शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार; आमदार रोहित पवार

By उज्वल भालेकर | Updated: December 4, 2023 20:34 IST

संघर्ष यात्रेला अमरावती जिल्ह्यात युवकांचा प्रतिसाद

अमरावती : संघर्ष यात्रेतून आरोग्य, शिक्षण, बेरोजगार युवकांचे अनेक प्रश्न समोर येत आहेत. अमरावतीमध्येही दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु तरीही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. अनेक रुग्णालयांमध्ये औषधी नाही, शाळेत शिक्षक नसल्याची परिस्थिती आहे. हे सर्व प्रश्न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.

जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. रविवार ३ नोव्हेंबरला ही यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. त्याअनुषंगाने रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, या संघर्ष यात्रेमध्ये जे प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून येत आहेत, ते सर्व प्रश्न अधिवेशनात मांडणार आहे. सरकारने जारी केलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीतून अमरावती जिल्ह्यासह अनेक जिल्हे वगळण्यात आले आहेत.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने पहिली ४० तालुक्यांची यादी पाठवली पण, दुसरी ९०-१०० तालुक्यांची यादी अद्याप केंद्र सरकारकडे पाठवली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अजूनही येथील नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकदाही अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली नाही त्यामुळेच जिल्हा मदतीपासून वगळण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या पत्र परिषदेला स्वर्गीय उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील तसेच स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.निवडणूक आल्यावर घड्याळ कोणाकडे हे स्पष्ट होईल

भाजपसोबत जाण्याचा निर्णय जर शरद पवार साहेबांचा असता तर आज ते विरोधात नसते. त्यामुळे अजित दादा काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवाराच आहेत. आणि चिन्हासाठीची न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. त्यामुळे निवडणूक काळात घड्याळ कोणाकडे आहे हे दिसून येईल. निवडणूक अयोगाला एकतर्फी निर्णय देता येणार नाही. आता फक्त अजित पवार मित्र मंडळ असल्याचा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात कालबाह्य औषधी

नांदगाव खंडेश्वर येथे संघर्ष यात्रेदरम्यान येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था पाहण्याचा आग्रह स्थानिक नागरिकांनी केला. त्यामुळे या रुग्णालयाला भेट दिली असता, येथे कालबाह्य औषधी असल्याचे दिसून आले. तसेच इतर काही महत्वाच्या औषधांचा तुटवडा असल्याचेही दिसून आले. काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात एका लहान मुलाचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे यासंदर्भात तेथील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचे अडचणी समजून घेत ते अधिवेशनात मांडणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.