शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तरुणाईचा जल्लोष, उत्साह... युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 23:23 IST

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे बुधवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला पहिल्यांदाच महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे बुधवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला पहिल्यांदाच महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  समारंभाला आमदार सुलभा खोडके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे प्रमुख पाहुणे, कुलसचिव तुषार देशमुख, मुख्य संयोजक प्राचार्य रामेश्वर भिसे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक राजीव बोरकर, महोत्सवाचे समन्वयक सुभाष गावंडे, सहसमन्वयक वैशाली देशमुख, युवा महोत्सव निवड समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल गवई, सदस्य जयश्री वैष्णव, निखिलेश नलोडे, रेखा मग्गीरवर, गजानन केतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

जग संकुचित होत चालले : हर्षवर्धन देशमुखआपण अजूनही कोविडच्या छायेतून बाहेर निघालो नसून आभासी दुनियेमुळे एकमेकांपासून दूर जात आहोत. जग संकुचित होत चालले आहे, आपण स्वतःच्या व परिवाराच्या पलीकडे बघायला तयार नाही. सर्व करतो; पण काहीच करीत नाही, अशी आपली अवस्था असून, यातून बाहेर काढण्यासाठी युवा महोत्सवाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्घाटक आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.

विद्यापीठाचे कर्तव्य माणूस घडविणे : डॉ. दिलीप मालखेडेविद्यापीठाचे काम केवळ शिक्षण देणे नसून माणसे घडविणे हे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी आवश्यक आहे. अमरावती विद्यापीठ हे काम सातत्याने करीत असल्याचे प्रतिपादन उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले. केवळ विद्यापीठच नव्हे, तर प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी एक दालन असावे, तेथे विद्यार्थ्यांचा कायम सराव चालावा, याची आज गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पत्रिकेतून गाडगेबाबांचे छायाचित्र गायबविद्यापीठाच्या कार्यक्रम पत्रिकेत संत गाडगेबाबा यांचे छायाचित्र नाही, शिवाय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी प्रास्ताविकात संत गाडगेबाबा यांचा उल्लेख टाळला. ही ‘ॲलर्जी’ का, असा सवाल उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोरील गाडगेबाबांची दशसूत्री हटविल्याचा मुद्दा गाजला होता.लोकनृत्य, एकांकिका, वादविवाद स्पर्धेने मने जिंकलीयेथील पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कलावंत विद्यार्थ्यानी लोकनृत्याचे बहारदार सादरीकरण केले. बुधवारी युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लोकनृत्यानंतर एकांकिका, समूहगान, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कोलाज कला प्रकार, पाश्चिमात्य वाद्य संगीत, एकल गायन अशा विविध कला प्रकाराचे कलावंत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. 

टॅग्स :universityविद्यापीठ