शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

२५ ग्राहकांना मिळतोय महिन्याकाठी न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:08 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देग्राहक मंच : व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीपासून नागरिक सजग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करताना नागरिकांना ग्राहक बनून व्यापाऱ्यांकडून विविध प्रकारचा माल खरेदी करावा लागतो. मात्र, ग्राहक देवता म्हणून समजण्याची पद्धती तुरळक ठिकाणी पाहायला मिळते. ग्राहक हा व्यापाऱ्यासाठी देवता असतानाही अनेक व्यापारी वर्ग वस्तु विकल्यानंतर ग्राहकांना विसरून जातात. त्यातून ग्राहकांचे समाधान झाले का, याकडे व्यापारी दुर्लक्षच करताना आढळतो. ग्राहकांना वस्तू व सेवा पुरविण्याचे काम व्यापाऱ्यांचे आहे. त्यासाठी ग्राहकांना विविध अधिकार दिले असून, त्या नियमांच्या चाकोरीत बसून व्यापाऱ्यांनी ग्राहकांना वस्तु व सेवा पुरविणे आवश्यक आहे. मात्र, बरेचदा व्यापारी वर्ग ग्राहकांची पिळवणूक किंवा फसवणूक करताना आढळून येतात. बरेचसे ग्राहक व्यापाºयाच्या पिळवणुकीला बळी पडतात, तर काही तुरळकच ग्राहक न्यायासाठी झटतात. ग्राहकांनी सजग राहून आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाकडे न्यायासाठी तक्रार करणे आवश्यक असते. अमरावतीमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गेल्या २८ वर्षांत तब्बल ७ हजार ७३ ग्राहकांना न्याय दिला आहे.या प्रकारातील ग्राहकांना मिळाला न्यायग्राहक मंचाकडून विविध प्रकारचे ग्राहक न्याय मागण्यासाठी येतात. त्यात बँक, रेल्वे, एअरलाईन्स, विमा, टेलीकॉम, पोस्टल, हाऊसिंग सोसायटी एन्ड बिल्डींग, इलेक्ट्रिसिटी, मेडिकल निग्लेजन्सी, डिफेटिव्ह हाऊसिंग होल्ड गूडस, शिक्षण, रोड ट्रान्सपोर्ट, प्रवासी वाहतूक अशा आदी ग्राहकांना ग्राहक मंचात न्याय मिळाला.२३२ प्रकरणे प्रलंबितजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे १९९० ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत ७ हजार ३३९ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ९१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. अद्याप २३२ प्रकरणे प्रलंबीत आहेत.१८७ तक्रारी प्रलंबितजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे प्राप्त तक्रारींच्या निपटारानंतर काही विरोधी पक्ष निर्णयाचे पालन करीत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला प्रकरण दाखल करावे लागते. आतापर्यंत १८७ प्रकरणे प्रलंबित आहेत.