शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सभेत कल्लोळ

By admin | Updated: February 24, 2016 00:14 IST

जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्यात आवश्यक असलेल्या गावांना डच्चू देत दुसऱ्याच गावांचा समावेश करण्यात आल्याची बाब उघडकीस आली.

जिल्हा परिषद : पाणीटंचाईविषयी सदस्य आक्रमकअमरावती : जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्यात आवश्यक असलेल्या गावांना डच्चू देत दुसऱ्याच गावांचा समावेश करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. पाणी टंचाई विषयावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी सदस्यांनी प्रशासनाची पोलखोल केली. दरम्यान सभागृहात चांगलाच कल्लोळ उठला होता.जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने मोठा गाजावाजा करीत दोन महिन्यापूर्वी पानी टंचाईचा आराखडा तयार केला. मात्र यंदाच्या आराखड्यात टंचाईच्या तिव्रतेचा अंदाज अधिकाऱ्यांना समजलाच नाही. कृती आराखड्यात समाविष्ट गावांमध्ये पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्यातरी ज्या गावांना पाणी टंचाईचा सामना सध्या करावा लागत आहे त्या गावांचा यात समावेश नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे,, सुधीर सूर्यवंशी, अभिजित ढेपे, चंद्रपाल तुरकाने, मनोहर सुने, जया बुंदिले, विनोद टेकाडे, संगिता चक्रे, मंदा गवई, संगीता सवाई वनमाला खडके आदी सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडत जाब विचारला. नियोजन आराखडाच चुकीचा असल्याचा आरोप सुरेखा ठाकरे यांनी सभेच्या प्रारंभीच केला. सभेची कुठलीही तयारी प्रशासनाने केली नाही. सदस्यांना ज्या अपेक्षा विशेष सभेत पाणीटंचाईबाबत कुठलाही समावेश व नियोजन न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी चंद्रपाल तुरकाने यांनी तिवसा तालुक्यात अद्यापही ५० टक्के गावे आहेत. सार्सी, कुऱ्हा आदी गावांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होत असल्याची पदाधिकाऱ्यांची ओरड होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर या गावात दोन कूपनलिकेव्दारे पाणीपुरवठा होतो. मात्र यापैकी एक कूपनलिका बंद आहे. त्यामुळे या गावात कुत्रिम पाणीटंचाई भासत आहे. याबाबत येथील सरपंच मीनल दखने यांनी अनेक वेळा पंचायत समितीकडे तक्रार केली. याची दखल घेत पाणी टंचाईचे सभेत सभापती विनोद टेकाडे, जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी या गावांचा समावेश कृती आराखड्यात करावा, अशी मागणी सभागृहात केली. ही मागणी मान्य करून उपाययोजना करण्याचे आदेश सीईओंनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान पाणी टंचाईच्या विषयावर वादळी चर्चा सुरू असताना जि.प. सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी आपापल्या मतदारसंघातील पाणीटंचाईचे विषय, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, नादुरूस्त कूपनलिका आदी प्रश्नांवरही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. ज्या गावांना खऱ्या अर्थाने पाणी टंचाईची झळ बसत आहेत अशा सर्व गावांचा समावेश कृती आराखडयात करण्यात यावा, पिण्यायोग्य पाणी नाही अशा गावातही शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी रेटून धरली असता यावर जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी तातडीने उपायायोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. उमाळकर व अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)