शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन प्रवास

By admin | Updated: February 5, 2017 00:11 IST

नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील पापळनजीकच असलेल्या हिवरा (मुरादे) येथील नाथजोगी समाजाच्या ४९ कुटुंबीयांना २८ वर्षांपासून कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन जगावे लागत आहे.

कधी मिळणार हक्काचे घरकूल ? : हिवरा मुरादे येथील नाथजोगी कुटुंबीयांची व्यथानंदकिशोर इंगळे पापळनांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील पापळनजीकच असलेल्या हिवरा (मुरादे) येथील नाथजोगी समाजाच्या ४९ कुटुंबीयांना २८ वर्षांपासून कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन जगावे लागत आहे. हक्काच्या घरकुलाची आशा बाळगणाऱ्या या नाथजोगी कुटुंबीयांना दोन तपाच्या प्रतीक्षेनंतरही निवासाची सोय नसणे ही शोकांतिका आहे. हक्काचे घरकूल मिळणार की, बेघरच राहावे लागणार, असा प्रश्न या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे. ४० कुटुंबीयांच्या वस्तीत २०० लोकांची राहुटी असलेल्या नाथजोगी बांधवांना अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगावे लागत आहे. २८ वर्षांपासून हिवरा (मुरादे) येथे या नागरिकांचे वास्तव्य आहे. या वस्तीतील नागरिक गावोगावी भटकंती करतात, तर महिला गवताच्या पेंढ्या गोळा करून आपल्या कुटुंबीयांची कशीबशी उपजिवीका भागवितात. शासकीय योजना काय आहेत, त्याचा लाभ कसा घ्यायचा, या बाबींपासून या वस्तीतील नागरिक अनभिज्ञ आहेत. या वस्तीतील नागरिकांचा दोन तपापासून फक्त राजकारणापुरताच वापर झालेला आहे. मतदान कार्डाव्यतिरिक्त या नागरिकांकडे दुसरे कुठलेही शासकीय कार्ड नाहीत. साधी विद्युत व्यवस्था या वस्तीत नाही. रस्त्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात ही वस्ती संपूर्ण चिखलमय राहते. शिक्षणाचा त्या वस्तीतील नागरिकांना साधा गंधही नाही. या वस्तीतील नागरिक सुशिक्षित नाही. या वस्तीत ४० ते ५० लहान मुले आहेत. त्यांची शिक्षणापासून परवड होत आहे. त्या वस्तीतील फक्त ५ मुले शाळेत जातात. शिक्षण महर्षींच्या परिसरात शिक्षणाची विदारक स्थिती असणे, ही फार मोठी शोकांतिका आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ५० वर्षांपासून शाहिरी करणाऱ्यांची वाणी स्तब्धआमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता या वस्तीत एक भयाण वास्तव नजरेस आले. या झोपडीत एक शाहीर राहत असून ५० वर्षांपासून समाज प्रबोधन करून आपल्या शाहीरीतून समानतेचा संदेश देणारा बाळू शंकर पवार हा शाहीर याच झोपडीत राहत आहे. दोन तपाच्या कालखंडात आमच्यासाठी निवाऱ्याची साधी व्यवस्थासुद्धा झालेली नाही. जीवन जगताना आमची फार मोठी अवहेलना होत आहे. एकीकडे आम्ही जनतेला समानतेचा संदेश देतोय. परंतु आम्हाला साधी निवाऱ्याचीही सोय नाही. हे आमचे उघड्यावरच जीवन समाज व्यवस्था सांभाळणाऱ्यांना नजरेस येत नाही का? ही खंत व्यक्त करताना या शाहिराचे डोळे पाणावले अन् त्याची वाणी स्तब्ध झाली.