शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणी पुरवठा, ड्रायझोनचा मुद्दा तापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:47 IST

तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील दलित वस्तीतील बोअरवेल पाणी पुरवठा मागील अडीच वर्षापासून नादुरूस्त आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : जलव्यस्थापन समितीचे सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील दलित वस्तीतील बोअरवेल पाणी पुरवठा मागील अडीच वर्षापासून नादुरूस्त आहे. मात्र, या विषयाकडे कार्यकारी अभियंता प्रकल्प बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरीकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बाब सदस्य गौरी देशमुख यांनी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत हा मुद्दा रेटून धरताना प्रशासनाला निरुत्तर केले.याशिवाय सभेत वरूड व मोर्शी या दोन तालुक्यातील २४७ गावे ही ड्रायझोनमध्ये असल्याने या ठिकाणी सिंचन व पिण्याचे पाण्याची समस्या वाढत असल्याने ही गावे यामधून वगळण्यात यावी, अशी मागणी सदस्य देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केली. दरम्यान या दोन्ही मुद्यावर सभागृहातील वातावरण जोरदार तापले होते. शिवणगाव येथील दलितवस्तीत पिण्याचे पाण्यासाठी असलेले बोअरवेल सिंचन तलावाच्या बांधकामामुळे बाधीत झाले होते. त्यामुळे अडीच वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. तथापि प्रशानाने काहीच उपाययोजना न केल्याने गौरी देशमुख यांनी प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगलीत. दरम्यान त्या आक्रमक झाल्यात. अखेर सदस्याच्या तीव्र भावना लक्षात घेता हा प्रश्न महिनाभरात निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी दिले. यावेळी सीईओ के.एम. अहमद यांनी शब्द दिल्याने वातावरण निवळले. वरूड आणि मोर्शी तालुक्यातील २४७ गावे ड्रायझोनमध्ये आहेत. त्यामुळे या गावामधील शेतकरी व नागरीकांना पाणी असतानाही कुपनलीका,विहिरी करता येत नाही. ड्रायझोनमधील गावातील शेती सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. गावे ड्रायझोनमधून वगळण्यासाठी सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी देवेंद्र भुयार यांनी केली.सभेला सभापती वनिता पाल, सुशीला कुकडे, पुजा हाडोळे, अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, सीईओ के.एम. अहमद, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, संजय येवले आदी उपस्थित होते.जलयुक्त शिवारचाही आढावाजलव्यवस्थापन समिती सभेत सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील कोणती गावे समाविष्ट आहे. या ठिकाणी कोणत्या कामांचा समावेश होणार आहे, याची विस्तृत माहिती जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी सभेला उपस्थितीत असलेल्या कृषी अधीक्षक अधिकारी यांचे प्रतिनिधीला विचारली. मात्र याची पुरेशी माहिती नसल्याने यापुढील सभेत जलयुक्त शिवारची माहिती देण्याचे निर्र्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांंनी दिलेत. हा विषय उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख आदींनी उपस्थित केला होता, हे विशेष.