शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य; व्यवस्थापन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:26 IST

मागील हंगामामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामापूर्वीच एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : अळीचा जीवनक्रम खंडित करावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील हंगामामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामापूर्वीच एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने सांगीतले.कपाशी हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. यंदादेखील किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र कपाशी पिकासाठी प्रस्तावित आहे. त्यामुळे हंगामापूर्वी व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी, जेणेकरून किडीच्या जमीनीत असलेल्या अवस्था (उदा. कोष) वर येऊन उन्हामुळे नष्ट होतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील, कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खडयात टाकावीत. याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शेत तथा बांध स्वच्छ करण्यात यावे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी घेतलेल्या शेतात पुढील हंगामात कापूस लागवड करू नये, पूर्वी तृणधान्य, कडधान्य, गळितधान्य केलेली जमीन कापूस लागवडीसाठी निवडावी. या हंगामात कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्यूजी) कपाशीची लागवड करावी तसेच कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मुंग, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ लावावी. या प्रमाणे नियोजन केल्यास निश्चितच गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करणे शक्य होणार आहे.शेतकऱ्यांनी कृषिसेवा केंद्रा कडून खात्रीच्या बियाण्याची खरेदी करावी व खरेदीची पावती घेऊन ती जतन करून ठेवावी तसेच पेरणीच्या वेळी पिशवी उलट्या बाजूने फाडून पिशवीवरील अत्यावश्यक माहिती जसे लॉट नंबर, वाण, स्वत:कडे जपून ठेवावी.कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी, जून महिन्यात लागवड करण्यात यावी. युरियाचा खताचा जास्त वापर टाळावा. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या तीन महिन्यापर्यंत कीटकनाशकाचा वापर टाळावा, जेणेकरून मित्रकिडीचे संरक्षण होईल. या काळात वनस्पतीजन्य कीटकनाशके, जैव कीटकनाशके, मित्र किडीचा वापर करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यापासून नियोजन करून एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले.प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही घ्यावी काळजीपिकांच्या लागवडी नंतर ४५ दिवसात फेरोमन ट्रॅप्सचा वापर हेक्टरी ५ या प्रमाणे वापर करावा व पिकांतील बदलाची निरीक्षणांची नोंद घ्यावी. पीक लागवडीपासून काढणीपर्यंत आठवड्याला पिकांमधील कीडरोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सूक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुभार्वाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसानाची पातळी गाठली असल्यासच फक्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. रासायनिक किटकनाशकांचा वापर आवश्यता असेल तेव्हाच व शिफारस केल्याप्रमाणे करावा. अधिकाधिक कीटकनाशके एकत्र मिसळून फवारणी वा जास्त मात्रेत फवारणी घातक ठरू शकते, असे कृषी विभागाने सांगितले.