शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

विशेष सभेत कल्लोळ

By admin | Updated: February 24, 2016 00:14 IST

जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्यात आवश्यक असलेल्या गावांना डच्चू देत दुसऱ्याच गावांचा समावेश करण्यात आल्याची बाब उघडकीस आली.

जिल्हा परिषद : पाणीटंचाईविषयी सदस्य आक्रमकअमरावती : जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्यात आवश्यक असलेल्या गावांना डच्चू देत दुसऱ्याच गावांचा समावेश करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. पाणी टंचाई विषयावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी सदस्यांनी प्रशासनाची पोलखोल केली. दरम्यान सभागृहात चांगलाच कल्लोळ उठला होता.जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने मोठा गाजावाजा करीत दोन महिन्यापूर्वी पानी टंचाईचा आराखडा तयार केला. मात्र यंदाच्या आराखड्यात टंचाईच्या तिव्रतेचा अंदाज अधिकाऱ्यांना समजलाच नाही. कृती आराखड्यात समाविष्ट गावांमध्ये पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्यातरी ज्या गावांना पाणी टंचाईचा सामना सध्या करावा लागत आहे त्या गावांचा यात समावेश नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे,, सुधीर सूर्यवंशी, अभिजित ढेपे, चंद्रपाल तुरकाने, मनोहर सुने, जया बुंदिले, विनोद टेकाडे, संगिता चक्रे, मंदा गवई, संगीता सवाई वनमाला खडके आदी सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडत जाब विचारला. नियोजन आराखडाच चुकीचा असल्याचा आरोप सुरेखा ठाकरे यांनी सभेच्या प्रारंभीच केला. सभेची कुठलीही तयारी प्रशासनाने केली नाही. सदस्यांना ज्या अपेक्षा विशेष सभेत पाणीटंचाईबाबत कुठलाही समावेश व नियोजन न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी चंद्रपाल तुरकाने यांनी तिवसा तालुक्यात अद्यापही ५० टक्के गावे आहेत. सार्सी, कुऱ्हा आदी गावांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होत असल्याची पदाधिकाऱ्यांची ओरड होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर या गावात दोन कूपनलिकेव्दारे पाणीपुरवठा होतो. मात्र यापैकी एक कूपनलिका बंद आहे. त्यामुळे या गावात कुत्रिम पाणीटंचाई भासत आहे. याबाबत येथील सरपंच मीनल दखने यांनी अनेक वेळा पंचायत समितीकडे तक्रार केली. याची दखल घेत पाणी टंचाईचे सभेत सभापती विनोद टेकाडे, जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी या गावांचा समावेश कृती आराखड्यात करावा, अशी मागणी सभागृहात केली. ही मागणी मान्य करून उपाययोजना करण्याचे आदेश सीईओंनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान पाणी टंचाईच्या विषयावर वादळी चर्चा सुरू असताना जि.प. सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी आपापल्या मतदारसंघातील पाणीटंचाईचे विषय, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, नादुरूस्त कूपनलिका आदी प्रश्नांवरही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. ज्या गावांना खऱ्या अर्थाने पाणी टंचाईची झळ बसत आहेत अशा सर्व गावांचा समावेश कृती आराखडयात करण्यात यावा, पिण्यायोग्य पाणी नाही अशा गावातही शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी रेटून धरली असता यावर जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी तातडीने उपायायोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. उमाळकर व अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)