निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिलांची लक्षवेधी उपस्थितीअमरावती : जैन मुनी धार्मिक संस्कृतीनुसार अन्न, पाणी त्यागून सर्वांसमक्ष प्राण सोडतात ही संलेखना (संथारा) संस्कृती वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. मात्र या संस्कृतीला जयपूर उच्च न्यायालयाने आत्महत्या करणे होय, असा न्यायनिवाडा दिला आहे. न्यायालयाच्या निकालाविरोधात जिल्हाभरातील जैन समाजाने मूकमोर्चा काढला. प्रशासनाला निवेदन सादर करून या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.‘जगा आणि जगू द्या’ ही जैन धर्माची शिकवण आहे. भगवान महावीरांची ही शिकवण आचारणात आली पाहिजे, यासाठी हा समाज धर्मसाधना करतो, अशी माहिती यावेळी श्री सवीर सागरजी महाराज व समीक्षा महाराज यांनी दिली. जैन धर्म ही संस्कृती आहे. ती धार्मिक प्रथा नव्हे. प्रथा बंद होऊ शकते; तथापि संस्कृती ही धर्माची पायाभरणी ठरते. त्यामुळेच सल्लेखना ही संस्कृती कधीही बंद होऊ शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आत्मा शुद्धी व कर्माची साधना करणे, पाणी, अन्नत्याग सर्वांसमोर स्वेच्छेने सोडणे ही साधना होय, त्यामुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी निवेदन सादर करताना ताराचंद बोकरीया, अभिनंदन पेंढारी, चंद्रकांत दम्माणी, महेश कोठारी, नकुल फुलाडी, सुभाष भंडारी, योगेश विटाळकर, सचिन संगई, अंकित चुंबळे, सुदर्शन जैन, नवीन चोरडिया, कीर्ती राऊळ, चंदू सोजतिया, कोमल बोथरा, उल्हास क्षीरसागर, प्रदीप नांदगावकर, सुरेश मुनोत, सुरेश जैन, राजकुमार बरडिया, पीयूष सिंघई, संदीप फुकटे, अशोक बांबोरीया, दीपक भुसारी, संगीता क्षीरसागर, पद्मा महाजन, पुष्पा विटाळकर, सुनीता शहाकार तसेच जय जिनेंद्र गु्रप, पूजक जन चेतना मंच, महिला जागृती मंच, भारतीय जैन संघटना, मंदिराचे विश्वस्त, परवार जैन मंदिर, चातुर्मास कमिटी, साईनगर जैन मंदिर , आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, टिकाराम जैन मंदिर, बडनेरा स्थानकवासी व जैन श्रावक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जैन धर्मियांचा अमरावतीत दमदार मूक मोर्चा
By admin | Updated: August 25, 2015 00:34 IST