शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

अचलपूरचे कलिंगड निघाले 'दीदीं'च्या राज्यात; जम्मू-काश्मीरसह दक्षिणेतही बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 07:00 IST

Amravati newsअचलपूर तालुक्यातील निजामपूर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उत्पादित केलेले कलिंगड (टरबूज) ममतादीदींच्या राज्यात पाठविले आहे. यासह जम्मू-काश्मीर आणि दक्षिणेतही या कलिंगडाने आपली ओळख निर्माण केली आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊनचा फटका, केवळ उत्पादनखर्चच निघाला

अनिल कडू

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : अचलपूर तालुक्यातील निजामपूर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उत्पादित केलेले कलिंगड (टरबूज) ममतादीदींच्या राज्यात पाठविले आहे. यासह जम्मू-काश्मीर आणि दक्षिणेतही या कलिंगडाने आपली ओळख निर्माण केली आहे.

निजामपूर येथील शेतकरी सुरेंद्र काटोलकर यांनी अडीच एकर शेतात कलिंगडाची लागवड केली. मागील दोन वर्षांपासून ते कलिंगडाची लागवड करीत आहेत. एकरी २२ टन अपेक्षित उत्पादन विचारात घेता, त्यांना अडीच एकरात एकूण ५५ टन उत्पादन अपेक्षित आहे.

यापूर्वी सुरेंद्र काटोलकर यांच्या उत्पादित कलिंगडाला नऊ ते दहा रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. आज मात्र लॉकडाऊनमुळे कलिंगडाचे भाव घसरले असून, जागेवर शेतातून केवळ साडेपाच ते सहा रुपये प्रतिकिलो दराने त्यांना हे कलिंगड विकावे लागत आहे. उत्पादन होऊनही त्यांना आर्थिक फायदा न न होता, केवळ उत्पादन खर्च निघत असल्याचे समाधान त्यांना मानावे लागले आहे. त्यांच्या शेतातून त्यांनी व्यापाऱ्याच्या मदतीने सरळ कलिंगड भरलेला ट्रक ममतादीदींच्या पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यावरून पुढे नव्वद किलोमीटरवर पाठविला आहे. या ट्रकपूर्वी एक ट्रक कलिंगड त्यांनी जम्मूला, तर दुसरा ट्रक उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरला पाठविला. यातून अचलपूर तालुक्यातील कलिंगडाने पश्चिम बंगालसह जम्मू काश्मीर आणि दक्षिणेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. निजामपूर येथील शेतकरी सुरेंद्र काटोलकर यांच्या शेतातील हे काळपट हिरव्याकंच रंगाचे कलिंगड रसाळ व चविला गोड असे उच्च प्रतीचे ठरले आहे.

या गावात होते उत्पादन

अचलपूर तालुक्यातील निजामपूर, बोरगाव दोरी, वासणी, मेघनाथपूर व बोरगाव पेठ या गावांमध्ये जवळपास २०० एकरावर शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. या गावांसह तालुक्यातील अन्य काही गावांतील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. यात त्यांना विक्रमी उत्पादनासह मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही झाला. पण, एप्रिल २०२० आणि एप्रिल-मे २०२१ मधील लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या या कलिंगडाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळालेला नाही. केवळ उत्पादनखर्चच शेतकऱ्यांच्या हाती लागला असून, त्यातच त्यांना समाधान मानावे लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती