शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

बहिरमच्या काशी तलावाला नवे रूप

By admin | Updated: July 12, 2015 00:30 IST

अस्मानी संकटावर मात करण्यासाठी यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात राज्य शासनाने जलयुक्त शिवार मोहीम राबविली आहे.

जलयुक्त शिवार अभियान : भूजलस्तर वाढविण्याचा आटोकाट प्रयत्नसुमित हरकुट चांदूरबाजारअस्मानी संकटावर मात करण्यासाठी यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात राज्य शासनाने जलयुक्त शिवार मोहीम राबविली आहे. कमी खर्चात मोठा फायदा मिळवून देणाऱ्या या योजनेमुळे पहिल्याच पावसाचे पाणी नद्या-नाल्यांमध्ये अडविण्यात आल्याने जमिनीतील भूजलस्तर वाढविण्यास मदत होईल. यामुळे शेतातील विहिरीची पाण्याची पातळी वाढल्यास सुरुवातीपासून पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. ज्या भागात जलयुक्त शिवाराची कामे झाली त्या भागात भूगर्भातील पाण्यात वाढ होऊन शेतकरी स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाद्वारा ओलीत करून पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नदी-नाल्यांना पाणी असल्यामुळे हे शक्य होत आहे. या अभियानअंतर्गत तालुक्यात १७ गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे झाली आहेत. या गावांमध्ये नऊ कोटी ६० लक्ष रुपये खर्च करून जलसंधारणाची ४२३ कामे हाती घेण्यात आली. यापैकी ३० जून २०१५ पर्यंत ३०२ कामे पूर्ण होऊन उर्वरित कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर कामापैकी ‘अ’ गटातील २३७ कामे पूर्ण झाली आहेत. ‘ब’ गटामधील उर्वरित कामे ३० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केले जातील. ‘क’ गटामधील १२ कामे मंजूर असून प्रक्रिया पूर्ण होताच या कामांनाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी दिली आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे प्रसिद्ध व जुन्या काशी तलावाचे खोलीकरण करण्यात आले आहे. या तलावातील शेकडो ट्रॅक्टर गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन सुपीक होणार आहे. या तलावाची भिंत बांधल्यामुळे तलावात पावसाचे भरपूर पाणी अडणार आहे. यामुळे बहिरम येथील काशी तलावाचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व त्याचप्रमाणे बहिरम यात्रेत मुबलक पाणीपुरवठा होऊ शकेल व परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढणार आहे. धरणातून वाया जाणारे पाणी एकत्रित करून पुन्हा ओलिताकरिता उपलब्ध झाले आहे. यासाठी मंजूर निधीपैकी ४ कोटी १६ लक्ष रूपये जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून उपलब्ध करून दिले आहे. उर्वरीत निधी रोजगार हमी योजनेमधून खर्च करण्यात आले आहे. तालुक्यातील १७ गावांमध्ये २५ हजार वृक्षलागवड होणार असून यापैकी १६ हजार वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. महसूल विभागाबरोबर कृषी विभाग, वनीकरण, पाटबंधारे व पंचायत समिती यांचेसुद्धा सहकार्य मिळाले आहे. या अभियानामुळे व परिसर वृक्षवेली व पाण्याने बहरदार निश्चित होणार आहे.