शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

किशोर वायाळचे आगामी टार्गेट होते जळगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:48 IST

गुन्हे शाखेने बुलडाण्यातून अटक केलेला कुख्यात चोर किशोर वायाळचे पुढील टार्गेट जळगाव होते. त्याला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले असता, त्यानेच ही बाब स्पष्ट केली.

ठळक मुद्देकुख्यात आरोपी : सदनिकेत चौकशी करून करायचा चोऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुन्हे शाखेने बुलडाण्यातून अटक केलेला कुख्यात चोर किशोर वायाळचे पुढील टार्गेट जळगाव होते. त्याला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले असता, त्यानेच ही बाब स्पष्ट केली. सदनिकेत जाऊन तेथील कोणते फ्लॅटधारक घरी आहेत वा नाहीत, याची चौकशीत किशोर करायचा आणि त्यानंतर फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास करायचा. त्याने चोरीलाच उपजीविकेचे साधन बनविल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे.किशोर वायाळ हा बुलडाण्यात राहून विविध शहरांत चोºया करायचा. अनेकदा तो पोलिसांच्या हाती लागला. मात्र, कारागृहात बाहेर येताच पुन्हा चोरीच्या व्यवसायात सक्रिय झाला. किशोरने अमरावतीमध्ये चोºया करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरून नेला. त्याच्याकडून पोलिसांनी १८ लाखांचे दागिने जप्त केले असून, आता शहरातील विविध गुन्ह्यांमध्ये विविध ठाण्यांकडून किशोरची चौकशी करण्यात येत आहे.किशोरने सोलापूर, सातारा, अकोल्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातही चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याने तब्बल २०० हून अधिक चोºया केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. किशोर वायाळ याच्या टोळीत एक साथीदार असल्याची माहिती पुढे आली असली तरी तो विविध शहरांतील कुख्यात चोरांच्या संपर्कात असल्याची माहितीही पुढे येत आहे.किशोर असा करतो चोरीइन्स्टंट चोरीत माहीर असणारा किशोर वायाळ दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेतच चोरी करीत होता. या वेळेत बहुतांश सदनिकांमध्ये शुकशुकाट असतो. अशावेळी तो सदनिकेत जाऊन कोणते फ्लॅट बंद आहे, याची पाहणी करीत होता. त्यानंतर त्याच सदनिकेतील अन्य फ्लॅटधारकांना त्या बंद फ्लॅटचे साहेब कुठे गेले, मला भेटायचे आहे, ते केव्हा येणार, अशी सर्व माहिती विचारायचा. यानंतरच कोणत्या फ्लॅटमध्ये चोरी करायची, हे किशोर ठरवित होता.लग्नाला गेलेल्या कुटुंबांच्या घरी चोरी करण्याचे तो टाळायचालग्न समारंभाला जाणारे कुटुंब दागदागिने घालूनच जातात. ही बाब लक्षात घेऊन किशोर अशा घरात चोरी करण्याचे टाळत होता, असे त्यानेच पोलिसांना सांगितले आहे. बहुतेक चोºया त्याने दिवसाढवळ्या केल्या आहेत. अशावेळी फ्लॅट स्कीममध्ये बहुतांश शुकशुकाट असतो.किशोर वायाळने चोरीला उपजीविकेचे साधन बनविले. लग्न समारंभात कुटुंब दागिने घालून जात असल्यामुळे तो त्यांच्याकडे चोरी करीत नव्हता. उलट, आजूबाजूला विचारपूस केल्यानंतर तो बंद फ्लॅटमधून ऐवज लंपास करायचा. तुुरुंगातून बाहेर येताच पुन्हा चोरी करायचा. त्याचे पुढील चोरीचे टार्गेट जळगाव असल्याचे तो सांगत होता.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त.