शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

रक्तदान जनजागृतीसाठी जयदेव राऊत यांची सायकलवर भारत भ्रमंती

By उज्वल भालेकर | Updated: March 26, 2023 18:58 IST

देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, तसेच प्रत्येक घरात रक्तदाता हा संदेश पोहोचविण्यासाठी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी जयदेव राऊत हे सध्या देशभरात सायकलवर प्रवास करून जनजागृती करत आहेत. 

अमरावती : देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, तसेच प्रत्येक घरात रक्तदाता हा संदेश पोहोचविण्यासाठी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी जयदेव राऊत हे सध्या देशभरात सायकलवर प्रवास करून जनजागृती करत आहेत. पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी दहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ते २५ मार्च रोजी सायंकाळी अमरावतीमध्ये पोहोचले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील रक्तपेढीला त्यांनी भेट देत जिल्ह्यातील रक्तदान चळवळीविषयी माहिती जाणून घेतली.

रक्तदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. त्याअनुषंगाने देशभरात रक्तदान जनजागृतीसाठी पश्चिम बंगाल येथील जयदेव राऊत हे १ ऑक्टोबर २०२२ पासून सायकलने देशभरात प्रवास करत आहेत. फेडरेशन ऑफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे ते ब्रँड ॲम्बेसिडरदेखील आहेत. ते देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील रक्तपेढींना भेटी देत आहेत. रक्तपेढीच्या माध्यमातून तेथील काही शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ते रक्तदानाचे महत्त्व पटवून देत आहेत.

महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला या जिल्ह्यांचा प्रवास करून ते अमरावतीमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी इर्विन येथील रक्तपेढीला भेट दिली. यावेळी रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. श्रीकांत झापर्डे, डॉ. संदेश यमलवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, वैज्ञानिक अधिकारी अनिल तेलमोरे, मंगेश गाढवे, परिचर गजानन इंगळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जयदेव राऊत हे तीन दिवस अमरावतीमध्ये मुक्काम करणार असून या दिवसांमध्ये ते विविध ठिकाणी भेटी देऊन रक्तदानाविषयी जनजागृती करणार आहेत. प्रत्येक घरात रक्तदाता निर्माण व्हावाकोणत्याही रुग्णाला रक्ताअभावी प्राण गमवावे लागू नये यासाठी नागरिकांमध्ये रक्तदान चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. देशात रक्ताची गरज लक्षात घेता, प्रत्येक घरामध्ये रक्तदाता तयार व्हावा. या उद्देशाने देशभरात सायकलने प्रवास करून रक्तदानाविषयी जनजागृती करत आहेत. दहा हजार किलाेमीटरचा प्रवास पूर्ण करून अमरावतीमध्ये पोहोचलो असून, येथील शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदानाविषयी जनजागृती करणार असल्याचे जयदेव राऊत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.

  

टॅग्स :Amravatiअमरावती