शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

वरुड तालुक्यातील खरीप पिके 'आॅक्सिजन'वर

By admin | Updated: August 23, 2014 23:43 IST

तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरु केले आहे.

वरूड : तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संत्रा, कपाशी, मिरची, सोयाबीन, तूर पिकासह आदी पिके आॅक्सिजनवर आहेत. संत्र्याचा आंबिया बहर अति तापमानामुळे गळू लागला आहे.यंदा आधीच उशिरा पेरणी करुनही पुन्हा कपाशी, मिरची, तूर, सोयाबीन, ज्वारीची पिके सुकण्याच्या मार्गावर आहे. ओलिताखाली असलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी कृषि पंपाव्दारे सिंचन करुन पिके जगविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सुखी समृध्द विदर्भाच्या कॅलिफोर्नियावर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकऱ्यांसह संत्रा उत्पादकही हवालदिल झाला आहे. अज्ञात विषाणूजन्य रोग आणि अतितापमानाचा फटका संत्रा आंबिया बहराला बसल्याने संत्रा फळे पिवळी पडत आहेत. शेतात संत्रांचा सडा पडला आहे. परंतु कृषी तज्ज्ञांमार्फत पाहिजे तशी उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. राजुराबाजार, लोणी, हातुर्णा, पुसला, सावंगी, शेंदूरजनाघाट, टेंभुरखेडा, बेनोडा परिसरात गत अनेक दिवसापांसून पावसाने दडी मारली आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने जमिनी कडक आल्याने मशागतीला अडथळा निर्माण झाला आहे. पावसाअभावी हिरवे कुरणसुध्दा दिसत नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात निर्माण झाला. पांढरा सोनं म्हणून ओखले जाणाऱ्या कपाशीचेसुध्दा अस्तित्व धोक्यात आल्याने कपाशीच्या उत्पदनात घट होण्याची शक्यता आहे. संत्रा आंबिया बहर घेतलेल्या शेतकऱ्यांनासुध्दा संत्रा गळतीमुळे लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. मृगामध्ये पाऊस आला नसल्याने संत्रा मृग बहर फुटलाच नाही. यामुळे ५० टक्क्यांपेक्ष अधिक संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. पीककर्ज तसेच वैयक्तिक कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. तालुक्यातील दुष्काळग्रस्त स्थितीचा परिणाम बाजारपेठेवरसुद्धा झाला असून यंदा शेंदूरजनाघाटच्या पोळयाच्या बाजारावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)