शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

तंटामुक्त मोहिमेत जिल्ह्यात ७ हजार २९४ प्रकरणांत निवाडा

By admin | Updated: September 16, 2015 00:13 IST

गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत ..

चांदूरबाजार : गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने सन २०१४-१५ या वर्षात गावतील ७ हजार २९४ तंट्यांना ‘न्याय’ मिळवून दिला आहे. अलीकडची चार वर्षांतील टक्केवारीही कायम राखली आहे. या तुलनेत विभागातील इतर चार जिल्हे माघारले आहेत. गावात शांतता व सुव्यवस्था तसेच सलोख्याचे वातावरण कायम रहावे याकरिता राज्य शासनाने सन २००७ पासून तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. यामध्ये गावात क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेले तंटे मिटवून दिवाणी स्वरुपाचे, महसूल व फौजदारी तंट्यांना समोपचाराने मिटवून ‘न्याय’ देण्याची तरतूद करण्यात आली. राज्य शासनाने या मोहिमेत ७ वर्षांत कामगिरी बजावली. शासनाच्या निकषांची अंमलबजावणी करून सर्वाधिक फौजदारी तंटे या समितीने मिटविले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. सन २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील तंटामुक्त समित्यांनी एकूण ७ हजार २६२ फौजदारी तंट्याचे निराकरण केले आहे. या वर्षामध्ये १७ हजार १२७ फौजदारी स्वरुपाचे तंटे जिल्ह्यामध्ये दाखल होते. त्यापैकी ७२६२ तंटे निकाली काढण्यात आलेत. याचबरोबर १४२ दिवणी तंटे दाखल होते. त्यापैकी केवळ २० तंटे तर महसूली १०३ तंट्यापैकी केवळ १२ तंटे अमरावती जिल्ह्यात मिटविण्यात आले असले तरी फौजदारी तंट्यांनी मात्र जिल्ह्याची टक्केवारी कामय ठेवण्यात यश आले आहे. सन २०१४-१५ या वर्षात दाखल एकूण १७ हजार ३७२ तंट्यांपैकी ७ हजार २९४ तंटे मिटविण्यात आले याची टक्केवारी ४१.९८ एवढी आहे. अलीकडच्या चार वर्षांत ही टक्केवारी १-२ टक्क्यांनी मागे पुढे आहे. सन २०११-१२ या वर्षात जिल्ह्याची तंटे मिटविण्याची टक्केवारी ४३.८६, २०१२-१३ मध्ये ४३.९८ टक्के, २०१३-१४ मध्ये ४२.७० तर २०१४-१५ मध्ये ही टक्केवारी ४१.९८ एवढी आहे. एकूणच अमरावती जिल्ह्याने दाखल तंटे मिटविण्यात सातत्य राखून घवघवीत यश संपादीत केले आहे. नेमक्या याच कामगिरीमुळे अमरावती जिल्हा तंटामुक्त मोहिमेत अव्वल स्थानावर आहे. (तालुका प्रतिनिधी)