शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा, ड्रायझोनचा मुद्दा तापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:47 IST

तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील दलित वस्तीतील बोअरवेल पाणी पुरवठा मागील अडीच वर्षापासून नादुरूस्त आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : जलव्यस्थापन समितीचे सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील दलित वस्तीतील बोअरवेल पाणी पुरवठा मागील अडीच वर्षापासून नादुरूस्त आहे. मात्र, या विषयाकडे कार्यकारी अभियंता प्रकल्प बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरीकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बाब सदस्य गौरी देशमुख यांनी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत हा मुद्दा रेटून धरताना प्रशासनाला निरुत्तर केले.याशिवाय सभेत वरूड व मोर्शी या दोन तालुक्यातील २४७ गावे ही ड्रायझोनमध्ये असल्याने या ठिकाणी सिंचन व पिण्याचे पाण्याची समस्या वाढत असल्याने ही गावे यामधून वगळण्यात यावी, अशी मागणी सदस्य देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केली. दरम्यान या दोन्ही मुद्यावर सभागृहातील वातावरण जोरदार तापले होते. शिवणगाव येथील दलितवस्तीत पिण्याचे पाण्यासाठी असलेले बोअरवेल सिंचन तलावाच्या बांधकामामुळे बाधीत झाले होते. त्यामुळे अडीच वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. तथापि प्रशानाने काहीच उपाययोजना न केल्याने गौरी देशमुख यांनी प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगलीत. दरम्यान त्या आक्रमक झाल्यात. अखेर सदस्याच्या तीव्र भावना लक्षात घेता हा प्रश्न महिनाभरात निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी दिले. यावेळी सीईओ के.एम. अहमद यांनी शब्द दिल्याने वातावरण निवळले. वरूड आणि मोर्शी तालुक्यातील २४७ गावे ड्रायझोनमध्ये आहेत. त्यामुळे या गावामधील शेतकरी व नागरीकांना पाणी असतानाही कुपनलीका,विहिरी करता येत नाही. ड्रायझोनमधील गावातील शेती सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. गावे ड्रायझोनमधून वगळण्यासाठी सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी देवेंद्र भुयार यांनी केली.सभेला सभापती वनिता पाल, सुशीला कुकडे, पुजा हाडोळे, अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, सीईओ के.एम. अहमद, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, संजय येवले आदी उपस्थित होते.जलयुक्त शिवारचाही आढावाजलव्यवस्थापन समिती सभेत सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील कोणती गावे समाविष्ट आहे. या ठिकाणी कोणत्या कामांचा समावेश होणार आहे, याची विस्तृत माहिती जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी सभेला उपस्थितीत असलेल्या कृषी अधीक्षक अधिकारी यांचे प्रतिनिधीला विचारली. मात्र याची पुरेशी माहिती नसल्याने यापुढील सभेत जलयुक्त शिवारची माहिती देण्याचे निर्र्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांंनी दिलेत. हा विषय उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख आदींनी उपस्थित केला होता, हे विशेष.