शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

२५ ग्राहकांना मिळतोय महिन्याकाठी न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:08 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देग्राहक मंच : व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीपासून नागरिक सजग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करताना नागरिकांना ग्राहक बनून व्यापाऱ्यांकडून विविध प्रकारचा माल खरेदी करावा लागतो. मात्र, ग्राहक देवता म्हणून समजण्याची पद्धती तुरळक ठिकाणी पाहायला मिळते. ग्राहक हा व्यापाऱ्यासाठी देवता असतानाही अनेक व्यापारी वर्ग वस्तु विकल्यानंतर ग्राहकांना विसरून जातात. त्यातून ग्राहकांचे समाधान झाले का, याकडे व्यापारी दुर्लक्षच करताना आढळतो. ग्राहकांना वस्तू व सेवा पुरविण्याचे काम व्यापाऱ्यांचे आहे. त्यासाठी ग्राहकांना विविध अधिकार दिले असून, त्या नियमांच्या चाकोरीत बसून व्यापाऱ्यांनी ग्राहकांना वस्तु व सेवा पुरविणे आवश्यक आहे. मात्र, बरेचदा व्यापारी वर्ग ग्राहकांची पिळवणूक किंवा फसवणूक करताना आढळून येतात. बरेचसे ग्राहक व्यापाºयाच्या पिळवणुकीला बळी पडतात, तर काही तुरळकच ग्राहक न्यायासाठी झटतात. ग्राहकांनी सजग राहून आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाकडे न्यायासाठी तक्रार करणे आवश्यक असते. अमरावतीमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गेल्या २८ वर्षांत तब्बल ७ हजार ७३ ग्राहकांना न्याय दिला आहे.या प्रकारातील ग्राहकांना मिळाला न्यायग्राहक मंचाकडून विविध प्रकारचे ग्राहक न्याय मागण्यासाठी येतात. त्यात बँक, रेल्वे, एअरलाईन्स, विमा, टेलीकॉम, पोस्टल, हाऊसिंग सोसायटी एन्ड बिल्डींग, इलेक्ट्रिसिटी, मेडिकल निग्लेजन्सी, डिफेटिव्ह हाऊसिंग होल्ड गूडस, शिक्षण, रोड ट्रान्सपोर्ट, प्रवासी वाहतूक अशा आदी ग्राहकांना ग्राहक मंचात न्याय मिळाला.२३२ प्रकरणे प्रलंबितजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे १९९० ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत ७ हजार ३३९ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ९१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. अद्याप २३२ प्रकरणे प्रलंबीत आहेत.१८७ तक्रारी प्रलंबितजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे प्राप्त तक्रारींच्या निपटारानंतर काही विरोधी पक्ष निर्णयाचे पालन करीत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला प्रकरण दाखल करावे लागते. आतापर्यंत १८७ प्रकरणे प्रलंबित आहेत.