शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस थांब्याचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:46 IST

येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली.

ठळक मुद्देचांदूरवासीयांच्या आशा मावळल्या : खासदारांचे प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली.पूर्व व पश्चिम विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याने काझीपेठ ते पुणे रेल्वेगाडी दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झाली. मात्र, या गाडीला चांदूर रेल्वे येथे थांबा नसल्याने तालुक्यात नाराजीचा सूर पसरला आहे. चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र एक्सप्रेस वगळता पुण्याकडे जाणाºया एकाही गाडीचा थांबा नाही. येथे थांबा आवश्यक आहे. कारण पुण्याला जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे.रेल रोको कृती समितीने पुण्याला जाण्यासाठी एका रेल्वे गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती. खासदार रामदास तडस यांनीदेखील रेल्वे बोर्डाला पत्र देऊन पुणे-काझीपेठ या गाडीला चांदूर रेल्वे व हिंगणघाट स्थानकांवर थांबा देण्याची मागणी २० आॅक्टोबर २०१७ रोजी केली होती. यावरून रेल्वे बोर्डाने २६ नोव्हेंबर २०१७ रोजी दोन्ही स्थानकांवर या गाडीचा थांबा परिचालन दृष्टीने व्यावहारिक असल्याच्या पत्रासह प्रस्ताव मुंबई मुख्यालयात पाठविला. परंतु, मुख्यालयाने ७ मार्च २०१८ रोजी हिंगणघाट स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव मान्य केला, तर चांदूर रेल्वे स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव धुडकाून लावला आहे. सदर माहिती नितीन गवळी यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविल्याची माहिती आहे.या गाडीचा थांबा मिळवूनच देणार, अशी आशा खा.रामदास तडस हे सात महिन्यांपासून चांदूर रेल्वेवासीयांना दाखवित होते. परंतु, ही आशा आता मावळली आहे.गरीबरथचा थांबा मिळवून देतो -तडसएकेवेळी काझीपेठ-पुणे या गाडीला चांदूर रेल्वेत थांबा मिळणारच, असे सांगणारे खासदार रामदास तडस यांच्याशी एका समारंभात स्थानिक पत्रकारांनी याविषयी चर्चा केली व प्रस्ताव फेटाळल्याचे लक्षात आणून दिले. तडस यांनी चांदूर रेल्वे स्थानकावर आता गरीबरथ एक्सप्रेसचाच थांबा मिळवून देणार असल्याचे वक्तव्य यावेळी केले. या वक्तव्यावरून खा. तडस काझीपेठ-पुणे गाडीच्या थांब्याबाबत किती प्रयत्नशील होते, हे दिसून आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.