शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

आॅटोचालकांना गणवेश, बॅच, बिल्ला लावणे अनिवार्य

By admin | Updated: February 6, 2016 00:17 IST

शहरातील सर्व आॅटोचालकांना आता गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिले.

८ फेब्रुवारीपासून पोलिसांची मोहीम : वाहतूक समिती स्थापन होणारअमरावती : शहरातील सर्व आॅटोचालकांना आता गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिले. ८ फेब्रवारीपासून आॅटोची धरपकड मोहीम सुरू होणार असून यासंदर्भात पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या आदेशाने वाहतूक समितीची स्थापनासुध्दा करण्यात येणार आहे. शहरात आॅटो व शहर बसेस सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे सचित्र वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. 'सीपी साहेब यांना आवरा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच शहरात खळबळ माजली होती. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्तांनी आॅटो चालकांना गणवेश व बॅच बिल्ला अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधित पोलीस उपायुक्तांना सूचना दिल्या आहेत. ८ फेब्रवारीपासून आॅटोच्या प्रवासी वाहतुकीवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. तत्पूर्वीच पोलिसांनी शहरात फिरून आॅटोचालकांना गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य असल्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी विविध चौकांत उभ्या राहणाऱ्या आॅटो चालकांना जाहीर सुचना देऊन ही बाब कळविली आहे. गणवेश व बॅच बिल्ला लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी ताकिद आॅटो चालकांना दिली आहे. जिल्ह्यात १६ हजार ५० तर त्यापैकीच शहरात ५ हजारांच्या जवळपास आॅटो प्रवासी वाहतूक करतात. मात्र, शहरातील काही आॅटो चालक वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत शहरात प्रवासी वाहतूक करीत आहे. यासंदर्भात पोलीस विभागाकडून आॅटो चालकांना पूर्वीच निर्देश देण्यात आले होते. यासंदर्भात पोलीस विभागाकडून आरटीओला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, आॅटो चालकांना वाहतूक नियमांची शिस्त लागावी, त्यांनी प्रवासी वाहतुकीची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळावी, या उद्देशाने पोलीस विभागाने आता आॅटो चालकांना गणवेश व बॅच बिल्ला अनिवार्य केला आहे. आॅटोचालकांनी गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य आहे. यासंदर्भात त्यांना जाहीर सूचनाही देण्यात आल्या आहेत. ८ फेब्रुवारीनंतर विनागणवेश व विना बॅच बिल्ला असणाऱ्या आॅटोंवर कारवाई करण्यात येईल. नियमभंग करणाऱ्यावर कारवाई होईल. - नितीन पवार, पोलीस उपायुक्त.