शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

अनुदान नव्हे तर संत्रा गळतीचा कायम उपाय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST

चांदूर बाजार - तालुक्यातील संत्राफळ गळतीचे कारण सात वर्षांपासून स्पस्ट होत नसल्यामुळे शेतकरी नागपूर एनआरसीसी कार्यालयात धडकले. तसेच विदर्भ ...

चांदूर बाजार - तालुक्यातील संत्राफळ गळतीचे कारण सात वर्षांपासून स्पस्ट होत नसल्यामुळे शेतकरी नागपूर एनआरसीसी कार्यालयात धडकले. तसेच विदर्भ दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संसदीय समितीला निवेदन देऊन एनआरसीसीच्या अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी केली.

तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संत्राफळ गळतीमुळे सात वर्षांपासून कोट्यवधींचा फटका बसत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी कोट्यवधी खर्च करून नागपूर येथे निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र (एनआरसीसी) कार्यान्वित केले. मात्र, याचा संत्रा उत्पादकांना कोणताही फायदा झाला नाही. या पिकासाठी एनआरसीसीमार्फत कोणत्याही प्रकारचे संशोधनसुद्धा करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच आहे. आम्हाला संत्रा गळतीच्या नुकसानापोटी अनुदान नकोत, कायम उपाय हवा. यासाठी पांढरा हत्ती बनलेल्या एनआरसीसी संशोधन केंद्राची चौकशी करून कार्यवाहीची मागणी चांदूरबाजार तालुक्यातील संत्रा उत्पादकांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रिय संसदीय समीतीकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली. त्यावर एनआरसीसीवर कारवाई करण्याचे आश्वासन खा. जाधव यांनी दिले. चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्विय सहायक गोलू ठाकूर यांनी केंद्रीय संसदीय समितीला निवेदनातून केली आहे. यावेळी शेतकरी प्रदीप बंड, अभिजित पोहोकार, अरविंद कपले, किशोर थोरात, अरुण दाभाडे, नरेंद्र सुनेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

एनआरसीसीच्या अधिकाऱ्यांची दिलगिरी

चांदुर बाजार तालुक्यातील ४० शेतकरी एनआरसीसीच्या नागपूर कार्यालयात बुधवारी धडकले. ४ तास शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यावर अखेर एनआरसीसीच्या अधिकाऱ्यांनी चूक झाल्याबाबत माफी मागितल्याची माहिती शेतकरी प्रदीप बंड यांनी दिली.