शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आॅटोचालकांना गणवेश, बॅच, बिल्ला लावणे अनिवार्य

By admin | Updated: February 6, 2016 00:17 IST

शहरातील सर्व आॅटोचालकांना आता गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिले.

८ फेब्रुवारीपासून पोलिसांची मोहीम : वाहतूक समिती स्थापन होणारअमरावती : शहरातील सर्व आॅटोचालकांना आता गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिले. ८ फेब्रवारीपासून आॅटोची धरपकड मोहीम सुरू होणार असून यासंदर्भात पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या आदेशाने वाहतूक समितीची स्थापनासुध्दा करण्यात येणार आहे. शहरात आॅटो व शहर बसेस सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे सचित्र वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. 'सीपी साहेब यांना आवरा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच शहरात खळबळ माजली होती. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्तांनी आॅटो चालकांना गणवेश व बॅच बिल्ला अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधित पोलीस उपायुक्तांना सूचना दिल्या आहेत. ८ फेब्रवारीपासून आॅटोच्या प्रवासी वाहतुकीवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. तत्पूर्वीच पोलिसांनी शहरात फिरून आॅटोचालकांना गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य असल्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी विविध चौकांत उभ्या राहणाऱ्या आॅटो चालकांना जाहीर सुचना देऊन ही बाब कळविली आहे. गणवेश व बॅच बिल्ला लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी ताकिद आॅटो चालकांना दिली आहे. जिल्ह्यात १६ हजार ५० तर त्यापैकीच शहरात ५ हजारांच्या जवळपास आॅटो प्रवासी वाहतूक करतात. मात्र, शहरातील काही आॅटो चालक वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत शहरात प्रवासी वाहतूक करीत आहे. यासंदर्भात पोलीस विभागाकडून आॅटो चालकांना पूर्वीच निर्देश देण्यात आले होते. यासंदर्भात पोलीस विभागाकडून आरटीओला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, आॅटो चालकांना वाहतूक नियमांची शिस्त लागावी, त्यांनी प्रवासी वाहतुकीची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळावी, या उद्देशाने पोलीस विभागाने आता आॅटो चालकांना गणवेश व बॅच बिल्ला अनिवार्य केला आहे. आॅटोचालकांनी गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य आहे. यासंदर्भात त्यांना जाहीर सूचनाही देण्यात आल्या आहेत. ८ फेब्रुवारीनंतर विनागणवेश व विना बॅच बिल्ला असणाऱ्या आॅटोंवर कारवाई करण्यात येईल. नियमभंग करणाऱ्यावर कारवाई होईल. - नितीन पवार, पोलीस उपायुक्त.