शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘इर्विन’ रुग्णालयच आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:12 IST

अमरावती : शहरातील अस्वच्छता, वातावरणातील बदल व सततचा पडणारा पाऊस यांमुळे सर्दी, खोकला तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये लहान ...

अमरावती : शहरातील अस्वच्छता, वातावरणातील बदल व सततचा पडणारा पाऊस यांमुळे सर्दी, खोकला तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये लहान मुलांना व्हायरल तापाची लक्षणे वाढली आहे. त्यामुळे इर्विन रुग्णालयात आजारी पडल्याचे चित्र आहे. रुग्ण अधिक आणि खाटा कमी अशी विदारक स्थिती आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.

बाह्यरुण विभागात रुग्णावर उपचारासाठीची वेळ सकाळी ८ ते २ असली तरी नियमित डाॅक्टर व स्टाफ गैरहजर असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. आकस्मिक वाॅर्डात एकच डाॅक्टर कर्तव्यावर असल्याने कामाचा ताण वाढत आहे. मनुष्यबळ तोकडे असल्याचा प्रस्ताव पाठवूनही वरिष्ठांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढीव दिली जात नाही. २७५ बेड व ५ आयसीयू बेड हे तुटपुंजे असल्याने एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तुटपुंज्या सोई असल्याने नाइलाजास्तव बाहेरच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ यावे लागत आहे. मायक्रो सोनोग्राफी, एमआरआय मशीन उपलब्ध नाही. लोकसंख्येच्या तुुुलनेत फक्त ३० टक्के स्टाफ आहे.

बॉक्स

डॉक्टरांचा अनुशेष केव्हा भरणार?

रुग्णालयात सेवा देण्यासाठी फक्त ८६ नर्सेस आहेत. डाॅक्टरांची संख्या तोकडी आहे. वाॅर्डातील स्वच्छतागृहांची नियमित सफाई होत नसल्याने प्रत्येक वाॅर्डात अस्वच्छता पसरली आहे. आरएमओ डॉ. प्रमोद निरवणे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा त्यांनी केली. शासनाने त्वरित स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

-----------------

वंचित बहुजन आघाडीची धडक

ईर्विनमध्ये बेडअभावी रुग्णांची फरफट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी डॉक्टर, कर्मचारी अनुपस्थित असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव किरण गुडधे, सुरेश तायडे यांनी प्रत्यक्ष वाॅर्डा-वाॅर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली, सोई-सुविधांबद्दल माहिती जाणून घेतली.