शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

तालुक्यात ४६ हजार१२७ हेक्टरसाठी खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

पान २ ची बॉटम चांदूरबाजार: साधारणतः मृग नक्षत्रापासून शेतीचा खरिप हंगाम सुरू होतो. अंदाजे १५ दिवसांवर खरिप हंगामा ...

पान २ ची बॉटम

चांदूरबाजार: साधारणतः मृग नक्षत्रापासून शेतीचा खरिप हंगाम सुरू होतो. अंदाजे १५ दिवसांवर खरिप हंगामा येऊन ठेपला आहे. मान्सूनचा पाऊस येण्याच्या कालावधीवर शेतीचा हा हंगाम मागे पुढे होऊ शकतो.तरीही २०२१-२०२२ च्या खरिप हंगामाचे नियोजन मे महिन्यातच तालुका कृषी कार्यालयाने केले आहे.

तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०५.५० हेक्टर इतके आहे. तालुक्यातील १७२ गावात विखुरलेल्या या क्षेत्रापैकी ५८ हजार ८८० हेक्टर इतके क्षेत्र पेरणी योग्य आहे. पेरणी योग्य क्षेत्रापैकी ४६ हजार १२७ हेक्टर क्षेत्र खरिपाच्या पेरणी खाली येत असून, उर्वरित अंदाजे १४ हजार हेक्टर इतके क्षेत्र सहा वर्षावरील संत्रा फळपिका खालील आहे.

अशी आहे शेतकरी संख्या

१७ हजार ३८२ अल्पभूधारक

१२ हजार ८६० अत्यल्प भूधारक

१३ हजार ३४३ शेतकरी पाच एकारा पेक्षा जास्त क्षेत्र असलेले

एकूण शेतकरी संख्या ४३ हजार ५८५

बॉक्स

असे आहे यंदाचे नियोजन

२०२१-२०२२च्या खरिप पीका अंतर्गत येणार्या ४६ हजार १२७ हेक्टर क्षेत्रा वरील, पीक निहाय नियोजन तालुका कृषी विभागाने केले आहे.या पीक नियोजनाच्या अंदाजा नुसार तालुक्यात, कापूस २२हजार हेक्टर,सोयाबीन १३ हजार ९८० हेक्टर, तूर ९ हजार ५००हेक्टर, संकरीत ज्वारी ४२२ हेक्टर, उडीद १७५ हेक्टर,मूग ५० हेक्टर या प्रमाणे पीक निहाय खरिपात पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरिपाच्या प्रत्यक्ष पेरणी नंतर खरिपाच्या नियोजित क्षेत्रातघट किंवा वाढ होऊ शकते.

बॉक्स

सन २०२१-२२च्या खरिप हंगामाचे नियोजनात मागिल वर्षी पेक्षा,यावर्षी कोणत्याही पीकाचा पेरा फारसा वाढण्याच्या अंदाज नियोजनात व्यक्त करण्यात आला नाही.तरीही शेतकऱ्यांना बियाणे प्राप्त झाल्यास,सोयाबीनच्या पेरण्यात मागिल वर्षी पेक्षा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण सध्या बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या भावाचा परिणाम सोयाबीनचा पेरा वाढण्यावर होऊ शकतो. कपाशीचा पेरा मागिल वर्षी एवढाच होण्याची शक्यता आहे.मात्र सोयाबीन बियाण्याचे दर वाजवी पेक्षा जास्त वाढवल्यास, शेतकरी शेवटच्या क्षणी कपासाला पसंती देऊ शकतात. मागिल वर्षी कपाशीची प्रत्यक्ष पेरणी १८हजार८४८ हेक्टर क्षेत्रावर झाली होती.तर सोयाबीनची प्रत्यक्ष पेरणी १६हजार १४३हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती.यावर्षी दोन्ही पीका खालील क्षेत्रात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

बॉक्स

अशी होती मागील वषीची स्थिती

मागिल वर्षी कपाशी व सोयाबीन सह खरिपातील प्रत्यक्ष पेरणी,तूर ८हजार ७८१हेक्टर, सं.ज्वारी१७७ हेक्टर, मूग फक्त ७ हेक्टर, उडीद ७६ हेक्टर,इतर पिके ४९१ हेक्टर याप्रमाणे पीक निहाय पेरणी झाली होती.मागिल वर्षी तालुक्यात खरिपाच्या पेरणी योग्य क्षेत्रा पैकी,प्रत्यक्ष ४४ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती.अंदाजे ५हजार हेक्टर इतके क्षेत्रावर अती पावसा,मागिल वर्षी खरिपाची पेरणी होऊ शकली नाही.खरिपातील हे क्षेत्र नंतर रबी पीका कडे वळले होते.

कोट

खरिपाच्या नियोजित क्षेत्रासाठी एकूण २० हजार ९५७ क्विंटल बियाण्याची मागणी तालुक्यासाठी करण्यात आली आहे. यात कापूस ११ हजार क्विंटल, सोयाबीन ८ हजार ९४० क्विंटल, तूर ९५० क्विंटल, ज्वारी ३४ क्विटल या प्रमाणे पीक निहाय बियाण्यांच्या समावेश आहे. कापूस, सोयाबीन व तूरीचे बियाणे, काही प्रमाणात बाजारात उपलबध झाले आहे

अंकुश जोगदंड, तालुका कृषी अधिकारी,

चांदूरबाजार _______________________________