शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

तंटामुक्त मोहिमेत जिल्ह्यात ७ हजार २९४ प्रकरणांत निवाडा

By admin | Updated: September 16, 2015 00:13 IST

गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत ..

चांदूरबाजार : गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने सन २०१४-१५ या वर्षात गावतील ७ हजार २९४ तंट्यांना ‘न्याय’ मिळवून दिला आहे. अलीकडची चार वर्षांतील टक्केवारीही कायम राखली आहे. या तुलनेत विभागातील इतर चार जिल्हे माघारले आहेत. गावात शांतता व सुव्यवस्था तसेच सलोख्याचे वातावरण कायम रहावे याकरिता राज्य शासनाने सन २००७ पासून तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. यामध्ये गावात क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेले तंटे मिटवून दिवाणी स्वरुपाचे, महसूल व फौजदारी तंट्यांना समोपचाराने मिटवून ‘न्याय’ देण्याची तरतूद करण्यात आली. राज्य शासनाने या मोहिमेत ७ वर्षांत कामगिरी बजावली. शासनाच्या निकषांची अंमलबजावणी करून सर्वाधिक फौजदारी तंटे या समितीने मिटविले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. सन २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील तंटामुक्त समित्यांनी एकूण ७ हजार २६२ फौजदारी तंट्याचे निराकरण केले आहे. या वर्षामध्ये १७ हजार १२७ फौजदारी स्वरुपाचे तंटे जिल्ह्यामध्ये दाखल होते. त्यापैकी ७२६२ तंटे निकाली काढण्यात आलेत. याचबरोबर १४२ दिवणी तंटे दाखल होते. त्यापैकी केवळ २० तंटे तर महसूली १०३ तंट्यापैकी केवळ १२ तंटे अमरावती जिल्ह्यात मिटविण्यात आले असले तरी फौजदारी तंट्यांनी मात्र जिल्ह्याची टक्केवारी कामय ठेवण्यात यश आले आहे. सन २०१४-१५ या वर्षात दाखल एकूण १७ हजार ३७२ तंट्यांपैकी ७ हजार २९४ तंटे मिटविण्यात आले याची टक्केवारी ४१.९८ एवढी आहे. अलीकडच्या चार वर्षांत ही टक्केवारी १-२ टक्क्यांनी मागे पुढे आहे. सन २०११-१२ या वर्षात जिल्ह्याची तंटे मिटविण्याची टक्केवारी ४३.८६, २०१२-१३ मध्ये ४३.९८ टक्के, २०१३-१४ मध्ये ४२.७० तर २०१४-१५ मध्ये ही टक्केवारी ४१.९८ एवढी आहे. एकूणच अमरावती जिल्ह्याने दाखल तंटे मिटविण्यात सातत्य राखून घवघवीत यश संपादीत केले आहे. नेमक्या याच कामगिरीमुळे अमरावती जिल्हा तंटामुक्त मोहिमेत अव्वल स्थानावर आहे. (तालुका प्रतिनिधी)