शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

हे तर नरबळीच्या गुन्ह्यांना बळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:11 IST

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या निरागस मुलांच्या नरबळीचा प्रयत्न शंकर महाराज यांच्या आश्रमात झाला.

सीआयडी चौकशीची घोषणा का नाही ?निष्ठुरता : फडणवीस शासन बुवाबाजीच्या पाठीशी ?अमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या निरागस मुलांच्या नरबळीचा प्रयत्न शंकर महाराज यांच्या आश्रमात झाला. त्याशिवाय आणखी एका संशयास्पद मृत्यूचे प्रकरण 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले; परंतु पुरोगामी विचारांचे म्हणविणारे महाराष्ट्र शासन आश्रमातील गुन्हे निखंदून काढण्यासाठी सीआयडी चौकशीची घोषणा करीत नसल्याने, हे सरकार बुवाबाजीला समर्थन तर देत नाही ना, अशी व्यापक चर्चा आता सुरू झाली आहे. अनुदानित शाळा, वसतिगृहाचा भरणा असलेल्या शंकर महाराज यांच्या आश्रमात एक नव्हे, चक्क दोन विद्यार्थ्यांचा नरबळी देण्याचा प्रयत्न होतो. आश्रमाने लपविलेले हे सत्य 'लोकमत'च्या शोधमोहिमेमुळे जगासमोर येते. मात्र शासन हाणामारीच्या गुन्ह्याकडे बघावे, तशा नजरेने या मुद्याकडे बघत राहते. जगभरातून अद्ययावत तंत्रज्ञान आणि क्रांतिकारी विज्ञान वेचून राज्य प्रगत करण्यासाठी झपाटलेल्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात आजही सामर्थ्यप्राप्तीसाठी 'नरबळी' घेणारे लोक कुठल्याही धाकाविना कार्यरत आहेत. देंवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात माणसांची लेकरे कापून शक्ती मिळविणारे लोक आणि त्यांच्याभोवतीचे संशयित वर्तूळ कुठलाही मुलाहिजा न करता भेदले जावेत, यासाठी प्रभावी उपाय योजले जात नाहीत.माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात कुणाची निरागस मुले अघोरी सामार्थ्यप्राप्तीसाठी कापली, ठेचली जातातच कशी, हा विचार राज्यकर्ते असलेल्या मुख्यमंत्र्यांना का बोचला नसेल? मुख्यमंत्री ज्या-ज्या विकसित राज्यात, देशात जाऊन आलेत, त्या-त्या प्रगत राज्यात शक्तीप्राप्तीसाठी कुण्या विद्यार्थ्यांचा गळा कापला असता, चेहरा ठेचला असता तर तेथील शासन इतक्याच थंडपणे वागले असते काय? ही तुलना करण्याचे कारण असे की, जगातील ज्या प्रगत राज्यांचा आदर्श आम्ही घेत आहोत, त्या राज्यात माणसांच्या मुलांप्रती बाळगली जाणारी संवेदनशीलताही आम्ही स्वीकारायलाच हवी. हे राज्य प्रगत करण्यामागे भविष्यातील या पिढ्यांचाच तर विचार दडलाय ना ! वाघांसाठी, गोमातेसाठी शासनाने पूर्ण शक्ती पणाला लावलेली बघताना ऊर अभिमानाने भरून येतो. बोकड्यांची कत्तल असो वा श्वानांच्या नसबंदीचा मुद्दा- हे शासन पशुंचीही चिंता वाहणारे आहे, हे निर्विवादपणे स्पष्ट होते. फडणवीस हे अलीकडेच अमरावती जिल्ह्यातील गोशाळेच्या उद््घाटनाला येऊन गेलेत, त्यावेळी मंत्रिमंडळाच्या या प्रमुखाची जीवांप्रतीची आत्मियता झळकली. प्राण्यांसाठीही इतके संवेदनशील असलेले मुख्यमंत्री माणसांची निरागस मुले त्यांच्या लगतच्याच जिल्ह्यात बळी चढविण्याचा प्रयत्न केला जात असताना गप्प का? विहिरीला असावे तसे अनेक भूमिगत झरे या प्रकरणातही असण्याची दाट शक्यता आहे. सीआयडी मागणीसाठी अवघा जिल्हा विद्रोह करून उठला. मुख्यमंत्र्यांनाही लोक भेटलेत; परंतु ना फडणवीसांचे हृदय द्रवले; ना त्यांच्यातील शासक अस्वस्थ झाला. राज्यकर्ता म्हणून मनुष्यबळी रोखण्यासाठी वापरता येणारे अधिकार टाळून राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालणे, खरेच किती उपयोगाचे?