शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान नव्हे तर संत्रा गळतीचा कायम उपाय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST

चांदूर बाजार - तालुक्यातील संत्राफळ गळतीचे कारण सात वर्षांपासून स्पस्ट होत नसल्यामुळे शेतकरी नागपूर एनआरसीसी कार्यालयात धडकले. तसेच विदर्भ ...

चांदूर बाजार - तालुक्यातील संत्राफळ गळतीचे कारण सात वर्षांपासून स्पस्ट होत नसल्यामुळे शेतकरी नागपूर एनआरसीसी कार्यालयात धडकले. तसेच विदर्भ दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संसदीय समितीला निवेदन देऊन एनआरसीसीच्या अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी केली.

तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संत्राफळ गळतीमुळे सात वर्षांपासून कोट्यवधींचा फटका बसत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी कोट्यवधी खर्च करून नागपूर येथे निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र (एनआरसीसी) कार्यान्वित केले. मात्र, याचा संत्रा उत्पादकांना कोणताही फायदा झाला नाही. या पिकासाठी एनआरसीसीमार्फत कोणत्याही प्रकारचे संशोधनसुद्धा करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच आहे. आम्हाला संत्रा गळतीच्या नुकसानापोटी अनुदान नकोत, कायम उपाय हवा. यासाठी पांढरा हत्ती बनलेल्या एनआरसीसी संशोधन केंद्राची चौकशी करून कार्यवाहीची मागणी चांदूरबाजार तालुक्यातील संत्रा उत्पादकांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रिय संसदीय समीतीकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली. त्यावर एनआरसीसीवर कारवाई करण्याचे आश्वासन खा. जाधव यांनी दिले. चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्विय सहायक गोलू ठाकूर यांनी केंद्रीय संसदीय समितीला निवेदनातून केली आहे. यावेळी शेतकरी प्रदीप बंड, अभिजित पोहोकार, अरविंद कपले, किशोर थोरात, अरुण दाभाडे, नरेंद्र सुनेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

एनआरसीसीच्या अधिकाऱ्यांची दिलगिरी

चांदुर बाजार तालुक्यातील ४० शेतकरी एनआरसीसीच्या नागपूर कार्यालयात बुधवारी धडकले. ४ तास शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यावर अखेर एनआरसीसीच्या अधिकाऱ्यांनी चूक झाल्याबाबत माफी मागितल्याची माहिती शेतकरी प्रदीप बंड यांनी दिली.