शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात ४६ हजार१२७ हेक्टरसाठी खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

पान २ ची बॉटम चांदूरबाजार: साधारणतः मृग नक्षत्रापासून शेतीचा खरिप हंगाम सुरू होतो. अंदाजे १५ दिवसांवर खरिप हंगामा ...

पान २ ची बॉटम

चांदूरबाजार: साधारणतः मृग नक्षत्रापासून शेतीचा खरिप हंगाम सुरू होतो. अंदाजे १५ दिवसांवर खरिप हंगामा येऊन ठेपला आहे. मान्सूनचा पाऊस येण्याच्या कालावधीवर शेतीचा हा हंगाम मागे पुढे होऊ शकतो.तरीही २०२१-२०२२ च्या खरिप हंगामाचे नियोजन मे महिन्यातच तालुका कृषी कार्यालयाने केले आहे.

तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०५.५० हेक्टर इतके आहे. तालुक्यातील १७२ गावात विखुरलेल्या या क्षेत्रापैकी ५८ हजार ८८० हेक्टर इतके क्षेत्र पेरणी योग्य आहे. पेरणी योग्य क्षेत्रापैकी ४६ हजार १२७ हेक्टर क्षेत्र खरिपाच्या पेरणी खाली येत असून, उर्वरित अंदाजे १४ हजार हेक्टर इतके क्षेत्र सहा वर्षावरील संत्रा फळपिका खालील आहे.

अशी आहे शेतकरी संख्या

१७ हजार ३८२ अल्पभूधारक

१२ हजार ८६० अत्यल्प भूधारक

१३ हजार ३४३ शेतकरी पाच एकारा पेक्षा जास्त क्षेत्र असलेले

एकूण शेतकरी संख्या ४३ हजार ५८५

बॉक्स

असे आहे यंदाचे नियोजन

२०२१-२०२२च्या खरिप पीका अंतर्गत येणार्या ४६ हजार १२७ हेक्टर क्षेत्रा वरील, पीक निहाय नियोजन तालुका कृषी विभागाने केले आहे.या पीक नियोजनाच्या अंदाजा नुसार तालुक्यात, कापूस २२हजार हेक्टर,सोयाबीन १३ हजार ९८० हेक्टर, तूर ९ हजार ५००हेक्टर, संकरीत ज्वारी ४२२ हेक्टर, उडीद १७५ हेक्टर,मूग ५० हेक्टर या प्रमाणे पीक निहाय खरिपात पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरिपाच्या प्रत्यक्ष पेरणी नंतर खरिपाच्या नियोजित क्षेत्रातघट किंवा वाढ होऊ शकते.

बॉक्स

सन २०२१-२२च्या खरिप हंगामाचे नियोजनात मागिल वर्षी पेक्षा,यावर्षी कोणत्याही पीकाचा पेरा फारसा वाढण्याच्या अंदाज नियोजनात व्यक्त करण्यात आला नाही.तरीही शेतकऱ्यांना बियाणे प्राप्त झाल्यास,सोयाबीनच्या पेरण्यात मागिल वर्षी पेक्षा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण सध्या बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या भावाचा परिणाम सोयाबीनचा पेरा वाढण्यावर होऊ शकतो. कपाशीचा पेरा मागिल वर्षी एवढाच होण्याची शक्यता आहे.मात्र सोयाबीन बियाण्याचे दर वाजवी पेक्षा जास्त वाढवल्यास, शेतकरी शेवटच्या क्षणी कपासाला पसंती देऊ शकतात. मागिल वर्षी कपाशीची प्रत्यक्ष पेरणी १८हजार८४८ हेक्टर क्षेत्रावर झाली होती.तर सोयाबीनची प्रत्यक्ष पेरणी १६हजार १४३हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती.यावर्षी दोन्ही पीका खालील क्षेत्रात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

बॉक्स

अशी होती मागील वषीची स्थिती

मागिल वर्षी कपाशी व सोयाबीन सह खरिपातील प्रत्यक्ष पेरणी,तूर ८हजार ७८१हेक्टर, सं.ज्वारी१७७ हेक्टर, मूग फक्त ७ हेक्टर, उडीद ७६ हेक्टर,इतर पिके ४९१ हेक्टर याप्रमाणे पीक निहाय पेरणी झाली होती.मागिल वर्षी तालुक्यात खरिपाच्या पेरणी योग्य क्षेत्रा पैकी,प्रत्यक्ष ४४ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती.अंदाजे ५हजार हेक्टर इतके क्षेत्रावर अती पावसा,मागिल वर्षी खरिपाची पेरणी होऊ शकली नाही.खरिपातील हे क्षेत्र नंतर रबी पीका कडे वळले होते.

कोट

खरिपाच्या नियोजित क्षेत्रासाठी एकूण २० हजार ९५७ क्विंटल बियाण्याची मागणी तालुक्यासाठी करण्यात आली आहे. यात कापूस ११ हजार क्विंटल, सोयाबीन ८ हजार ९४० क्विंटल, तूर ९५० क्विंटल, ज्वारी ३४ क्विटल या प्रमाणे पीक निहाय बियाण्यांच्या समावेश आहे. कापूस, सोयाबीन व तूरीचे बियाणे, काही प्रमाणात बाजारात उपलबध झाले आहे

अंकुश जोगदंड, तालुका कृषी अधिकारी,

चांदूरबाजार _______________________________