शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ साडेतेरा तास

By admin | Updated: February 24, 2016 00:11 IST

चंद्रपुरात १४ नरबळी घेणारे ते बिबट. त्यांना सात वर्षे सांभाळण्याची तारेवरची कसरत वडाळी वनविभागाने पेलली.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक : गोरेवाड्यात पोहोचले सुखरुपवैभव बाबरेकर अमरावतीचंद्रपुरात १४ नरबळी घेणारे ते बिबट. त्यांना सात वर्षे सांभाळण्याची तारेवरची कसरत वडाळी वनविभागाने पेलली. मात्र, त्यांची नागपूरला रवानगी करण्यासाठी निश्चित झालेला सोमवारचा दिवस मात्र, प्रचंड थरार, मानसिक व शारिरीक चढ-उतारांचा अनुभव देणारा ठरला. शेरू व राजाला नागपूरच्या प्राणी संग्रहालयात सुखरुप पोहोचविल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोमवारी सकाळी ९ ते रात्री १०.३० वाजतापर्यंतचे ते साडेतेरा तास वनकर्मचाऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरले. शासनाचे आदेश धडकताच उपवनसरंक्षक नीनू सोमराज यांनी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर यांना बिबट्यांना गोरेवाडा प्रकल्पात पोहोचविण्याची जबाबदारी सोपविली. त्यासाठी सोमवार २२ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरला होता. शनिवार, रविवारी दोन्ही बिबट्यांना उपाशी ठेवण्यात आले. ते अन्नाच्या शोधार्थ पिंजऱ्यात अडकतील, असा डाव होता. वनकर्मचाऱ्यांनी वडाळीतील बिबट्यांच्या कोठडीलगत दुसरा लहान पिंजरा ठेवून सर्वप्रथम राजाला पिंजऱ्यात घेण्याचे प्रयत्न सुरु केले. दोन्ही पिंजऱ्यांदरम्यान मोकळी जागा तर नाही ना?, याची खबरदारी घेण्यात आली. कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वासअमरावती : पिंजऱ्याबाहेर एक जिवंत कुत्रा बांधण्यात आला. पिजऱ्यांत चार किलो मटण ठेवण्यात आले. पिंजऱ्यांपासून काही अंतरावर अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवूनच होते. मात्र, दुपारपर्यंत राजा पिंजऱ्यात शिरला नाही. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर तो पिंजऱ्यात शिरला आणि कैद झाला. त्यानंतर शेरूला पिंजऱ्यात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, शेरू बंदिस्त पिजऱ्यांतून लहान पिजऱ्यांत प्रवेश करीत नव्हता. काही वेळ परिसर निर्मनुष्य करण्यात आला. रात्र झाली तरीसुध्दा शेरू पिंजऱ्यात अडकला नाही. अखेर रात्री ८.१५ वाजता शेरूने लहान पिजऱ्यांत प्रवेश केला. तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर रात्री १०.१५ वाजता ते दोन्ही पिंजरे ट्रकमध्ये टाकण्याचे काम सुरु करण्यात आले. पिंजरे ट्रकमध्ये टाकण्यासाठी लोखंडी रुळ लावण्यात आले. तासभर सर्व वनकर्मचाऱ्यांनी विश्रांती घेऊन रात्री ११.१५ वाजता दोन्ही बिबट्यांना घेऊन ट्रक गोरेवाड्याकडे रवाना झाला. थोडक्यात दुर्घटना टळलीवडाळीतून दोन्ही बिबटाना घेऊन ट्रक गोरेवाड्याकडे रवाना झाला. मध्यरात्री दरम्यान तिवसानजीक एका ट्रकने ओव्हरटेक करित वनविभागाच्या ट्रकजवळून गेले. प्रसावधानतेने ट्रक चालकांने ट्रकवर नियंत्रण मिळविले. अन्यथा दोन्ही ट्रकमध्ये अपघात होणार होता. जर ट्रकचा अपघात झाला असता तर पिजऱ्यांतील बिबट बाहेर सुध्दा निघू शकले असते. सुदैवाने दुर्घटना टळली. तिच्या नशिबी पुन्हा विरह ! वडाळी वनपरिक्षेत्रातील बंदिस्त बिबट्यांना भेटायला अनेकदा जंगलातील मादी बिबट येत होती. पिजऱ्याभोवती घिरट्या घालून ती राजा व शेरूशी मौखिक संवादसुध्दा साधत होती. पिजऱ्यांभोवतची माती उखरून ती नर बिबट्यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करीत होती. मात्र, दोन्ही बिबट बंदिस्त असल्यामुळे नर-मादी बिबटाचा संगम होऊ शकत नव्हता. मात्र, आता राजा व शेरू हे दोन्ही बिबट मादी बिबटपासून बरेच दूर गेले आहेत. भविष्यात ती मादी बिबट राजा व शेरूला पाहू शकणार नाही. त्यामुळे त्या मादी बिबटच्या नशिबी पुन्हा विरह असल्याचे दिसून येत आहे. यांनी घेतले परिश्रमदोन्ही पिजऱ्यांतील बिबटांना घेऊन ट्रक गोरेवाड्याकडे रवाना झाला. यावेळी ट्रकमध्ये वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच. व्ही. पटगव्हाणकर, रेस्क्यू पथकाचे अमोल गावनेर, मनोज ठाकूर, पशूवैद्यकीय अधिकारी, वनरक्षक करवाडे, सुर्यवंशी, सहा वनमजुर असे एकूण ३२ वनकर्मचारी होते. सोमवारचा संपूर्ण दिवस जोखीम पत्करून वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यानंतरही गोरेवाडा रवाना झाल्यावर मार्गात काही ठिकाणी ट्रक थांबवून बिबट्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्यात आले तसेच त्यांच्यासाठी पाण्याची सोयसुध्दा वनकर्मचाऱ्यांनी केली होती.