शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 17:55 IST

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत.

ठळक मुद्देदहावीनंतर विद्यार्थ्यांचा कलतंत्रनिकेतनला उतरती कळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत. दुसरीकडे आयटीआयला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टचा सामना करावा आहे. आतापर्यंत चार फेऱ्यांमध्ये सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयत प्रवेश घेतला. आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना, असे विदारक चित्र आहे.इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण (आयटीआय) किंवा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशाला पसंती देतात. एकाच वेळी प्रवेशाचीे प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थी दोन्ही ठिकाणी अर्ज करीत असले तरी आयटीआयला पसंती दिल्याचे दिसून आले. राज्यात पॉलिटेक्निकमध्ये १ लाख ३० हजार ८०० जागांसाठी प्रवेश होते. त्यासाठी निम्म्याहून कमी म्हणजे ५७ हजार ९९७ जागांसाठी अर्ज तंत्र शिक्षण विभागाकडे आले. आयटीआय अभ्यासक्रमाच्या १ लाख ३८ हजार ३१७ जागांच्या प्रवेशासाठी तब्बल ३ लाख ९५ हजार १७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. चार फेºयांच्या अखेरीस सुमारे ८० हजार प्रवेश निश्चित झाले आहेत.तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी मिळण्याची आशा मावळल्याने या संस्थांना उतरती कळा लागली आहे. अनुदानित महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गत तीन वर्षांपासून खासगी आणि अनुदानित संस्थांच्या प्रवेशाची गर्दी ओसरली आहे. दहावी निकालाची टक्केवारी वाढली असली तरी पॉलिटेक्निकऐवजी आयटीआय प्रवेशाला विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे वास्तव आहे.अमरावतीत आयटीआयमध्ये १४ हजार ८११ प्रवेशअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात १४ हजार ८११ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात आला. यात अमरावती ४२३९, अकोला २९०९, वाशिम ११६५ यवतमाळ ३६७८, तर बुलडाणा जिल्ह्यात ३०५९ प्रवेश झाले आहेत. विभागात शासकीय ६३ आणि १६ खासगी आयटीआय आहेत.गेल्या चार ते पाच वर्षांपासून आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारा विद्यार्थी हमखास रोजगार मिळवितो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी दरवर्षी गर्दी वाढतच आहे.- पी.टी. देवतळे, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अमरावती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र