शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

कारागृहाच्या तटावर ‘जागते रहो’

By admin | Updated: October 12, 2015 00:24 IST

मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या १२ पैकी दोन आरोपींना शनिवारी येथील मध्यवर्ती कारागृहात आणल्याच्या पार्श्वभूमिवर ...

अमरावती : मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या १२ पैकी दोन आरोपींना शनिवारी येथील मध्यवर्ती कारागृहात आणल्याच्या पार्श्वभूमिवर कारागृहाच्या तटावर रविवारपासून खडा पहारा सुरु झाला आहे. ‘जागते रहो’चे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असून सुरक्षा मनोऱ्यावर बंदुकधारी रक्षक तैनात करण्यात आले आहेत.सोहेल मोहम्मद शेख (४३), तनवीर अहमद अन्सारी (४५) या आजन्म कारावासाताली दोन आरोपींना मध्यवर्ती कारागृहात हलविल्यानंतर या घडामोडी युध्दस्तरावर घडल्यात. मुंबईच्या आॅर्थर रोड, येरवडा, आणि नागपूरनंतर अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा अत्यंत कडक असल्याची कारागृह प्रशासनात नोंद आहे. येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अंडा बराकीत यापूर्वी अरुण गवळी यांनादेखील बंदिस्त ठेवण्यात आले होते. मध्यंतरी चंद्रपूर, गडचिरोली येथे नक्षली कारवाया करणाऱ्या आठ जणांना सुरक्षेच्या अनुषंगाने नागपूर कारागृहातून अमरावती मध्यवर्ती हलविण्यात आले होते. या आठही जणांना कारागृहातील अंडा बराकीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. बॉम्बस्फोटातील दोन बंदिस्त आरोपी कायमयापूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील दोन आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून अमरावतीत सुरक्षेच्या अनुषंगाने बंदिस्त केले होते. या खटल्यातील सर्वच आरोपींना आजन्म कारावास झाला होता. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी येथील कारागृहातच बंदिस्त असून ते शिक्षा भोगत आहेत. आता ७/११ च्या बॉम्बस्फोटातीलदोन आरोपी पाठविण्यात आले आहेत.अंडा बराकीत सुरक्षा नाहीचकारागृहातील अतिसुरक्षित अंडा बराकीत (वर्तुळ) काही वर्षांपासून कोणतेच कैदी ठेवले जात नाहीत. सर्व कैद्यांना सामान्य बराकीत ठेवण्यात येते. सूर्योदय ते सूर्यास्त असा दिनक्रम असलेल्या कैद्यांना नियमानुसार वाटचाल करावी लागते. अंडा बराकीत कैदी बंदिस्त नसल्यामुळे अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा लावण्याचा बोजादेखील प्रशासनावर पडत नसल्याचे येथील चित्र आहे.