शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

जैन धर्मियांचा अमरावतीत दमदार मूक मोर्चा

By admin | Updated: August 25, 2015 00:34 IST

जैन मुनी धार्मिक संस्कृतीनुसार अन्न, पाणी त्यागून सर्वांसमक्ष प्राण सोडतात ही संलेखना (संथारा) संस्कृती वर्षानुवर्षांपासून सुरू आहे.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिलांची लक्षवेधी उपस्थितीअमरावती : जैन मुनी धार्मिक संस्कृतीनुसार अन्न, पाणी त्यागून सर्वांसमक्ष प्राण सोडतात ही संलेखना (संथारा) संस्कृती वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. मात्र या संस्कृतीला जयपूर उच्च न्यायालयाने आत्महत्या करणे होय, असा न्यायनिवाडा दिला आहे. न्यायालयाच्या निकालाविरोधात जिल्हाभरातील जैन समाजाने मूकमोर्चा काढला. प्रशासनाला निवेदन सादर करून या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.‘जगा आणि जगू द्या’ ही जैन धर्माची शिकवण आहे. भगवान महावीरांची ही शिकवण आचारणात आली पाहिजे, यासाठी हा समाज धर्मसाधना करतो, अशी माहिती यावेळी श्री सवीर सागरजी महाराज व समीक्षा महाराज यांनी दिली. जैन धर्म ही संस्कृती आहे. ती धार्मिक प्रथा नव्हे. प्रथा बंद होऊ शकते; तथापि संस्कृती ही धर्माची पायाभरणी ठरते. त्यामुळेच सल्लेखना ही संस्कृती कधीही बंद होऊ शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आत्मा शुद्धी व कर्माची साधना करणे, पाणी, अन्नत्याग सर्वांसमोर स्वेच्छेने सोडणे ही साधना होय, त्यामुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी निवेदन सादर करताना ताराचंद बोकरीया, अभिनंदन पेंढारी, चंद्रकांत दम्माणी, महेश कोठारी, नकुल फुलाडी, सुभाष भंडारी, योगेश विटाळकर, सचिन संगई, अंकित चुंबळे, सुदर्शन जैन, नवीन चोरडिया, कीर्ती राऊळ, चंदू सोजतिया, कोमल बोथरा, उल्हास क्षीरसागर, प्रदीप नांदगावकर, सुरेश मुनोत, सुरेश जैन, राजकुमार बरडिया, पीयूष सिंघई, संदीप फुकटे, अशोक बांबोरीया, दीपक भुसारी, संगीता क्षीरसागर, पद्मा महाजन, पुष्पा विटाळकर, सुनीता शहाकार तसेच जय जिनेंद्र गु्रप, पूजक जन चेतना मंच, महिला जागृती मंच, भारतीय जैन संघटना, मंदिराचे विश्वस्त, परवार जैन मंदिर, चातुर्मास कमिटी, साईनगर जैन मंदिर , आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, टिकाराम जैन मंदिर, बडनेरा स्थानकवासी व जैन श्रावक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.