शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनची रुग्णसेवा ‘आजारी’

By admin | Updated: June 23, 2014 23:39 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा, परिचारिकांची रिक्त पदे व बंद असलेले सिटी स्कॅन, लिफ्टमुळे एकूणच रूग्णसेवा कोलमडली आहे.

अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा, परिचारिकांची रिक्त पदे व बंद असलेले सिटी स्कॅन, लिफ्टमुळे एकूणच रूग्णसेवा कोलमडली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असताना लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.जिल्ह्याच्या रुग्णसेवेचा भार सांभाळणाऱ्या इर्विनमध्ये डॉक्टरांची वानवा असल्याने आरोग्य सेवा देताना दमछाक होत असल्याचे येथे चित्र आहे. वर्ग-१ चे १५ पदे रिक्त आहेत. मात्र हे रिक्त पदे भरण्यासाठी एकाही आमदारांनी प्रयत्न केला नसल्याचे उद्भवलेल्या परिस्थितीवरुन स्पष्ट होते. रिक्त पदांची भरती करण्यासंदर्भात मंत्रालयातील आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करुन इर्विनचे प्रशासन हतबल झाले आहे. दररोज ८०० ते ९०० बाह्यरुग्ण तपासणी तर वॉर्डात ३५० ते ४०० रुग्णसेवा दिली जाते. मात्र तोकडे मनुष्यबळ असल्याने येथील प्रमुखांना रुग्णसेवा कशा पुरवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी, स्टॉप नर्स व अधिपरिचारिका या पदांचा अनेक वर्षांपासून वानवा असल्याची माहिती आहे. अधिपरिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य सेवा देणे दुरापास्त झाले आहे. अशातच आरोग्य उपसंचालक कार्यालयाने ३० मुख्य परिचारिकांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र या बदल्यांच्या रिक्त जागी ३० ऐवजी ८ जागांवरच मुख्य परिचारिका कार्यरत आहेत. उर्वरित जागांवर मुख्य परिचारिकांच्या नियुक्तीचे आदेश करण्यात आले नाही. परिणामी आरोग्य सेवा आजारी पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वर्ग -३ ची २० पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजही डबघाईस आले आहेत. इर्विनमध्ये रुग्णसेवेबाबत निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि मनुष्यबळाच्या रिक्त जागांबाबत कोणीही राजकीय पुढारी सहकार्य करीत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांनी येथून बदली करण्यासाठी मंत्रालयात ‘फिल्डिंग’ लावल्याचे बोलले जात आहे. मात्र अमरावतीत जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कोणीही येण्यास उत्सूक नाही. परिणामी रुघुनाथ भोये यांच्या बदलीचा आरोग्य विभागात मुहूर्त निघत नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.इर्विनमध्ये उत्तम आरोग्य सेवा मिळावी ही सर्वच लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे. मात्र, येथे निर्माण झालेली दयनीय परिस्थिती कोण सुधारणार हा सवालसुध्दा उपस्थित होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात इर्विनच्या आरोग्य सेवेबाबत ठोस निर्णय होईल, अशी दाट शक्यता होती. मात्र जिल्ह्याच्या नशिबी आरोग्य सुविधेबाबत निराशाच आल्या आहेत. मागील तीन वर्षांपासून सीटी स्कॅन मशीन बंद आहे. आपत्कालीन आरोग्य सेवा देताना बंद सीटी स्कॅन मशीनमुळे डॉक्टरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. केवळ बीपीएलच्या रुग्णांसाठी विशेष बाब म्हणून खासगी रुग्णालयातून सीटी स्कॅनची सोय केली जाते. मात्र येथील सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने अन्य रुग्णांना ही सेवा घेताना खासगी रुग्णालयातून आगाऊ रक्कम मोजावी लागते, हे खरे आहे. बंद असलेले सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करणे शक्य नसल्याने त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने ही सुविधा देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पुढे आणला. मात्र हा प्रस्ताव कुठे अडकला हे शोधण्याचे सौजन्य देखील आमदारांनी दाखविले नाही, त्यामुळे रुग्णसेवेबाबत लोकप्रतिनिधी किती सजग आहे, हे स्पष्ट होते.