शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 17:55 IST

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत.

ठळक मुद्देदहावीनंतर विद्यार्थ्यांचा कलतंत्रनिकेतनला उतरती कळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत. दुसरीकडे आयटीआयला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टचा सामना करावा आहे. आतापर्यंत चार फेऱ्यांमध्ये सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयत प्रवेश घेतला. आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना, असे विदारक चित्र आहे.इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण (आयटीआय) किंवा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशाला पसंती देतात. एकाच वेळी प्रवेशाचीे प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थी दोन्ही ठिकाणी अर्ज करीत असले तरी आयटीआयला पसंती दिल्याचे दिसून आले. राज्यात पॉलिटेक्निकमध्ये १ लाख ३० हजार ८०० जागांसाठी प्रवेश होते. त्यासाठी निम्म्याहून कमी म्हणजे ५७ हजार ९९७ जागांसाठी अर्ज तंत्र शिक्षण विभागाकडे आले. आयटीआय अभ्यासक्रमाच्या १ लाख ३८ हजार ३१७ जागांच्या प्रवेशासाठी तब्बल ३ लाख ९५ हजार १७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. चार फेºयांच्या अखेरीस सुमारे ८० हजार प्रवेश निश्चित झाले आहेत.तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी मिळण्याची आशा मावळल्याने या संस्थांना उतरती कळा लागली आहे. अनुदानित महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गत तीन वर्षांपासून खासगी आणि अनुदानित संस्थांच्या प्रवेशाची गर्दी ओसरली आहे. दहावी निकालाची टक्केवारी वाढली असली तरी पॉलिटेक्निकऐवजी आयटीआय प्रवेशाला विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे वास्तव आहे.अमरावतीत आयटीआयमध्ये १४ हजार ८११ प्रवेशअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात १४ हजार ८११ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात आला. यात अमरावती ४२३९, अकोला २९०९, वाशिम ११६५ यवतमाळ ३६७८, तर बुलडाणा जिल्ह्यात ३०५९ प्रवेश झाले आहेत. विभागात शासकीय ६३ आणि १६ खासगी आयटीआय आहेत.गेल्या चार ते पाच वर्षांपासून आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारा विद्यार्थी हमखास रोजगार मिळवितो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी दरवर्षी गर्दी वाढतच आहे.- पी.टी. देवतळे, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अमरावती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र