शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

प्रहारचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:16 IST

दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय, हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे.

ठळक मुद्देबच्चू कडुंचे नेतृत्व : दिव्यांग, अनाथ, विधवा, बेघरांच्या हक्कासाठी लढा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय, हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या प्रारंभीच आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या आंदोलनाने प्रशासन हैराण झाले आहे. तर दुसरीकडे आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.स्थानिक गाडगेनगरस्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील प्रागंणात राहुट्या टाकून न्याय, हक्कासाठी एकवटले आहेत. स्वातंत्र्यांच्या ६० वर्षांनंतरही कापडी पालाच्याघरात राहावे लागत असल्याचे भीषण वास्तव आ. कडू यांच्या नेतृत्वात मांडण्यात आले आहे. बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी बाहेरगावाहून हजारो नागरीक एकवटले आहेत. यात अनाथ, विधवा, बेघर, अपंग, शेतकरी, शेतमजूरासह बेरोजगार युवकांचा समावेश आहे. शासन, प्रशासन जेथपर्यत प्रश्न सोडवित नाही, तेथपर्यत हे अन्नत्याग आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका आ. कडू यांनी घेतली आहे. सीमेवर शत्रुशी झुंज देताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना अनुकंपा धोरण लागू झाले नसल्याबाबत शल्य व्यक्त करण्यात आले आहे. दिव्यांगाचे समस्या, प्रश्न आंदोलनात अग्रस्थानी आहे. अन्नत्याग आंदोलनाला आ. बच्चू कडू यांच्यासह छोटू महाराज वसू, प्रमोद कुदळे, अमोल कावलकर, मुकेश घुंडीयाल, सौरभ इंगळे, बबलू जवंजाळ, गोलू ठाकूर, प्रदीप वडकर, चंदू खेङकर आदी सहभाग झाले आहेत.