शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

२५ ग्राहकांना मिळतोय महिन्याकाठी न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:08 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देग्राहक मंच : व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीपासून नागरिक सजग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करताना नागरिकांना ग्राहक बनून व्यापाऱ्यांकडून विविध प्रकारचा माल खरेदी करावा लागतो. मात्र, ग्राहक देवता म्हणून समजण्याची पद्धती तुरळक ठिकाणी पाहायला मिळते. ग्राहक हा व्यापाऱ्यासाठी देवता असतानाही अनेक व्यापारी वर्ग वस्तु विकल्यानंतर ग्राहकांना विसरून जातात. त्यातून ग्राहकांचे समाधान झाले का, याकडे व्यापारी दुर्लक्षच करताना आढळतो. ग्राहकांना वस्तू व सेवा पुरविण्याचे काम व्यापाऱ्यांचे आहे. त्यासाठी ग्राहकांना विविध अधिकार दिले असून, त्या नियमांच्या चाकोरीत बसून व्यापाऱ्यांनी ग्राहकांना वस्तु व सेवा पुरविणे आवश्यक आहे. मात्र, बरेचदा व्यापारी वर्ग ग्राहकांची पिळवणूक किंवा फसवणूक करताना आढळून येतात. बरेचसे ग्राहक व्यापाºयाच्या पिळवणुकीला बळी पडतात, तर काही तुरळकच ग्राहक न्यायासाठी झटतात. ग्राहकांनी सजग राहून आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाकडे न्यायासाठी तक्रार करणे आवश्यक असते. अमरावतीमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गेल्या २८ वर्षांत तब्बल ७ हजार ७३ ग्राहकांना न्याय दिला आहे.या प्रकारातील ग्राहकांना मिळाला न्यायग्राहक मंचाकडून विविध प्रकारचे ग्राहक न्याय मागण्यासाठी येतात. त्यात बँक, रेल्वे, एअरलाईन्स, विमा, टेलीकॉम, पोस्टल, हाऊसिंग सोसायटी एन्ड बिल्डींग, इलेक्ट्रिसिटी, मेडिकल निग्लेजन्सी, डिफेटिव्ह हाऊसिंग होल्ड गूडस, शिक्षण, रोड ट्रान्सपोर्ट, प्रवासी वाहतूक अशा आदी ग्राहकांना ग्राहक मंचात न्याय मिळाला.२३२ प्रकरणे प्रलंबितजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे १९९० ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत ७ हजार ३३९ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ९१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. अद्याप २३२ प्रकरणे प्रलंबीत आहेत.१८७ तक्रारी प्रलंबितजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे प्राप्त तक्रारींच्या निपटारानंतर काही विरोधी पक्ष निर्णयाचे पालन करीत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला प्रकरण दाखल करावे लागते. आतापर्यंत १८७ प्रकरणे प्रलंबित आहेत.