पेरणी १६हजार १४३हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती.यावर्षी दोन्ही पीका खालील क्षेत्रात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

बॉक्स

अशी होती मागील वषीची स्थिती

मागिल वर्षी कपाशी व सोयाबीन सह खरिपातील प्रत्यक्ष पेरणी,तूर ८हजार ७८१हेक्टर, सं.ज्वारी१७७ हेक्टर, मूग फक्त ७ हेक्टर, उडीद ७६ हेक्टर,इतर पिके ४९१ हेक्टर याप्रमाणे पीक निहाय पेरणी झाली होती.मागिल वर्षी तालुक्यात खरिपाच्या पेरणी योग्य क्षेत्रा पैकी,प्रत्यक्ष ४४ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती.अंदाजे ५हजार हेक्टर इतके क्षेत्रावर अती पावसा,मागिल वर्षी खरिपाची पेरणी होऊ शकली नाही.खरिपातील हे क्षेत्र नंतर रबी पीका कडे वळले होते.

कोट

खरिपाच्या नियोजित क्षेत्रासाठी एकूण २० हजार ९५७ क्विंटल बियाण्याची मागणी तालुक्यासाठी करण्यात आली आहे. यात कापूस ११ हजार क्विंटल, सोयाबीन ८ हजार ९४० क्विंटल, तूर ९५० क्विंटल, ज्वारी ३४ क्विटल या प्रमाणे पीक निहाय बियाण्यांच्या समावेश आहे. कापूस, सोयाबीन व तूरीचे बियाणे, काही प्रमाणात बाजारात उपलबध झाले आहे

अंकुश जोगदंड, तालुका कृषी अधिकारी,

चांदूरबाजार _______________________________