शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस थांब्याचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:46 IST

येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली.

ठळक मुद्देचांदूरवासीयांच्या आशा मावळल्या : खासदारांचे प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली.पूर्व व पश्चिम विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याने काझीपेठ ते पुणे रेल्वेगाडी दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झाली. मात्र, या गाडीला चांदूर रेल्वे येथे थांबा नसल्याने तालुक्यात नाराजीचा सूर पसरला आहे. चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र एक्सप्रेस वगळता पुण्याकडे जाणाºया एकाही गाडीचा थांबा नाही. येथे थांबा आवश्यक आहे. कारण पुण्याला जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे.रेल रोको कृती समितीने पुण्याला जाण्यासाठी एका रेल्वे गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती. खासदार रामदास तडस यांनीदेखील रेल्वे बोर्डाला पत्र देऊन पुणे-काझीपेठ या गाडीला चांदूर रेल्वे व हिंगणघाट स्थानकांवर थांबा देण्याची मागणी २० आॅक्टोबर २०१७ रोजी केली होती. यावरून रेल्वे बोर्डाने २६ नोव्हेंबर २०१७ रोजी दोन्ही स्थानकांवर या गाडीचा थांबा परिचालन दृष्टीने व्यावहारिक असल्याच्या पत्रासह प्रस्ताव मुंबई मुख्यालयात पाठविला. परंतु, मुख्यालयाने ७ मार्च २०१८ रोजी हिंगणघाट स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव मान्य केला, तर चांदूर रेल्वे स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव धुडकाून लावला आहे. सदर माहिती नितीन गवळी यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविल्याची माहिती आहे.या गाडीचा थांबा मिळवूनच देणार, अशी आशा खा.रामदास तडस हे सात महिन्यांपासून चांदूर रेल्वेवासीयांना दाखवित होते. परंतु, ही आशा आता मावळली आहे.गरीबरथचा थांबा मिळवून देतो -तडसएकेवेळी काझीपेठ-पुणे या गाडीला चांदूर रेल्वेत थांबा मिळणारच, असे सांगणारे खासदार रामदास तडस यांच्याशी एका समारंभात स्थानिक पत्रकारांनी याविषयी चर्चा केली व प्रस्ताव फेटाळल्याचे लक्षात आणून दिले. तडस यांनी चांदूर रेल्वे स्थानकावर आता गरीबरथ एक्सप्रेसचाच थांबा मिळवून देणार असल्याचे वक्तव्य यावेळी केले. या वक्तव्यावरून खा. तडस काझीपेठ-पुणे गाडीच्या थांब्याबाबत किती प्रयत्नशील होते, हे दिसून आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.